म. टा. प्रतिनिधी, पुणे
पावसाळ्यातील 'वन डे पिकनिक स्पॉट' म्हणून प्रसिद्ध असलेला सिंहगड धुक्यात हरवल्याची माहिती मिळताच पुणेकरांनी रविवारी सकाळी सात वाजल्यापासूनच सिंहगडावर गर्दी केली. एकाच दिवसात गडावर आठ हजारांहून अधिक पर्यटक आल्यामुळे वन विभाग आणि घेरा सिंहगड समितीच्या कार्यकर्त्यांना गाररव्यातही हा घाम फुटला. पर्यटकांच्या गर्दीसाठी वन विभागाने केलेल्या नियोजचा फज्जा उडला. गर्दी रोखण्यासाठी वनाधिकाऱ्यांनी अखेर दुपारी दीड तास गडाचा प्रवेश बंद करावा लागला.
आठवडाभर पडलेल्या पावसामुळे गडावरील वातावरण बदलल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. धुक्यात हरवलेल्या गडावरचे वातावरण अनुभवण्यासाठी आणि पावसात गरमागरम कांदा भजी, पिठलं भाकरी खाण्यासाठी पर्यटकांनी शनिवारीही गर्दी केली होती, पण रविवारी गर्दीने उच्चांक गाठला. सकाळपासूनच गर्दी वाढल्यामुळे अकराच्या दरम्यान गडावरील पार्किंग फुल्ल झाले होते. घाट रस्त्यावर तीन किलोमीटर दूरपर्यंत पर्यटकांच्या गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. गाड्यावर जाणे शक्य नसल्याने संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या स्वयंसेवकांनी पर्यटकांना गाड्या घाट रस्त्यातच कडेला लावायला सांगितल्या. एकीकडे घाट रस्ता व्यापणारे पार्किंग, बेशिस्त वाहनचालक आणि गोळेवाडीला पायथ्याला लागलेल्या पर्यटकांच्या गाड्यांच्या रांगा पाहून अखेरीस वन विभागाने दुपारी दीड तास गाड्यांना गडाच्या पायथ्यापासून प्रवेश बंद ठेवला होता. त्यामुळे गडाच्या पायथ्यापासून डोणजे फाट्यापर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. अखेरीस काही गाड्या सिंहगडाचे दूरूनच दर्शन घेऊन माघारी फिरल्या. वन विभागाचे वनपाल हेमंत मोरे, बाळासाहेब जिवडे, संदीप कोळी यांसह पंचवीस सुरक्षारक्षकांनी वाहतुकीचे नियोजन केले.
...
आज सकाळपासून पर्यटकांची गर्दी वाढली होती. त्यातच गोळेवाडीकडून घाट रस्त्यावर पहिल्याच वळणावर सकाळी सातच्या दरम्यान एक दरड पडली. पण सगळ्यांच्या मदतीने तासाभरात रस्ता रिकामा झाला. दिवसभरात ६४८ चारचाकी वाहने, तसेच १७३० दुचाकी गडावर सोडल्या. यातून ६८ हजार रुपये शुल्क जमा झाले. गडाच्या प्रवेशद्वाराच्या अलीकडे पदपथावर मोठी भेग पडली आहे. उद्या सार्वजनिक बांधकाम विभागाची टीम त्याची दुरुस्ती करणार आहे.
- बाळासाहेब जिवडे, वनरक्षक, खानापूर वन क्षेत्र
पावसाळ्यातील 'वन डे पिकनिक स्पॉट' म्हणून प्रसिद्ध असलेला सिंहगड धुक्यात हरवल्याची माहिती मिळताच पुणेकरांनी रविवारी सकाळी सात वाजल्यापासूनच सिंहगडावर गर्दी केली. एकाच दिवसात गडावर आठ हजारांहून अधिक पर्यटक आल्यामुळे वन विभाग आणि घेरा सिंहगड समितीच्या कार्यकर्त्यांना गाररव्यातही हा घाम फुटला. पर्यटकांच्या गर्दीसाठी वन विभागाने केलेल्या नियोजचा फज्जा उडला. गर्दी रोखण्यासाठी वनाधिकाऱ्यांनी अखेर दुपारी दीड तास गडाचा प्रवेश बंद करावा लागला.
आठवडाभर पडलेल्या पावसामुळे गडावरील वातावरण बदलल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. धुक्यात हरवलेल्या गडावरचे वातावरण अनुभवण्यासाठी आणि पावसात गरमागरम कांदा भजी, पिठलं भाकरी खाण्यासाठी पर्यटकांनी शनिवारीही गर्दी केली होती, पण रविवारी गर्दीने उच्चांक गाठला. सकाळपासूनच गर्दी वाढल्यामुळे अकराच्या दरम्यान गडावरील पार्किंग फुल्ल झाले होते. घाट रस्त्यावर तीन किलोमीटर दूरपर्यंत पर्यटकांच्या गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. गाड्यावर जाणे शक्य नसल्याने संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या स्वयंसेवकांनी पर्यटकांना गाड्या घाट रस्त्यातच कडेला लावायला सांगितल्या. एकीकडे घाट रस्ता व्यापणारे पार्किंग, बेशिस्त वाहनचालक आणि गोळेवाडीला पायथ्याला लागलेल्या पर्यटकांच्या गाड्यांच्या रांगा पाहून अखेरीस वन विभागाने दुपारी दीड तास गाड्यांना गडाच्या पायथ्यापासून प्रवेश बंद ठेवला होता. त्यामुळे गडाच्या पायथ्यापासून डोणजे फाट्यापर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. अखेरीस काही गाड्या सिंहगडाचे दूरूनच दर्शन घेऊन माघारी फिरल्या. वन विभागाचे वनपाल हेमंत मोरे, बाळासाहेब जिवडे, संदीप कोळी यांसह पंचवीस सुरक्षारक्षकांनी वाहतुकीचे नियोजन केले.
...
आज सकाळपासून पर्यटकांची गर्दी वाढली होती. त्यातच गोळेवाडीकडून घाट रस्त्यावर पहिल्याच वळणावर सकाळी सातच्या दरम्यान एक दरड पडली. पण सगळ्यांच्या मदतीने तासाभरात रस्ता रिकामा झाला. दिवसभरात ६४८ चारचाकी वाहने, तसेच १७३० दुचाकी गडावर सोडल्या. यातून ६८ हजार रुपये शुल्क जमा झाले. गडाच्या प्रवेशद्वाराच्या अलीकडे पदपथावर मोठी भेग पडली आहे. उद्या सार्वजनिक बांधकाम विभागाची टीम त्याची दुरुस्ती करणार आहे.
- बाळासाहेब जिवडे, वनरक्षक, खानापूर वन क्षेत्र