म. टा. प्रतिनिधी, पुणे
अकरावी प्रवेशाच्या पाचव्या फेरीच्या पहिल्याच दिवशी एकूण ११ हजार ११६ विद्यार्थ्यांनी आपले सुधारित अर्ज अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीकडे सादर केले. ऑनलाइन अर्जामध्ये कॉलेजांचे प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी कॉलेजांचे कट्ऑफ हा महत्त्वाचा मुद्दा मानला जातो. मात्र, यंदा या फेरीसाठी नेमका कोणता कट्ऑफ गृहित धरून प्राधान्यक्रम नोंदवायचे, हा महत्त्वाचा प्रश्न या फेरीत सहभागी विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
बेटरमेंटच्या एकाच संधीमुळे निर्माण झालेले प्रश्न सोडविण्यासाठी यंदा समितीने पाचव्या ऑनलाइन फेरीचे आयोजन केले आहे. त्यामध्ये लांब अंतरावरील कॉलेज मिळालेले, बेटरमेंट घेऊन बाहेर पडलेले, प्रवेश रद्द केलेले, प्रवेश न घेतलेले, शाखा बदलून हवी असलेले, कॉलेजांच्या पसंतीचा चुकीचा क्रम नोंदविलेले, अन्य कोणत्याही कारणाने कॉलेज बदलून हवे असलेले आणि अद्याप कॉलेजनिश्चिती न मिळालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यासाठी कॉलेजांमधील रिक्त जागांचा तपशील समितीने जाहीर केला होता. त्या आधारे अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू झाली. प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी प्रक्रियेत या पूर्वीच सहभागी असलेल्या १० हजार २२० विद्यार्थ्यांसह ८९६ विद्यार्थ्यांनी प्रक्रियेत नव्याने सहभागी होत हे अर्ज सादर केले आहेत. मंगळवारी पाचव्या फेरीतून कॉलेजांचे प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठीची अखेरची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल. त्या आधारे ४ ऑगस्टला पाचव्या फेरीची कॉलेज निश्चिती जाहीर होणार आहे.
अकरावी प्रवेशाच्या पाचव्या फेरीच्या पहिल्याच दिवशी एकूण ११ हजार ११६ विद्यार्थ्यांनी आपले सुधारित अर्ज अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीकडे सादर केले. ऑनलाइन अर्जामध्ये कॉलेजांचे प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी कॉलेजांचे कट्ऑफ हा महत्त्वाचा मुद्दा मानला जातो. मात्र, यंदा या फेरीसाठी नेमका कोणता कट्ऑफ गृहित धरून प्राधान्यक्रम नोंदवायचे, हा महत्त्वाचा प्रश्न या फेरीत सहभागी विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
बेटरमेंटच्या एकाच संधीमुळे निर्माण झालेले प्रश्न सोडविण्यासाठी यंदा समितीने पाचव्या ऑनलाइन फेरीचे आयोजन केले आहे. त्यामध्ये लांब अंतरावरील कॉलेज मिळालेले, बेटरमेंट घेऊन बाहेर पडलेले, प्रवेश रद्द केलेले, प्रवेश न घेतलेले, शाखा बदलून हवी असलेले, कॉलेजांच्या पसंतीचा चुकीचा क्रम नोंदविलेले, अन्य कोणत्याही कारणाने कॉलेज बदलून हवे असलेले आणि अद्याप कॉलेजनिश्चिती न मिळालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यासाठी कॉलेजांमधील रिक्त जागांचा तपशील समितीने जाहीर केला होता. त्या आधारे अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू झाली. प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी प्रक्रियेत या पूर्वीच सहभागी असलेल्या १० हजार २२० विद्यार्थ्यांसह ८९६ विद्यार्थ्यांनी प्रक्रियेत नव्याने सहभागी होत हे अर्ज सादर केले आहेत. मंगळवारी पाचव्या फेरीतून कॉलेजांचे प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठीची अखेरची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल. त्या आधारे ४ ऑगस्टला पाचव्या फेरीची कॉलेज निश्चिती जाहीर होणार आहे.