म. टा. प्रतिनिधी, पुणे
पाषाण-पंचवटीचा परिसर कोथरूडला जोडण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या बोगद्याच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन तज्ज्ञ सल्लाागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने या कामासाठी मे. सी. व्ही. कांड या सल्लागाराची नेमणूक करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केला आहे. कोथरूड आणि पाषाणला जोडणाऱ्या या रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होणार असली, तरी त्याने पाषाणच्या पंचवटीमधील पर्यावरणाचा ऱ्हास होणार असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
महापालिकेच्या विकास आराखड्याला (डीपी) राज्य सरकारने मान्यता दिली असून, यामध्येच शहराच्या दोन वेगवेगळ्या भागांना जोडण्यासाठी बोगद्यांचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरून (सिंहगड रस्ता) सहकारनगर-तळजाईकडे जाणारा एक बोगदा असून, दुसरा बोगदा कोथरूड आणि पाषाण यांना जोडणारा आहे. या दोन्ही बोगद्यांमुळे वाहनचालकांचे अंतर कमी होणार असून, त्यांचा वेळ वाचणार आहे. या रस्त्याच्या कामाचा पर्यावरण परिणाम अहवाल आणि वाहतूक परिणामांचा अभ्यास महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात येणार असून, त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मे. सी. व्ही. कांड यांची या प्रकल्पाच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार सल्लागार यांना या प्रकल्पाच्या पूर्वगणनपत्रकातील रकमेच्या एक टक्का रक्कम ही निविदा काढण्यापूर्वी करण्यात येणाऱ्या कार्यवाही, प्रक्रियेसाठी दिली जाणार आहे. तसेच, या प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या दीड टक्के रक्कम ही सल्लागार यांना फी म्हणून देण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला असून येत्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत त्यावर निर्णय अपेक्षित आहे.
कोथरूड येथील सुतारदरा आणि पाषाणमधील पंचवटी या दरम्यान हा बोगदा प्रस्तावित आहे. या बोगद्यामुळे कोथरूडहून पाषाण किंवा बाणेर-औंधकडे जाणे सुलभ होणार असून, मोठा वळसा वाचणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या रस्त्याला पंचवटी सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून विरोध केला जात असून, त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार असल्याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.
पाषाण-पंचवटीचा परिसर कोथरूडला जोडण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या बोगद्याच्या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन तज्ज्ञ सल्लाागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने या कामासाठी मे. सी. व्ही. कांड या सल्लागाराची नेमणूक करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केला आहे. कोथरूड आणि पाषाणला जोडणाऱ्या या रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होणार असली, तरी त्याने पाषाणच्या पंचवटीमधील पर्यावरणाचा ऱ्हास होणार असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
महापालिकेच्या विकास आराखड्याला (डीपी) राज्य सरकारने मान्यता दिली असून, यामध्येच शहराच्या दोन वेगवेगळ्या भागांना जोडण्यासाठी बोगद्यांचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरून (सिंहगड रस्ता) सहकारनगर-तळजाईकडे जाणारा एक बोगदा असून, दुसरा बोगदा कोथरूड आणि पाषाण यांना जोडणारा आहे. या दोन्ही बोगद्यांमुळे वाहनचालकांचे अंतर कमी होणार असून, त्यांचा वेळ वाचणार आहे. या रस्त्याच्या कामाचा पर्यावरण परिणाम अहवाल आणि वाहतूक परिणामांचा अभ्यास महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात येणार असून, त्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मे. सी. व्ही. कांड यांची या प्रकल्पाच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार सल्लागार यांना या प्रकल्पाच्या पूर्वगणनपत्रकातील रकमेच्या एक टक्का रक्कम ही निविदा काढण्यापूर्वी करण्यात येणाऱ्या कार्यवाही, प्रक्रियेसाठी दिली जाणार आहे. तसेच, या प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या दीड टक्के रक्कम ही सल्लागार यांना फी म्हणून देण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला असून येत्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत त्यावर निर्णय अपेक्षित आहे.
कोथरूड येथील सुतारदरा आणि पाषाणमधील पंचवटी या दरम्यान हा बोगदा प्रस्तावित आहे. या बोगद्यामुळे कोथरूडहून पाषाण किंवा बाणेर-औंधकडे जाणे सुलभ होणार असून, मोठा वळसा वाचणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या रस्त्याला पंचवटी सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून विरोध केला जात असून, त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार असल्याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.