म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहर आणि आजूबाजूच्या परिसरात परदेशी कंपन्याकडून होत असलेली वाढती गुंतवणूक आणि त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधींमुळे केवळ राष्ट्रीयच नव्हे; तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध शहरांबरोबर पुणे शहर जोडले गेले आहे. त्यामुळे हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही गेल्या काही वर्षात वाढत असल्याचा निष्कर्ष पालिकेने तयार केलेल्या पर्यावरण अहवालामध्ये काढण्यात आला आहे. गेल्या चार वर्षांत विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दुप्पट झाली आहे. २०१३ मध्ये प्रत्येक दिवशी ९ हजार ८०० नागरिक विमानाने प्रवास करत होते. ही संख्या यंदाच्या वर्षी प्रतिदिन १७ हजार ४४१ वर पोहचली आहे.
शहराचा आजूबाजूचा भाग असलेला चाकण, हिंजेवाडी, तळेगाव या भागांत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपले प्रकल्प उभे केले आहेत. शहराला हवाई मार्गाद्वारे जोडणाऱ्या विमानांची संख्याही वाढत असल्याने आपोआप विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. २०१६-१७ या वर्षात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या ६५ लाख १२ हजारावर गेली आहे. चार वर्षांपूर्वी ही संख्या अवघी ३५ लाख ९७ हजार इतकी होती. कमीत कमी वेळेत एका शहरातून दुसऱ्या शहरांमध्ये जाता यावे, यासाठी अनेक विमान कंपन्यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्याने याचा फायदा घेत विमानप्रवासाला नागरिक प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे. याबरोबरच पुणे शहरातून दुबई, अबू धाबी या शहरांमध्ये थेट जाण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, पुढील काळात मस्कत, शारजा यांसह इतर देशांमध्ये जाण्यासाठी थेट सेवा उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक वाढणार आहे.
रेल्वे, बस प्रवासी घटले
विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे एसटी महामंडळाच्या बसने तसेच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मात्र घटत असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी (२०५ १६) रेल्वेने प्रतिदिन २ लाख १८ हजार नागरिक प्रवास करत होते. यंदाच्या वर्षी ही संख्या २ लाख १७ हजारावर आली आहे. तर एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्येही मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षी प्रतिदिन ३ लाख २३ हजार प्रवासी होते. ते आता ३ लाख ४ हजारांवर आली आहे.
शहर आणि आजूबाजूच्या परिसरात परदेशी कंपन्याकडून होत असलेली वाढती गुंतवणूक आणि त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधींमुळे केवळ राष्ट्रीयच नव्हे; तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध शहरांबरोबर पुणे शहर जोडले गेले आहे. त्यामुळे हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही गेल्या काही वर्षात वाढत असल्याचा निष्कर्ष पालिकेने तयार केलेल्या पर्यावरण अहवालामध्ये काढण्यात आला आहे. गेल्या चार वर्षांत विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दुप्पट झाली आहे. २०१३ मध्ये प्रत्येक दिवशी ९ हजार ८०० नागरिक विमानाने प्रवास करत होते. ही संख्या यंदाच्या वर्षी प्रतिदिन १७ हजार ४४१ वर पोहचली आहे.
शहराचा आजूबाजूचा भाग असलेला चाकण, हिंजेवाडी, तळेगाव या भागांत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपले प्रकल्प उभे केले आहेत. शहराला हवाई मार्गाद्वारे जोडणाऱ्या विमानांची संख्याही वाढत असल्याने आपोआप विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. २०१६-१७ या वर्षात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या ६५ लाख १२ हजारावर गेली आहे. चार वर्षांपूर्वी ही संख्या अवघी ३५ लाख ९७ हजार इतकी होती. कमीत कमी वेळेत एका शहरातून दुसऱ्या शहरांमध्ये जाता यावे, यासाठी अनेक विमान कंपन्यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्याने याचा फायदा घेत विमानप्रवासाला नागरिक प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे. याबरोबरच पुणे शहरातून दुबई, अबू धाबी या शहरांमध्ये थेट जाण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, पुढील काळात मस्कत, शारजा यांसह इतर देशांमध्ये जाण्यासाठी थेट सेवा उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक वाढणार आहे.
रेल्वे, बस प्रवासी घटले
विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे एसटी महामंडळाच्या बसने तसेच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मात्र घटत असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी (२०५ १६) रेल्वेने प्रतिदिन २ लाख १८ हजार नागरिक प्रवास करत होते. यंदाच्या वर्षी ही संख्या २ लाख १७ हजारावर आली आहे. तर एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्येही मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षी प्रतिदिन ३ लाख २३ हजार प्रवासी होते. ते आता ३ लाख ४ हजारांवर आली आहे.