अ‍ॅपशहर

विमानतळ गेल्यामुळे खेडमध्ये वाटले पेढे

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प अखेर पुरंदर तालुक्यात होत असल्यामुळे कोये-धामणे-पाईट गावातील शेतकऱ्यांनी पेढे वाटून व फटाके फोडून आनंद व्यक्त केला

Maharashtra Times 25 Sep 2016, 3:00 am
विमानतळ गेल्यामुळे खेडमध्ये वाटले पेढे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम airport issue
विमानतळ गेल्यामुळे खेडमध्ये वाटले पेढे


राजगुरूनगर : खेड तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प अखेर पुरंदर तालुक्यात होत असल्यामुळे कोये-धामणे-पाईट गावातील शेतकऱ्यांनी पेढे वाटून व फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
भामा-आसखेड धरणालगतच असणाऱ्या या गावांतील जमिनीवर विमानतळ प्रस्तावित होते; परंतु या विमानतळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान हाोईल, या भीतीमुळे शेतकऱ्यांचा या विमानतळाला तीव्र विरोध होता. विमानतळ होऊ नये म्हणून संबधित शेतकऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने केली होती. ज्या जमिनीवर हे विमानतळ प्रस्तावित होते, ती बहुतांश जमीन बागायत असल्यामुळे जमीन देण्यास शेतकरी तयार नव्हते. ही जागा सपाट असून विमानतळास योग्य असल्याचा अहवाल संबंधित विभागाने सरकारला दिला होता.
या वेळी पप्पू राळे, जयसिंग दरेकर, बळवंत डांगले, काळूराम कोळेकर, अंकुश कोळेकर, पोपट राळे, अरुण करंडे, राजू कोळेकर, सुनील राळे, साहेबराव राळे, माऊली कोळेकर, संजय कोळेकर आदी शेतकरी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज