मटा ऑनलाइन वृत्त। बारामती
मराठा मूकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा समाजाच्या मागासलेपणासाठी राज्य सरकारच्या निष्क्रियतेकडे बोट दाखवत सरकारविरूद्धच्या संघर्षात उडी घेतली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मराठा आरक्षणाबाबत भाष्य करत मराठा आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘अनेकांना आरक्षण हवं असतं मात्र, जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा सर्वजण आरक्षण लपवतात आणि आम्ही कसे वरच्या दर्जाचे आहोत याचाच खटाटोप करत असतात.’ असं वक्तव्यं करत अजित पवार यांनी मराठा मूकमोर्चाच्या माध्यमातून होणारी चर्चा आरक्षणाकडे वळती करण्याचा प्रयत्न केला आहे.
बारामती पंचायत समितीच्यावतीनं मोरोपंत सभागृहात पार पडलेल्या गुणगौरव सोहळ्यात पवार बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत बोलत असताना ते आपल्या खास शैलीत पुढे म्हणाले, ‘माझ्यासह सगळ्यांना आरक्षण पाहिजे आहे, मात्र लग्नसमारंभ या गोष्टी आल्या की मग सगळे आरक्षण बाजूला ठेवून आम्ही कडूतले नाही, आम्ही वरच्या दर्जाचे, लय लय वरचे असे सांगायलाही विसरत नाहीत. याबाबत मी खूप ऐकलं आहे. जाऊ दे आता काही जास्त बोलत नाही. मागं काय काय बोलून माझं लय वंगाळ झालंय’, असं म्हणत पवार यांनी आरक्षणाबाबतच्या मराठा समाजाच्या मानसिकतेवर बोट ठेवलं आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक आहे. मराठा समाजाच्या आजच्या स्थितीला आमच्या पूर्वीचे राज्यकर्ते जबाबदार असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजातील प्रस्तापितांनी मराठा समाजावर अन्याय केल्याची टीका केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा आरोप फेटाळून लावत फडणवीस सरकारलाच जबाबदार धरले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आरक्षणाबाबतचं हे सूचक वक्तव्यं केलं आहे.
मराठा मूकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा समाजाच्या मागासलेपणासाठी राज्य सरकारच्या निष्क्रियतेकडे बोट दाखवत सरकारविरूद्धच्या संघर्षात उडी घेतली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मराठा आरक्षणाबाबत भाष्य करत मराठा आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘अनेकांना आरक्षण हवं असतं मात्र, जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा सर्वजण आरक्षण लपवतात आणि आम्ही कसे वरच्या दर्जाचे आहोत याचाच खटाटोप करत असतात.’ असं वक्तव्यं करत अजित पवार यांनी मराठा मूकमोर्चाच्या माध्यमातून होणारी चर्चा आरक्षणाकडे वळती करण्याचा प्रयत्न केला आहे.
बारामती पंचायत समितीच्यावतीनं मोरोपंत सभागृहात पार पडलेल्या गुणगौरव सोहळ्यात पवार बोलत होते. मराठा आरक्षणाबाबत बोलत असताना ते आपल्या खास शैलीत पुढे म्हणाले, ‘माझ्यासह सगळ्यांना आरक्षण पाहिजे आहे, मात्र लग्नसमारंभ या गोष्टी आल्या की मग सगळे आरक्षण बाजूला ठेवून आम्ही कडूतले नाही, आम्ही वरच्या दर्जाचे, लय लय वरचे असे सांगायलाही विसरत नाहीत. याबाबत मी खूप ऐकलं आहे. जाऊ दे आता काही जास्त बोलत नाही. मागं काय काय बोलून माझं लय वंगाळ झालंय’, असं म्हणत पवार यांनी आरक्षणाबाबतच्या मराठा समाजाच्या मानसिकतेवर बोट ठेवलं आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक आहे. मराठा समाजाच्या आजच्या स्थितीला आमच्या पूर्वीचे राज्यकर्ते जबाबदार असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजातील प्रस्तापितांनी मराठा समाजावर अन्याय केल्याची टीका केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा आरोप फेटाळून लावत फडणवीस सरकारलाच जबाबदार धरले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आरक्षणाबाबतचं हे सूचक वक्तव्यं केलं आहे.