म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी या मार्गातील आनंदनगर ते आबासाहेब गरवारे कॉलेजपर्यंत, तर पिंपरी ते स्वारगेट या दुसऱ्या मार्गावरील संत तुकाराम नगर ते फुगेवाडीपर्यंत मेट्रो रेल्वे ही मार्च महिनाअखेरीस सुरू होणार आहे. या दोन मार्गांबरोबरच शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गासाठी भूसंपादनाचे काम सुरू केले जाणार असून, हे तिन्ही मार्ग २०२२ पर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू होतील,' असे केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. बैठकीला खासदार गिरीश बापट, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि अमर साबळे, पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ढोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले, 'पुणे मेट्रोचे तिन्ही मार्ग २०२२ पर्यंत पूर्ण केले जाणार आहेत. तत्पूर्वी मार्च महिन्यापर्यंत दोन मार्गांवर मेट्रो रेल्वे सुरू होणार आहे. या दोन मार्गांचे विस्तारीकरण करण्याची मागणी आहे. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.' केंद्र सरकार पायाभूत सुविधांवर येत्या पाच वर्षांत १०३ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे; तसेच पुण्यातील वाहतुकीच्या आढाव्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
'जायका' २०२३ पर्यंत होणार
'मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्पाचे (जायका) काम रखडले आहे. आता हे काम वेगाने करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या स्वतंत्र बैठका घेतल्या जाणार आहेत. गेली तीन वर्षे माझ्याकडे या खात्याचे मंत्रिपद नव्हते. आता हा प्रकल्प मार्गी लावला जाणार आहे,' असे जावडेकर यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून मार्च २०१६ पर्यंत प्रकल्प सल्लागार नेमणे प्रस्तावित होते. पेल फ्रिशमन आणि अन्य प्रकल्प सल्लागारांची १६ जानेवारी २०१८ रोजी नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकल्प अहवालानुसार एप्रिल २०२१ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणे प्रस्तावित होते. मात्र, सल्लागारांच्या नेमणुकीनुसार जुलै २०२३ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून बैठकीत देण्यात आली.
ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प
देशातील तीन हजारांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार लवकरच अध्यादेश काढणार आहे, अशी माहिती जावडेकर यांनी दिली. ते म्हणाले, 'तीन हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत.' औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांतील प्रदूषणावर लक्ष ठेवण्यात येत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी येत्या एक एप्रिलपासून बीएस ६ प्रणालीची वाहने बाजारपेठेत आणण्यात येणार आहेत, असेही जावडेकर यांनी स्पष्ट केले.
पुणे मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी या मार्गातील आनंदनगर ते आबासाहेब गरवारे कॉलेजपर्यंत, तर पिंपरी ते स्वारगेट या दुसऱ्या मार्गावरील संत तुकाराम नगर ते फुगेवाडीपर्यंत मेट्रो रेल्वे ही मार्च महिनाअखेरीस सुरू होणार आहे. या दोन मार्गांबरोबरच शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गासाठी भूसंपादनाचे काम सुरू केले जाणार असून, हे तिन्ही मार्ग २०२२ पर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू होतील,' असे केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. बैठकीला खासदार गिरीश बापट, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि अमर साबळे, पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ढोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले, 'पुणे मेट्रोचे तिन्ही मार्ग २०२२ पर्यंत पूर्ण केले जाणार आहेत. तत्पूर्वी मार्च महिन्यापर्यंत दोन मार्गांवर मेट्रो रेल्वे सुरू होणार आहे. या दोन मार्गांचे विस्तारीकरण करण्याची मागणी आहे. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.' केंद्र सरकार पायाभूत सुविधांवर येत्या पाच वर्षांत १०३ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे; तसेच पुण्यातील वाहतुकीच्या आढाव्यासाठी बैठक घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
'जायका' २०२३ पर्यंत होणार
'मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्पाचे (जायका) काम रखडले आहे. आता हे काम वेगाने करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या स्वतंत्र बैठका घेतल्या जाणार आहेत. गेली तीन वर्षे माझ्याकडे या खात्याचे मंत्रिपद नव्हते. आता हा प्रकल्प मार्गी लावला जाणार आहे,' असे जावडेकर यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून मार्च २०१६ पर्यंत प्रकल्प सल्लागार नेमणे प्रस्तावित होते. पेल फ्रिशमन आणि अन्य प्रकल्प सल्लागारांची १६ जानेवारी २०१८ रोजी नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकल्प अहवालानुसार एप्रिल २०२१ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणे प्रस्तावित होते. मात्र, सल्लागारांच्या नेमणुकीनुसार जुलै २०२३ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून बैठकीत देण्यात आली.
ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प
देशातील तीन हजारांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार लवकरच अध्यादेश काढणार आहे, अशी माहिती जावडेकर यांनी दिली. ते म्हणाले, 'तीन हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत.' औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांतील प्रदूषणावर लक्ष ठेवण्यात येत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी येत्या एक एप्रिलपासून बीएस ६ प्रणालीची वाहने बाजारपेठेत आणण्यात येणार आहेत, असेही जावडेकर यांनी स्पष्ट केले.