जालना : नोटाबंदी, करोना, गारपिटीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी यावर्षी तातडीने पीक कर्ज वाटप करण्याची मागणी माजी आमदार विलास खरात यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे केली आहे. दरवर्षी या कालावधीत पीक कर्ज घेऊन खरीप हंगामाचा खर्च भागवत असतो. परंतु, ऐन पेरणी कालावधीत आर्थिक संकट उद्भवू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पीक कर्ज वाटपाचे संबधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सहकार्य करावे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
‘पीक कर्ज वाटप करा’
नोटाबंदी, करोना, गारपिटीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी यावर्षी तातडीने पीक कर्ज वाटप करण्याची मागणी माजी आमदार ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 May 2020, 4:00 am