तळमजल्यावरील पार्किंगबाबत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची माहिती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
सोसायट्यांमधील इमारतींच्या तळमजल्यावरील पार्किंगपैकी किमान ३० टक्के भागावर काँक्रिटीकरण करता येणार नाही, असा नियम करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. पावसाचे साठू नये यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे.
यासंदर्भात आमदार अनंत गाडगीळ यांनी विधान परिषदेत विषय उपस्थित केला होता. पावसाळ्यात पुणे-मुंबईसह अनेक शहरांमध्ये पावसाचे पाणी साठून पूरस्थिती निर्माण होते. या शहरांमध्ये पुरेशी गटाने नसतात आणि सगळीकडे काँक्रिटीकरण केल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याची मागणी गाडगीळ यांनी केली होती. तेव्हा इमारतींमध्ये तळमजल्यावर किमान तीस टक्के भागावर काँक्रिटीकरण करता येणार नाही, असे कदम यांनी सांगितले. ‘वाहनांची चाचणी करताना त्यात आरोग्य व पर्यावरणास घातक अशा पीएम २.५ घटकाचीही चाचणी बंधनकारक करण्यात येईल,’ असेही कदम म्हणाले.
विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात बारा हजार आरसी बुक व साडेसहा हजार लायसेन्स वितरित न होणे, शहरातील बोगस डॉक्टर्स, निष्क्रिय संस्थांची नोंदणी रद्द करणे, पुणे ते कोलाड मार्गाची दुरवस्था, सायबर गुन्ह्यांचा तपास न लागणे, रुग्णालयांना आवश्यक उपकरणे असे विविध विषय उपस्थित केल्याची माहिती गाडगीळ यांनी पत्रकारांना दिली.
टॉकिंग पॉइंट्स
भारतीय जनता पक्षाचे नेते अनेकदा उलटसुलट आरोप करतात, त्यांना उत्तरे देण्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्ता कमी पडतो. त्यासाठी शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये आपण दरमहा कार्यकर्त्यांची बैठक (टॉकिंग पॉइंट्स) घेऊन त्यांना राजकीय सद्यस्थिती आणि पक्षाची भूमिका सांगून मुद्दे मांडण्याचे प्रशिक्षण देणार आहोत, असे गाडगीळ यांनी सांगितले.
म. टा. प्रतिनिधी, पुणे
सोसायट्यांमधील इमारतींच्या तळमजल्यावरील पार्किंगपैकी किमान ३० टक्के भागावर काँक्रिटीकरण करता येणार नाही, असा नियम करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. पावसाचे साठू नये यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे.
यासंदर्भात आमदार अनंत गाडगीळ यांनी विधान परिषदेत विषय उपस्थित केला होता. पावसाळ्यात पुणे-मुंबईसह अनेक शहरांमध्ये पावसाचे पाणी साठून पूरस्थिती निर्माण होते. या शहरांमध्ये पुरेशी गटाने नसतात आणि सगळीकडे काँक्रिटीकरण केल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याची मागणी गाडगीळ यांनी केली होती. तेव्हा इमारतींमध्ये तळमजल्यावर किमान तीस टक्के भागावर काँक्रिटीकरण करता येणार नाही, असे कदम यांनी सांगितले. ‘वाहनांची चाचणी करताना त्यात आरोग्य व पर्यावरणास घातक अशा पीएम २.५ घटकाचीही चाचणी बंधनकारक करण्यात येईल,’ असेही कदम म्हणाले.
विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात बारा हजार आरसी बुक व साडेसहा हजार लायसेन्स वितरित न होणे, शहरातील बोगस डॉक्टर्स, निष्क्रिय संस्थांची नोंदणी रद्द करणे, पुणे ते कोलाड मार्गाची दुरवस्था, सायबर गुन्ह्यांचा तपास न लागणे, रुग्णालयांना आवश्यक उपकरणे असे विविध विषय उपस्थित केल्याची माहिती गाडगीळ यांनी पत्रकारांना दिली.
टॉकिंग पॉइंट्स
भारतीय जनता पक्षाचे नेते अनेकदा उलटसुलट आरोप करतात, त्यांना उत्तरे देण्यासाठी काँग्रेसचा कार्यकर्ता कमी पडतो. त्यासाठी शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये आपण दरमहा कार्यकर्त्यांची बैठक (टॉकिंग पॉइंट्स) घेऊन त्यांना राजकीय सद्यस्थिती आणि पक्षाची भूमिका सांगून मुद्दे मांडण्याचे प्रशिक्षण देणार आहोत, असे गाडगीळ यांनी सांगितले.