अ‍ॅपशहर

माझ्या मंत्रालयाबाबत इतरांनाच आत्मियता

‘केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचा मंत्री असूनही, मी आजपर्यंत या मंत्रालयाविषयी कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र, या खात्याची जबाबदारी नसलेले लोक माझ्या मंत्रालयाविषयीच्या विविध घोषणा करीत आहेत,’ अशी टीका केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी शुक्रवारी केली. तसेच, मला काय करायचे आहे, चांगलेच माहिती आहे, असेही गीते या वेळी म्हणाले.

Maharashtra Times 16 Dec 2017, 4:16 am
अवजड उद्योगमंत्री अनंत गीतेंचा टोला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anant geete slams to oppositions
माझ्या मंत्रालयाबाबत इतरांनाच आत्मियता


म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचा मंत्री असूनही, मी आजपर्यंत या मंत्रालयाविषयी कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र, या खात्याची जबाबदारी नसलेले लोक माझ्या मंत्रालयाविषयीच्या विविध घोषणा करीत आहेत,’ अशी टीका केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी शुक्रवारी केली. तसेच, मला काय करायचे आहे, चांगलेच माहिती आहे, असेही गीते या वेळी म्हणाले.
‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ (एआरएआय), ‘सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनीअर्स इंडिया’ (एसएई- इंडिया) आणि ‘इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर्स’ (आयईईई) यांच्यातर्फे आयोजित ‘आयटेक इंडिया २०१७’ परिषदेच्या समारोपात गीते बोलत होते. टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष आणि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. ए. के. जिंदाल, कॅनडा येथील काँकोर्डिया विद्यापीठातील सहप्राध्यापक डॉ. अक्षयकुमार राठोड, एसएई- इंडियाचे उपमहासंचालक के. वेंकटराज, ‘एआरएआय’च्या संचालक रश्मी उर्ध्वरेषे, डॉ. टोमी सेबॅस्टियन, ‘एआरएआय’च्या महाव्यवस्थापिका उज्ज्वला कारले आदी यावेळी उपस्थित होते. या वेळी ‘एआरएआय’तर्फे स्थापन करण्यात आलेल्या ‘ई-मोबिलिटी सेंटर ऑफ एक्सलन्स’ची कोनशिला गीते यांच्या हस्ते बसविण्यात आली.
‘संपूर्ण जगाला वाढणाऱ्या प्रदूषणाची आणि मर्यादित खनिज तेलाची चिंता आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक उर्जेवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या बॅटरीची किंमत महाग आहे, त्यामुळे या गाड्याही महाग आहेत. त्यादृष्टीने बदलता येणाऱ्या बॅटऱ्या, बॅटरीचे उत्पादन आणि चार्जिंग स्टेशन, यांसारख्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा विचार सुरू आहे. इलेक्ट्रीक मोबॅलिटीसाठी धोरण तयार केले असून ते सर्वसमावेशक असेल,’ असे गीते म्हणाले.
देशाला लागणाऱ्या एकूण खनिज तेलापैकी ७० टक्के तेल आयात केले जाते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च होते. भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वस्तातील बॅटरी उत्पादनासाठी ‘एआरएआय’ सारख्या संशोधन संस्था, संशोधक आणि उद्योगांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असेही गीते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज