‘एआरएआय’, कॉग्निझंट यांची संयुक्त निर्मिती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
टेस्टिंग ट्रॅकवर धावणारी छोटेखानी इलेक्ट्रिक कार वाटेत असलेल्या पादचाऱ्याला पाहून थांबते आणि समोर असलेल्या दुसऱ्या गाडीला बाजूने सुरक्षितरित्या ओलांडून पुढे जाते...ते पाहून केंद्रीय मंत्र्यांससह उपस्थित सर्वजण टाळ्यांचा कडकडाट करतात. कारण ही ‘ऑटोनॉमस’ म्हणजेच स्वयंचलित कार सर्वार्थाने चालकरहित असते.
पुण्यातील ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ (एआरएआय) कॉग्निझंट कंपनीच्या सहकार्याने या प्रकल्पावर काम करत आहे. त्याची पहिली झलक ‘एआरएआय’मध्ये आयोजित ‘एसआयएटी’ प्रदर्शनाच्या समारोपाप्रसंगी शनिवारी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांना दाखविण्यात आली.
अपघात रोखण्यासाठी कायम सतर्क असणारी आणि आणीबाणीच्या प्रसंगी भावनारहित निर्णय घेणारी ही कार लवकरच प्रत्यक्षात येऊ शकेल. वाहनचालकरहित गाडीपेक्षा वाहनचालकाला साह्यभूत ठरेल आणि प्रवास अधिक आरामदायी, सुखकर आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सुरक्षित करेल, अशी यंत्रणा या कारवर बसविण्यात येणार आहे. सध्या एका इलेक्ट्रिक कारवर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यावर कंट्रोल सिस्टिम्सच्या साह्याने विविध तंत्रज्ञानांचा वापर करून चाचणी घेण्यात येत आहे.
या यंत्रणेबाबत एआरएआयचे वरिष्ठ उपसंचालक एम. आर. सराफ यांनी ‘मटा’ला माहिती दिली. ‘ही कार स्वयंचलित तंत्रज्ञानावर आधारित असली, तरी चालकरहित नसेल; तर चालकाला मदत करणारी, त्याच्यावरील ताण कमी करणारी आणि आणीबाणीच्या क्षणी गाडीचा ताबा घेऊन सुरक्षित मार्ग काढणारी यंत्रणा असे तिचे स्वरूप असेल.’या यंत्रणेमध्ये कॅमेरा, सेन्सर्स आणि रडारचा वापर करण्यात आला आहे. एकूण सहा टप्प्यात ही यंत्रणा विकसित केली जाईल. सराफ म्हणाले, ‘ही यंत्रणा म्हणजे बेस्ट ड्रायव्हर्स ब्रेन असेल. सर्वोत्तम चालकांच्या अनुभवावर आधारित अल्गोरिदम विकसित करण्यात येतील. अपघाताच्या वेळी किंवा गडबडीच्या वेळी चालक घाबरून गोंधळून जातात. त्याचक्षणी योग्य निर्णय घेऊन कार्यवाही आवश्यक असते. तेच काम ही यंत्रणा अचूक रीतीने करू शकेल. यासाठी एआरएआय सुरक्षा निकष, वाहतुकीचे नियम, सुरक्षितता आणि चाचणी या क्षेत्रावर काम करत असून, कॉग्निझंटतर्फे त्यासाठीच्या कंट्रोल सिस्टिम्स विकसित केल्या जात आहेत. इंटरनेट ऑफ थिंग्जच्या धर्तीवर इंटरनेट ऑफ व्हेइकलच्या माध्यमातून हवामान, रस्त्याची स्थिती, एकूण अंतर या बाबी इनपुट म्हणून या यंत्रणेला पुरविल्या जातील.’
म. टा. प्रतिनिधी, पुणे
टेस्टिंग ट्रॅकवर धावणारी छोटेखानी इलेक्ट्रिक कार वाटेत असलेल्या पादचाऱ्याला पाहून थांबते आणि समोर असलेल्या दुसऱ्या गाडीला बाजूने सुरक्षितरित्या ओलांडून पुढे जाते...ते पाहून केंद्रीय मंत्र्यांससह उपस्थित सर्वजण टाळ्यांचा कडकडाट करतात. कारण ही ‘ऑटोनॉमस’ म्हणजेच स्वयंचलित कार सर्वार्थाने चालकरहित असते.
पुण्यातील ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ (एआरएआय) कॉग्निझंट कंपनीच्या सहकार्याने या प्रकल्पावर काम करत आहे. त्याची पहिली झलक ‘एआरएआय’मध्ये आयोजित ‘एसआयएटी’ प्रदर्शनाच्या समारोपाप्रसंगी शनिवारी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांना दाखविण्यात आली.
अपघात रोखण्यासाठी कायम सतर्क असणारी आणि आणीबाणीच्या प्रसंगी भावनारहित निर्णय घेणारी ही कार लवकरच प्रत्यक्षात येऊ शकेल. वाहनचालकरहित गाडीपेक्षा वाहनचालकाला साह्यभूत ठरेल आणि प्रवास अधिक आरामदायी, सुखकर आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सुरक्षित करेल, अशी यंत्रणा या कारवर बसविण्यात येणार आहे. सध्या एका इलेक्ट्रिक कारवर ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यावर कंट्रोल सिस्टिम्सच्या साह्याने विविध तंत्रज्ञानांचा वापर करून चाचणी घेण्यात येत आहे.
या यंत्रणेबाबत एआरएआयचे वरिष्ठ उपसंचालक एम. आर. सराफ यांनी ‘मटा’ला माहिती दिली. ‘ही कार स्वयंचलित तंत्रज्ञानावर आधारित असली, तरी चालकरहित नसेल; तर चालकाला मदत करणारी, त्याच्यावरील ताण कमी करणारी आणि आणीबाणीच्या क्षणी गाडीचा ताबा घेऊन सुरक्षित मार्ग काढणारी यंत्रणा असे तिचे स्वरूप असेल.’या यंत्रणेमध्ये कॅमेरा, सेन्सर्स आणि रडारचा वापर करण्यात आला आहे. एकूण सहा टप्प्यात ही यंत्रणा विकसित केली जाईल. सराफ म्हणाले, ‘ही यंत्रणा म्हणजे बेस्ट ड्रायव्हर्स ब्रेन असेल. सर्वोत्तम चालकांच्या अनुभवावर आधारित अल्गोरिदम विकसित करण्यात येतील. अपघाताच्या वेळी किंवा गडबडीच्या वेळी चालक घाबरून गोंधळून जातात. त्याचक्षणी योग्य निर्णय घेऊन कार्यवाही आवश्यक असते. तेच काम ही यंत्रणा अचूक रीतीने करू शकेल. यासाठी एआरएआय सुरक्षा निकष, वाहतुकीचे नियम, सुरक्षितता आणि चाचणी या क्षेत्रावर काम करत असून, कॉग्निझंटतर्फे त्यासाठीच्या कंट्रोल सिस्टिम्स विकसित केल्या जात आहेत. इंटरनेट ऑफ थिंग्जच्या धर्तीवर इंटरनेट ऑफ व्हेइकलच्या माध्यमातून हवामान, रस्त्याची स्थिती, एकूण अंतर या बाबी इनपुट म्हणून या यंत्रणेला पुरविल्या जातील.’