म. टा. प्रतिनिधी, पुणे
'अयोध्येत बुद्ध मंदिर असल्याचे उत्खननामध्ये आढळून आले आहे. त्यामुळे या ठिकाणी राम मंदिर आणि मशिदीबरोबरच बुद्ध मंदिर उभारण्यासाठी जागा द्यावी,' अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. 'राममंदिराला पाठिंबा आहे. मात्र, हे मंदिर बेकायदा उभारण्यात येऊ नये,' असे त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला भेट देऊन राम मंदिर उभारण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर आठवले यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष एम. डी. शेवाळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष गंगाधर आंबेडकर, शहराध्यक्ष अशोक कांबळे, परशुराम वाडेकर आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, 'अयोध्येच्या ठिकाणी बुद्ध मंदिर असल्याचे उत्खननामध्ये आढळून आले आहे. अयोध्येत बुद्ध मंदिर बांधण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहे. राममंदिर उभारण्याला पाठिंबा आहे; परंतु हे मंदिर बेकायदा उभारण्यात येऊ नये. राममंदिराबाबत सुप्रीम कोर्टामध्ये दाखल असलेल्या याचिकेचा निकाल जानेवारी महिन्यामध्ये लागणार आहे. तोपर्यंत बेकायदा राम मंदिर उभारण्यात येऊ नये. राम मंदिर साडेचार एकर जागेत, तर सव्वा दोन एकर जागेत मशिद बांधण्यात यावी. उर्वरित जागेत बुद्ध मंदिर उभारावे. त्यातून राष्ट्रीय एकात्मता दिसून येईल.'
उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराची मागणी केल्यामुळे शिवसेनेला याचा फायदा होणार का, याबाबत विचारणा करण्यात आली असता आठवले म्हणाले, 'शिवसेनेला याचा फायदा होणार नाही. राम मंदिर उभारणीचा मूळ विषय भाजपचा आहे. मात्र, राम मंदिरापेक्षा 'सब का साथ, सब का विकास' या मुद्यावर भाजपला जास्त जागा मिळाल्या.' 'ठाकरे यांनी मुस्लिम समाजाच्या भावनेचा विचार करावा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पाकिस्तानधार्जिण्या मुस्लिमांना विरोध होता. मात्र, अन्य मुस्लिमांना त्यांचा पाठिंबा होता,' असे त्यांनी नमूद केले. 'एल्गार परिषदेमुळे भीमा कोरेगावमध्ये दंगल घडली, या मताशी मी सहमत नाही. हा पूर्वनियोजित प्रकार होता. वादातून हा प्रकार घडला आहे. एक जानेवारीला भीमा कोरेगावमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी. वंचित बहुजन आघाडीमुळे कोणताही परिणाम होणार नाही. त्यांच्यापेक्षाही मोठा मेळावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून घेतला जाणार आहे.' असे त्यांनी सांगितले.
भिडेंवर कारवाई करा
'संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात संबंध आहे का, याचे पुरावे तपासण्याचे काम सुरू आहे. मात्र, भिडे यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आणि असंसदीय वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी.' अशी मागणी आठवले यांनी केली.
'मीही अयोध्येला जाणार आहे'
'ठाकरे यांनी राम मंदिरासाठी अयोध्यावारी केली आहे. त्यांना तेथे चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राम मंदिरासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असल्याची बाब चांगली असली, तरी राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्यासाठी आग्रही राहू नये.' असेही आठवले यांनी स्पष्ट केले. 'अयोध्यामधील काही व्यक्तीकडून निमंत्रण मिळाले असून, मीदेखील लवकरच अयोध्येला जाणार आहे.' असे त्यांनी जाहीर केले.
मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण, छत्तीसगड आणि मेघालय या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका म्हणजे लोकसभेची रंगीत तालीम नाही. लोकसभेमध्ये मतदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम बघून मतदान करणार आहेत. आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना भाजपबरोबर राहील.
- रामदास आठवले
'अयोध्येत बुद्ध मंदिर असल्याचे उत्खननामध्ये आढळून आले आहे. त्यामुळे या ठिकाणी राम मंदिर आणि मशिदीबरोबरच बुद्ध मंदिर उभारण्यासाठी जागा द्यावी,' अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. 'राममंदिराला पाठिंबा आहे. मात्र, हे मंदिर बेकायदा उभारण्यात येऊ नये,' असे त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला भेट देऊन राम मंदिर उभारण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर आठवले यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष एम. डी. शेवाळे, राष्ट्रीय उपाध्यक्ष गंगाधर आंबेडकर, शहराध्यक्ष अशोक कांबळे, परशुराम वाडेकर आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, 'अयोध्येच्या ठिकाणी बुद्ध मंदिर असल्याचे उत्खननामध्ये आढळून आले आहे. अयोध्येत बुद्ध मंदिर बांधण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहे. राममंदिर उभारण्याला पाठिंबा आहे; परंतु हे मंदिर बेकायदा उभारण्यात येऊ नये. राममंदिराबाबत सुप्रीम कोर्टामध्ये दाखल असलेल्या याचिकेचा निकाल जानेवारी महिन्यामध्ये लागणार आहे. तोपर्यंत बेकायदा राम मंदिर उभारण्यात येऊ नये. राम मंदिर साडेचार एकर जागेत, तर सव्वा दोन एकर जागेत मशिद बांधण्यात यावी. उर्वरित जागेत बुद्ध मंदिर उभारावे. त्यातून राष्ट्रीय एकात्मता दिसून येईल.'
उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराची मागणी केल्यामुळे शिवसेनेला याचा फायदा होणार का, याबाबत विचारणा करण्यात आली असता आठवले म्हणाले, 'शिवसेनेला याचा फायदा होणार नाही. राम मंदिर उभारणीचा मूळ विषय भाजपचा आहे. मात्र, राम मंदिरापेक्षा 'सब का साथ, सब का विकास' या मुद्यावर भाजपला जास्त जागा मिळाल्या.' 'ठाकरे यांनी मुस्लिम समाजाच्या भावनेचा विचार करावा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पाकिस्तानधार्जिण्या मुस्लिमांना विरोध होता. मात्र, अन्य मुस्लिमांना त्यांचा पाठिंबा होता,' असे त्यांनी नमूद केले. 'एल्गार परिषदेमुळे भीमा कोरेगावमध्ये दंगल घडली, या मताशी मी सहमत नाही. हा पूर्वनियोजित प्रकार होता. वादातून हा प्रकार घडला आहे. एक जानेवारीला भीमा कोरेगावमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी. वंचित बहुजन आघाडीमुळे कोणताही परिणाम होणार नाही. त्यांच्यापेक्षाही मोठा मेळावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून घेतला जाणार आहे.' असे त्यांनी सांगितले.
भिडेंवर कारवाई करा
'संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात संबंध आहे का, याचे पुरावे तपासण्याचे काम सुरू आहे. मात्र, भिडे यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आणि असंसदीय वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी.' अशी मागणी आठवले यांनी केली.
'मीही अयोध्येला जाणार आहे'
'ठाकरे यांनी राम मंदिरासाठी अयोध्यावारी केली आहे. त्यांना तेथे चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राम मंदिरासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असल्याची बाब चांगली असली, तरी राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्यासाठी आग्रही राहू नये.' असेही आठवले यांनी स्पष्ट केले. 'अयोध्यामधील काही व्यक्तीकडून निमंत्रण मिळाले असून, मीदेखील लवकरच अयोध्येला जाणार आहे.' असे त्यांनी जाहीर केले.
मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण, छत्तीसगड आणि मेघालय या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका म्हणजे लोकसभेची रंगीत तालीम नाही. लोकसभेमध्ये मतदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम बघून मतदान करणार आहेत. आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना भाजपबरोबर राहील.
- रामदास आठवले