पुणे: 'सैराट' हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीतील मैलाचा दगड. यामध्ये अभिनय करणारे अभिनेते आणि अभिनेत्री एका रात्रीत स्टार झाले. त्यातीलच एक म्हणजे अरबाज शेख, अरबाज शेख याने सैराट (Sairat) चित्रपटात सल्ल्याची भूमिका साकारली होती. रातोरात स्टार झाल्या या अभिनेत्याला पुण्यात रिक्षावाल्याकडून मनस्ताप सहन करावा लागला आहे. याबाबत अरबाजने (Arbaz Shaikh) फेसबुक पोस्ट करत हे असले प्रकार थांबले पाहिजेत अशी मागणी केली आहे. (Auto Rickshaw driver misbehave with Marathi actor in Pune) माझा आरोप हा सरसकट सर्व रिक्षावाल्यांविरोधात नसल्याचे अरबाज शेख याने पोस्टच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे. नांदेड सिटी ते पुणे स्टेशन १९८ रुपये होतात मी कधीच ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या अँपचा वापर करत नाही. पाऊस चालू होता. त्यामुळे मित्राला म्हणालो कशाला सोडायला येतो मग त्याने मला रॅपिडो अॅपवरून रिक्षा करून दिली. नांदेड सिटी मधून रिक्षा निघाली. रिक्षा चालकाने मला खूप फिरवले. मी त्याला सांगितलं दादा तू खूप फिरवतो, त्यावर त्याने काही उत्तर दिले नाही. ६० रुपये जास्तीचे मागायला सुरुवात केली . मी त्याला विचारले का ? त्यावर त्याने मला शिवी दिली. पाऊस चालू आहे, तू इथेच उतर जास्त बोलू नको. मी रोज रिक्षा चालवतो तू नाही. मला सायंकाळी सहा वाजता गावी जाण्यासाठी ट्रेन पकडायची असल्याने मी उतरू शकत नव्हतो मी त्याला माझी ओळख सांगितली नाही, असा थरारक अनुभव अरबाजने आपल्या पोस्टमध्ये लिहिला आहे.
माझ्यासारख्या रोज पुण्यात राहणाऱ्या माणसाला जर अशा घटनांना समोर जावं लागत असेल तर गावावरून/फिरण्यासाठी जे लोक पुण्यात येत असतील त्यांचे काय हाल होत असतील ?, त्यांची हे लोक किती लूट करत असतील ? हे कुठे तरी थांबल पाहिजे. अपेक्षा करतो की, यंत्रणा यावर मार्ग काढतील. अशा आशयाची फेसबुक पोस्ट करत अरबाजने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, पुण्यात सध्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. पुण्यात कार्यालय सुरू होताना आणि सुटण्याच्या वेळेस तुफान ट्रॅफिक जाम लागत असल्याने पुणेकर आधीच हैराण आहेत. त्यात एखाद्या कलाकाराला असा अनुभव येणे हे खरंच विचार करण्यासारखे आहे, असे अरबाजने या पोस्टमध्ये म्हटले आहे. अरबाज शेख याच्या या पोस्टनंतर आता पोलीस आणि वाहतूक विभाग संबंधित रिक्षाचालकावर काही कारवाई करणार का, हे पाहावे लागेल.
माझ्यासारख्या रोज पुण्यात राहणाऱ्या माणसाला जर अशा घटनांना समोर जावं लागत असेल तर गावावरून/फिरण्यासाठी जे लोक पुण्यात येत असतील त्यांचे काय हाल होत असतील ?, त्यांची हे लोक किती लूट करत असतील ? हे कुठे तरी थांबल पाहिजे. अपेक्षा करतो की, यंत्रणा यावर मार्ग काढतील. अशा आशयाची फेसबुक पोस्ट करत अरबाजने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, पुण्यात सध्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. पुण्यात कार्यालय सुरू होताना आणि सुटण्याच्या वेळेस तुफान ट्रॅफिक जाम लागत असल्याने पुणेकर आधीच हैराण आहेत. त्यात एखाद्या कलाकाराला असा अनुभव येणे हे खरंच विचार करण्यासारखे आहे, असे अरबाजने या पोस्टमध्ये म्हटले आहे. अरबाज शेख याच्या या पोस्टनंतर आता पोलीस आणि वाहतूक विभाग संबंधित रिक्षाचालकावर काही कारवाई करणार का, हे पाहावे लागेल.