कोंडी सोडवू शकणारा बालभारती-पौड फाटा रस्ता अद्याप कागदावरच
म. टा. प्रतिनिधी, पुणे
मेट्रोच्या कामामुळे कर्वे रस्त्याने जाणाऱ्या हजारो वाहनचालकांचा जीव दररोज गुदमरत असताना, कर्वे रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकेल, असा बालभारती ते पौड फाटा हा रस्ता मात्र अद्यापही कागदावरच आहे. या रस्त्यामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अहवाल, तसेच वाहतूक परिणामांचा अभ्यास करण्याचे आदेश देऊन सहा महिने झाले, तरी त्याबाबत प्रशासन ढिम्मच असल्याचे समोर आले आहे.
कोथरूड, तसेच कर्वेनगर, वारजे या भागात सेनापती बापट रस्त्यावरून जाण्यासाठी पर्यायी रस्ता नाही. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी सेनापती बापट रस्त्यासह लॉ कॉलेज रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. ही कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने शहराच्या विकास आराखड्यात (डीपी) बालभारती ते पौड फाटा हा रस्ता हनुमान टेकडी आणि एआरएआय टेकडीवरून प्रस्तावित केला आहे. जानेवारी महिन्यात राज्य सरकारने डीपीला मंजुरी दिल्याने या रस्त्याच्या कामाला कोणीही ‘खो’ घालू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने या रस्त्याचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. पालिकेत सत्ताबदल झाल्यावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने या रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाणार असल्याची ग्वाही पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी दिली होती. यासाठी पालिकेचा पथ विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक नियोजन, तसेच भूसंपादन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकदेखील घेण्यात आली होती.
सद्यस्थिती काय?
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी वनाज ते रामवाडी हा मेट्रो प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाचे काम सुरू झाले असल्याने कर्वेनगर, कोथरूडला जाणाऱ्या हजारो वाहनचालकांना वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पुढील काही महिन्यांत हे काम अधिक गतीने होणार असल्याने वाहतुकीच्या कोंडीत अधिकच भर पडणार आहे. दररोज होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीवर उपाय म्हणून बालभारती ते पौड फाटा हा रस्ता महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकत असल्याने, प्रशासनाने या रस्त्याचे काम तातडीने हाती घेण्याच्या सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या होत्या. चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात या रस्त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधीदेखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
थांबा!... अभ्यास सुरू आहे...!
कर्वे रस्त्याला पर्यायी रस्ता असलेल्या बालभारती ते पौड फाटा या रस्त्याच्या कामामुळे सेनापती बापट रस्ता, तसेच लॉ कॉलेज रस्त्यावरील वाहतुकीची कोंडीदेखील सुटण्यास मदत होणार असल्याने या रस्त्याचे काम तातडीने सुरू केले जाणार असल्याची ग्वाही प्रशासनाने दिली होती. मात्र, सहा महिने उलटल्यानंतरही याचे काम अद्यापही सुरू करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे कर्वे रस्त्याने दररोज ये-जा करणाऱ्या हजारो वाहनचालकांना आणि नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांची पाहणी करण्यासाठी पर्यावरण परिणाम अहवाल आणि वाहतूक परिणामांचा अभ्यास करून तातडीने पुढील निर्णय घ्यावा, अशा सूचना मोहोळ यांनी दिल्या होत्या. मात्र, सहा महिन्यानंतरही हा अभ्यास पूर्ण न झाल्याने बालभारती ते पौड फाटा हा रस्ता केवळ कागदावरच राहिल्याचे समोर आले आहे.
अडथळा नाही, तर अडले कोठे?
सेनापती बापट रस्ता आणि कोथरूड परिसराला जोडण्यासाठी बालभारती-पौड फाटा या दोन किलोमीटर लांब आणि तीस मीटर रुंद रस्त्याचे नियोजन करण्यात आले होते. काही वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने हा रस्ता करण्यास सुरुवात केली होती. एका बाजूने कामाला सुरुवातही करण्यात आली होती. मात्र, काही पर्यावरणवाद्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केली. त्या वेळी कोर्टाने २०५ अंतर्गत आखलेला रस्ता रद्द करून प्रशासनाला सुनावले होते. ‘डीपीमध्ये हा रस्ता आहे का,’ अशी विचारणाही कोर्टाने केली होती. या पार्श्वभूमीवर, शहराचा नवीन डीपी तयार करताना प्रशासनाने या रस्त्याचा समावेश केला. यावर रीतसर हरकती आणि सूचना मागवून सुनावणीही पूर्ण करण्यात आल्याने डीपीमध्ये या रस्त्याचा समावेश झाला आहे. त्यामुळे हा रस्ता करण्यासाठी आता कोणाचाही अडथळा होणार नाही, असा दावा पालिकेतील अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. हा रस्ता शंभर फूट होणार असून, याच्या रुंदीमध्ये डीपीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
...
या रस्त्याचे काम मार्गी लावण्यास आम्ही प्राधान्याने प्रयत्न करीत आहोत. प्राथमिक तयारीच्या बैठका पूर्ण झाल्या असून, काही दिवसांतच याच्या सर्वेक्षणाचे काम सुरू होणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक ती तरतूद करण्यात येईल.
- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती
म. टा. प्रतिनिधी, पुणे
मेट्रोच्या कामामुळे कर्वे रस्त्याने जाणाऱ्या हजारो वाहनचालकांचा जीव दररोज गुदमरत असताना, कर्वे रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकेल, असा बालभारती ते पौड फाटा हा रस्ता मात्र अद्यापही कागदावरच आहे. या रस्त्यामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अहवाल, तसेच वाहतूक परिणामांचा अभ्यास करण्याचे आदेश देऊन सहा महिने झाले, तरी त्याबाबत प्रशासन ढिम्मच असल्याचे समोर आले आहे.
कोथरूड, तसेच कर्वेनगर, वारजे या भागात सेनापती बापट रस्त्यावरून जाण्यासाठी पर्यायी रस्ता नाही. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी सेनापती बापट रस्त्यासह लॉ कॉलेज रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. ही कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने शहराच्या विकास आराखड्यात (डीपी) बालभारती ते पौड फाटा हा रस्ता हनुमान टेकडी आणि एआरएआय टेकडीवरून प्रस्तावित केला आहे. जानेवारी महिन्यात राज्य सरकारने डीपीला मंजुरी दिल्याने या रस्त्याच्या कामाला कोणीही ‘खो’ घालू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने या रस्त्याचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. पालिकेत सत्ताबदल झाल्यावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने या रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केला जाणार असल्याची ग्वाही पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी दिली होती. यासाठी पालिकेचा पथ विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक नियोजन, तसेच भूसंपादन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकदेखील घेण्यात आली होती.
सद्यस्थिती काय?
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी वनाज ते रामवाडी हा मेट्रो प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाचे काम सुरू झाले असल्याने कर्वेनगर, कोथरूडला जाणाऱ्या हजारो वाहनचालकांना वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पुढील काही महिन्यांत हे काम अधिक गतीने होणार असल्याने वाहतुकीच्या कोंडीत अधिकच भर पडणार आहे. दररोज होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीवर उपाय म्हणून बालभारती ते पौड फाटा हा रस्ता महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकत असल्याने, प्रशासनाने या रस्त्याचे काम तातडीने हाती घेण्याच्या सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या होत्या. चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात या रस्त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधीदेखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
थांबा!... अभ्यास सुरू आहे...!
कर्वे रस्त्याला पर्यायी रस्ता असलेल्या बालभारती ते पौड फाटा या रस्त्याच्या कामामुळे सेनापती बापट रस्ता, तसेच लॉ कॉलेज रस्त्यावरील वाहतुकीची कोंडीदेखील सुटण्यास मदत होणार असल्याने या रस्त्याचे काम तातडीने सुरू केले जाणार असल्याची ग्वाही प्रशासनाने दिली होती. मात्र, सहा महिने उलटल्यानंतरही याचे काम अद्यापही सुरू करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे कर्वे रस्त्याने दररोज ये-जा करणाऱ्या हजारो वाहनचालकांना आणि नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांची पाहणी करण्यासाठी पर्यावरण परिणाम अहवाल आणि वाहतूक परिणामांचा अभ्यास करून तातडीने पुढील निर्णय घ्यावा, अशा सूचना मोहोळ यांनी दिल्या होत्या. मात्र, सहा महिन्यानंतरही हा अभ्यास पूर्ण न झाल्याने बालभारती ते पौड फाटा हा रस्ता केवळ कागदावरच राहिल्याचे समोर आले आहे.
अडथळा नाही, तर अडले कोठे?
सेनापती बापट रस्ता आणि कोथरूड परिसराला जोडण्यासाठी बालभारती-पौड फाटा या दोन किलोमीटर लांब आणि तीस मीटर रुंद रस्त्याचे नियोजन करण्यात आले होते. काही वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने हा रस्ता करण्यास सुरुवात केली होती. एका बाजूने कामाला सुरुवातही करण्यात आली होती. मात्र, काही पर्यावरणवाद्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केली. त्या वेळी कोर्टाने २०५ अंतर्गत आखलेला रस्ता रद्द करून प्रशासनाला सुनावले होते. ‘डीपीमध्ये हा रस्ता आहे का,’ अशी विचारणाही कोर्टाने केली होती. या पार्श्वभूमीवर, शहराचा नवीन डीपी तयार करताना प्रशासनाने या रस्त्याचा समावेश केला. यावर रीतसर हरकती आणि सूचना मागवून सुनावणीही पूर्ण करण्यात आल्याने डीपीमध्ये या रस्त्याचा समावेश झाला आहे. त्यामुळे हा रस्ता करण्यासाठी आता कोणाचाही अडथळा होणार नाही, असा दावा पालिकेतील अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. हा रस्ता शंभर फूट होणार असून, याच्या रुंदीमध्ये डीपीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
...
या रस्त्याचे काम मार्गी लावण्यास आम्ही प्राधान्याने प्रयत्न करीत आहोत. प्राथमिक तयारीच्या बैठका पूर्ण झाल्या असून, काही दिवसांतच याच्या सर्वेक्षणाचे काम सुरू होणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात आवश्यक ती तरतूद करण्यात येईल.
- मुरलीधर मोहोळ, अध्यक्ष, स्थायी समिती