म. टा. प्रतिनिधी, पुणे
बाहेर कोसळणारा पाऊस, सभोवतीचा हिरवागार निसर्ग, आपल्या लयीतील सुंदर धबधबे आणि सभागृहात कोसळणारा शब्दांचा पाऊस...अशा मनाला अपार आनंद देणाऱ्या वातावरणात बालकुमारांनी बुधवारी हशा आणि टाळ्यांच्या साथीने साहित्याचा मनमुराद आनंद लुटला. डॉ. अनिल अवचट यांनी मुला-मुलींशी संवाद साधला आणि या संवादात मुलेही रमून गेली.
निमित्त होते, लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोग केंद्राच्या परिसरात महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे. या वेळी परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, केंद्राचे विश्वस्त प्रमोद शिंदे, प्रल्हाद बापर्डेकर, गजानन केळकर, लेखक राजीव तांबे, कवयित्री संगीता बर्वे, आश्लेषा महाजन, आदित्य दवणे, राजन लाखे, माधव राजगुरू, दीपक करंदीकर, वि. दा. पिंगळे उपस्थित होते.
संमेलनाच्या प्रारंभी मुलांनी लेझीम आणि ढोल ताशांच्या गजरात काढलेली ग्रंथदिंडी आणि सादर केलेले मराठी अभिमान गीत यामुळे वेगळाच माहोल निर्माण झाला. ओरिगामीतून कागदांचा उडणारा पक्षी दाखवत, तर कधी दोऱ्यांची गंमत दाखवत, कधी रुमालाच्या साहाय्याने अनेक वस्तू तयार करण्याची करामत दाखवून संमेलनाध्यक्ष अनिल अवचट यांनी मुलांना जिंकून घेतले. गाणी, गोष्टी आणि कविता म्हणून अवचट यांनी मुलांना साहित्यविश्वात नेले.
‘आपले विचार आपल्या शब्दांत लिहा. कुणाचेही अनुकरण करू नका. माझा कागद आणि माझा पेन यांच्यात कोणीही येता कामा नये, असे स्वत:ला आणि इतरांना सांगा. लिहणे हे स्वत:शी बोलणेच असते,’ असा कानमंत्र अवचट यांनी दिला. ‘कला ही मन रमवणारी गोष्ट आहे. विशाल मन असेल तर इतरांच्या सुख व दु:खात सामील होता येते. माणुसकीची संस्कृती साहित्याच्या माध्यमातूनच निर्माण होऊ शकते. मुले ही निसर्गाचे शुद्ध रूप आहेत. समाजाच्या सहवासात येताना तुमचे व्यक्तिमत्त्व गढूळ होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे,’ असेही मत त्यांनी मांडल. डॉ. वर्षा तोडमल यांनी सूत्रसंचालन केले.
बाहेर कोसळणारा पाऊस, सभोवतीचा हिरवागार निसर्ग, आपल्या लयीतील सुंदर धबधबे आणि सभागृहात कोसळणारा शब्दांचा पाऊस...अशा मनाला अपार आनंद देणाऱ्या वातावरणात बालकुमारांनी बुधवारी हशा आणि टाळ्यांच्या साथीने साहित्याचा मनमुराद आनंद लुटला. डॉ. अनिल अवचट यांनी मुला-मुलींशी संवाद साधला आणि या संवादात मुलेही रमून गेली.
निमित्त होते, लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोग केंद्राच्या परिसरात महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे. या वेळी परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, केंद्राचे विश्वस्त प्रमोद शिंदे, प्रल्हाद बापर्डेकर, गजानन केळकर, लेखक राजीव तांबे, कवयित्री संगीता बर्वे, आश्लेषा महाजन, आदित्य दवणे, राजन लाखे, माधव राजगुरू, दीपक करंदीकर, वि. दा. पिंगळे उपस्थित होते.
संमेलनाच्या प्रारंभी मुलांनी लेझीम आणि ढोल ताशांच्या गजरात काढलेली ग्रंथदिंडी आणि सादर केलेले मराठी अभिमान गीत यामुळे वेगळाच माहोल निर्माण झाला. ओरिगामीतून कागदांचा उडणारा पक्षी दाखवत, तर कधी दोऱ्यांची गंमत दाखवत, कधी रुमालाच्या साहाय्याने अनेक वस्तू तयार करण्याची करामत दाखवून संमेलनाध्यक्ष अनिल अवचट यांनी मुलांना जिंकून घेतले. गाणी, गोष्टी आणि कविता म्हणून अवचट यांनी मुलांना साहित्यविश्वात नेले.
‘आपले विचार आपल्या शब्दांत लिहा. कुणाचेही अनुकरण करू नका. माझा कागद आणि माझा पेन यांच्यात कोणीही येता कामा नये, असे स्वत:ला आणि इतरांना सांगा. लिहणे हे स्वत:शी बोलणेच असते,’ असा कानमंत्र अवचट यांनी दिला. ‘कला ही मन रमवणारी गोष्ट आहे. विशाल मन असेल तर इतरांच्या सुख व दु:खात सामील होता येते. माणुसकीची संस्कृती साहित्याच्या माध्यमातूनच निर्माण होऊ शकते. मुले ही निसर्गाचे शुद्ध रूप आहेत. समाजाच्या सहवासात येताना तुमचे व्यक्तिमत्त्व गढूळ होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे,’ असेही मत त्यांनी मांडल. डॉ. वर्षा तोडमल यांनी सूत्रसंचालन केले.