म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘सत्तेत आल्यावर लगेच भरीव कामगिरी केली, तर आपण जनतेच्या चिरकाल स्मरणात राहतो. ही पी. व्ही. नरसिंह राव यांची शिकवण अटलबिहारी वाजपेयींनी पाळून अणुचाचण्या केल्या. मात्र, नरेंद्र मोदी यांना ही शिकवण समजली नाही. आपल्या पंतप्रधानपदाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी कोणतीही भरीव कामगिरी केली नाही,’ असे निरीक्षण ज्येष्ठ पत्रकार, लेखक व राजकीय विश्लेषक डॉ. संजय बारू यांनी नोंदवले.
‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’तर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. बारू यांच्या ‘१९९१ - हाऊ पी. व्ही. नरसिंह राव मेड हिस्ट्री’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यानंतर ज्येष्ठ संपादक डॉ. दिलीप पाडगावकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘सत्तेत आल्यानंतर तातडीने भरीव कामगिरी केली नाही, तर विरोधकांना बोलायची संधी मिळते, ही नरसिंह राव यांची शिकवण वाजपेयींनी पाळली. परंतु, मोदींना ते जमले नाही.’
डॉ. बारू म्हणाले, ‘आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात राव यांनी अनेक महत्त्वाचे दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले. मात्र, अशा या पंतप्रधानांना त्यांच्या कॉँग्रेस पक्षासह सर्वच जण विसरले. त्यांचे योगदान सर्वांसमोर यावे, यासाठी मी हे पुस्तक लिहिले. पंतप्रधान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात राव यांनी आपल्या कार्याची दिशा स्पष्ट केली होती. परराष्ट्रमंत्री म्हणून पूर्वी काम केलेल्या राव यांना जागतिक परिस्थिती आणि संदर्भांचे ज्ञान होते. आर्थिक सुधारणांचा निर्णय त्यांनी जागतिक दबावाखाली येऊन नव्हे, तर जगाच्या आकलनातून आणि तत्कालिन वित्तीय परिस्थितीविषयी असलेल्या भानातून घेतला. जो पुढे योग्य ठरला.’ भारतीय राजकारणात १९८०पर्यंत घराणेशाही नव्हती. इंदिरा गांधी यांनी १९८०मध्ये संजय गांधी यांच्या निधनानंतर राजीव गांधींना पुढे आणून घराणेशाही सुरू केली, असेही डॉ. बारू म्हणाले.
ममताच कॉँग्रेसच्या तारणहार
कॉँग्रेसचे भवितव्य काय असेल, असे विचारले असता, डॉ. बारू म्हणाले, ‘सध्याच्या कॉँग्रेसमध्ये भविष्यात पंतप्रधान बनेल, असा एकही नेता मला दिसत नाही. कॉँग्रेसला खरेच पुन्हा उभारी घ्यायची असेल, तर सोनिया गांधी यांनी सर्व माजी कॉँग्रेसजनांना मूळ पक्षात एकत्र आणावे आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पक्षाचे नेतृत्व करावे. सध्या देशात मूळ कॉँग्रेसवासी असलेल्या ममता याच एकमेव लोकनेत्या आहेत.’
राव यांच्यावरील आरोप चुकीचा
डॉ. बारू म्हणाले, ‘बाबरी मशिद पाडण्यात आली, त्या परिस्थितीत उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करणे, शक्य नव्हते. अशा वेळी राज्य सरकारवर नरसिंह राव यांनी विश्वास ठेवला होता. त्यामुळे रावही या कटात सामील होते, असे म्हणणे चुकीचे आहे.’
‘सत्तेत आल्यावर लगेच भरीव कामगिरी केली, तर आपण जनतेच्या चिरकाल स्मरणात राहतो. ही पी. व्ही. नरसिंह राव यांची शिकवण अटलबिहारी वाजपेयींनी पाळून अणुचाचण्या केल्या. मात्र, नरेंद्र मोदी यांना ही शिकवण समजली नाही. आपल्या पंतप्रधानपदाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी कोणतीही भरीव कामगिरी केली नाही,’ असे निरीक्षण ज्येष्ठ पत्रकार, लेखक व राजकीय विश्लेषक डॉ. संजय बारू यांनी नोंदवले.
‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’तर्फे आयोजित कार्यक्रमात डॉ. बारू यांच्या ‘१९९१ - हाऊ पी. व्ही. नरसिंह राव मेड हिस्ट्री’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यानंतर ज्येष्ठ संपादक डॉ. दिलीप पाडगावकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘सत्तेत आल्यानंतर तातडीने भरीव कामगिरी केली नाही, तर विरोधकांना बोलायची संधी मिळते, ही नरसिंह राव यांची शिकवण वाजपेयींनी पाळली. परंतु, मोदींना ते जमले नाही.’
डॉ. बारू म्हणाले, ‘आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात राव यांनी अनेक महत्त्वाचे दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले. मात्र, अशा या पंतप्रधानांना त्यांच्या कॉँग्रेस पक्षासह सर्वच जण विसरले. त्यांचे योगदान सर्वांसमोर यावे, यासाठी मी हे पुस्तक लिहिले. पंतप्रधान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात राव यांनी आपल्या कार्याची दिशा स्पष्ट केली होती. परराष्ट्रमंत्री म्हणून पूर्वी काम केलेल्या राव यांना जागतिक परिस्थिती आणि संदर्भांचे ज्ञान होते. आर्थिक सुधारणांचा निर्णय त्यांनी जागतिक दबावाखाली येऊन नव्हे, तर जगाच्या आकलनातून आणि तत्कालिन वित्तीय परिस्थितीविषयी असलेल्या भानातून घेतला. जो पुढे योग्य ठरला.’ भारतीय राजकारणात १९८०पर्यंत घराणेशाही नव्हती. इंदिरा गांधी यांनी १९८०मध्ये संजय गांधी यांच्या निधनानंतर राजीव गांधींना पुढे आणून घराणेशाही सुरू केली, असेही डॉ. बारू म्हणाले.
ममताच कॉँग्रेसच्या तारणहार
कॉँग्रेसचे भवितव्य काय असेल, असे विचारले असता, डॉ. बारू म्हणाले, ‘सध्याच्या कॉँग्रेसमध्ये भविष्यात पंतप्रधान बनेल, असा एकही नेता मला दिसत नाही. कॉँग्रेसला खरेच पुन्हा उभारी घ्यायची असेल, तर सोनिया गांधी यांनी सर्व माजी कॉँग्रेसजनांना मूळ पक्षात एकत्र आणावे आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पक्षाचे नेतृत्व करावे. सध्या देशात मूळ कॉँग्रेसवासी असलेल्या ममता याच एकमेव लोकनेत्या आहेत.’
राव यांच्यावरील आरोप चुकीचा
डॉ. बारू म्हणाले, ‘बाबरी मशिद पाडण्यात आली, त्या परिस्थितीत उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करणे, शक्य नव्हते. अशा वेळी राज्य सरकारवर नरसिंह राव यांनी विश्वास ठेवला होता. त्यामुळे रावही या कटात सामील होते, असे म्हणणे चुकीचे आहे.’