‘दादोजी शिवरायांचे गुरूच’
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘जेम्स लेन प्रकरणात तोडफोडीतून संघर्ष करणाऱ्या लोकांना केवळ पेटवा-पेटवीचे राजकारण करायचे होते. त्यांना इतर कोणत्याच गोष्टींचे देणे घेणे नव्हते. इतिहासाचा अभ्यास केल्यास शिवाजी महाराजांना दादोजी कोंडदेव यांनी शिक्षण दिले असून, ते त्यांचे गुरू होते,’ असे मत ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. भास्करराव आव्हाड यांनी शनिवारी व्यक्त केले.
कॉन्टिनेंटल प्रकाशनाच्या श्यामसुंदर मुळे लिखित ‘दादोजी कोंडदेव ः खंडन आणि मंडन’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन अॅड. आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, मुळे आणि प्रकाशनाच्या संचालिका अमृता कुलकर्णी आदी उपस्थित होते.
अॅड. आव्हाड म्हणाले, ‘जेम्स लेन प्रकरणात तोडफोड करणाऱ्यांना पेटवा-पेटवीचे राजकारण आणि एकमेकांमध्ये तेढ निर्माण करायची होती. कोणत्याही व्यक्तीचे आई-वडील हे गुरू असतात. मात्र, त्यांना पुढचे शिक्षण घेण्यासाठी शिक्षकांची किंवा गुरुंची आवश्यकता असते. त्यामुळे जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना प्राथमिक शिक्षण दिले. पुढचे शिक्षण त्यांना दादोजी कोंडदेव यांनी दिले आहे. तसे इतिहासाचे पुरावे आहेत. अपात्र लोकांच्या हाती सत्तेचे नेतृत्व गेले की करायला इतर कोणत्याच गोष्टी सापडत नाहीत. त्यामुळे हे लोक धुडगूस घालणाऱ्या गोष्टी करत असतात. हे लोक आजच्या युवावर्गाची विचारसरणी विध्वंसाकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांना सत्तेच्या शिखरावर जाण्यापासून युवावर्गच मतदानाच्या वापरातून रोखू शकतात.’
बलकवडे म्हणाले, ‘जेम्स लेनच्या प्रकरणात भांडारकर संस्थेची तोडफोड आणि धुडगूस घालणाऱ्या काही ठरावीक व्यक्तींनी जातीयवादाचा एक नवीन संघर्ष निर्माण केला आहे. बालभारतीच्या पुस्तकातून दादोजी कोंडदेव यांची माहिती काढून टाकणे, हे देखील चुकीचेच होते. इतिहासामध्ये कितीतरी असे दाखले आणि पुरावे आहेत की ज्यातून दादोजी कोंडदेव हेच शिवाजी महाराजांचे गुरू होते, असे स्पष्ट होते.’ अविनाश पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले.
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘जेम्स लेन प्रकरणात तोडफोडीतून संघर्ष करणाऱ्या लोकांना केवळ पेटवा-पेटवीचे राजकारण करायचे होते. त्यांना इतर कोणत्याच गोष्टींचे देणे घेणे नव्हते. इतिहासाचा अभ्यास केल्यास शिवाजी महाराजांना दादोजी कोंडदेव यांनी शिक्षण दिले असून, ते त्यांचे गुरू होते,’ असे मत ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. भास्करराव आव्हाड यांनी शनिवारी व्यक्त केले.
कॉन्टिनेंटल प्रकाशनाच्या श्यामसुंदर मुळे लिखित ‘दादोजी कोंडदेव ः खंडन आणि मंडन’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन अॅड. आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, मुळे आणि प्रकाशनाच्या संचालिका अमृता कुलकर्णी आदी उपस्थित होते.
अॅड. आव्हाड म्हणाले, ‘जेम्स लेन प्रकरणात तोडफोड करणाऱ्यांना पेटवा-पेटवीचे राजकारण आणि एकमेकांमध्ये तेढ निर्माण करायची होती. कोणत्याही व्यक्तीचे आई-वडील हे गुरू असतात. मात्र, त्यांना पुढचे शिक्षण घेण्यासाठी शिक्षकांची किंवा गुरुंची आवश्यकता असते. त्यामुळे जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना प्राथमिक शिक्षण दिले. पुढचे शिक्षण त्यांना दादोजी कोंडदेव यांनी दिले आहे. तसे इतिहासाचे पुरावे आहेत. अपात्र लोकांच्या हाती सत्तेचे नेतृत्व गेले की करायला इतर कोणत्याच गोष्टी सापडत नाहीत. त्यामुळे हे लोक धुडगूस घालणाऱ्या गोष्टी करत असतात. हे लोक आजच्या युवावर्गाची विचारसरणी विध्वंसाकडे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा लोकांना सत्तेच्या शिखरावर जाण्यापासून युवावर्गच मतदानाच्या वापरातून रोखू शकतात.’
बलकवडे म्हणाले, ‘जेम्स लेनच्या प्रकरणात भांडारकर संस्थेची तोडफोड आणि धुडगूस घालणाऱ्या काही ठरावीक व्यक्तींनी जातीयवादाचा एक नवीन संघर्ष निर्माण केला आहे. बालभारतीच्या पुस्तकातून दादोजी कोंडदेव यांची माहिती काढून टाकणे, हे देखील चुकीचेच होते. इतिहासामध्ये कितीतरी असे दाखले आणि पुरावे आहेत की ज्यातून दादोजी कोंडदेव हेच शिवाजी महाराजांचे गुरू होते, असे स्पष्ट होते.’ अविनाश पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले.