म. टा. प्रतिनिधी, पुणे
कोरेगाव भीमा येथे झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता. या हल्ल्यामागे संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे हेच सूत्रधार असून त्यांच्यासह दोषींना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात यावी, तसेच या हल्ल्यात दोन पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक यांचाही सहभाग असून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे. राज्य सरकारने एसआयटी नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष प्रा. म. ना. कांबळे यांनी केली आहे.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या सूचनेनुसार विविध आंबेडकरी पक्ष-संघटनांच्या प्रतिनिधींची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने कोरेगाव भीमा, वढू येथे जाऊन सत्यशोधन केले. तसेच स्थानिक राहिवाशांशी चर्चा केली. त्यात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. या संदर्भातील परिस्थितीजन्य पुरावे आणि व्हिडीओ-छायाचित्रे यांचा अहवाल तयार करण्यात आला आहे. तो लवकरच पोलिसांकडे सोपविला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.
धेंडे यांचे गंभीर आरोप
१ जानेवारीच्या पूर्वसंध्येला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वढू येथील छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गायकवाड यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. मात्र त्यानंतर तेथील कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी संभाजी महाराजांच्या पुतळ्यावर गोमूत्र शिंपडून त्याचे शुद्धीकरण केले, असा गंभीर आरोपही उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि प्रा म. ना. कांबळे यांनी केला. अजूनही गावात स्फोटक वातावरण असून सामाजिक सलोख्यासाठी स्थानिक पातळीवर समिती स्थापन करून द्वेषभावना कमी करण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
कोरेगाव भीमा येथे झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता. या हल्ल्यामागे संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे हेच सूत्रधार असून त्यांच्यासह दोषींना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात यावी, तसेच या हल्ल्यात दोन पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक यांचाही सहभाग असून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे. राज्य सरकारने एसआयटी नेमून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष प्रा. म. ना. कांबळे यांनी केली आहे.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या सूचनेनुसार विविध आंबेडकरी पक्ष-संघटनांच्या प्रतिनिधींची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने कोरेगाव भीमा, वढू येथे जाऊन सत्यशोधन केले. तसेच स्थानिक राहिवाशांशी चर्चा केली. त्यात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. या संदर्भातील परिस्थितीजन्य पुरावे आणि व्हिडीओ-छायाचित्रे यांचा अहवाल तयार करण्यात आला आहे. तो लवकरच पोलिसांकडे सोपविला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.
धेंडे यांचे गंभीर आरोप
१ जानेवारीच्या पूर्वसंध्येला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वढू येथील छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गायकवाड यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. मात्र त्यानंतर तेथील कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी संभाजी महाराजांच्या पुतळ्यावर गोमूत्र शिंपडून त्याचे शुद्धीकरण केले, असा गंभीर आरोपही उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि प्रा म. ना. कांबळे यांनी केला. अजूनही गावात स्फोटक वातावरण असून सामाजिक सलोख्यासाठी स्थानिक पातळीवर समिती स्थापन करून द्वेषभावना कमी करण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणीही त्यांनी केली.