पुणे
आगामी निवडणुकांमध्ये सोशल मीडियाच गेम चेंजर ठरणार असून त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सायबर योद्ध्यांनी कंबर कसली पाहिजे. गत लोकसभा निवडणुकांमध्ये टोकदार भूमिका घेतल्यानेच उत्तर प्रदेशसह देशभरात घवघवीत यश मिळाले. आता महाराष्ट्रातील सायबर योद्ध्यांनी अशीच चुणूक दाखवत शेतकरी आत्महत्यांवर बोलणाऱ्या शरद पवारांना सोशल मीडियातून चोख प्रत्युत्तर द्यावे असा आदेश भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी दिला.
७० वर्षांतील कचरा चार वर्षांत संपणार का, असा सवाल करत त्यांनी राहुल गांधींचाही सोशल मीडियावर समाचार घेण्यास सांगितले.
भाजपच्या प्रदेश सोशल मीडियाच्या टीमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शहा यांनी सोशल मीडियाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शेतकरी, दलित, आदिवासी यांची साथ आणि सोशल मीडियाच्या जोरावर भाजपने सत्ता हस्तगत केली आहे. आता आगामी विजयात सोशल मीडिया हा अग्रस्थानी असावा, अशी अपेक्षा त्यांनी आपल्या सायबर सेनेकडे व्यक्त केली. आयटी सेलकडे विविध माहितीचा खजिना असला पाहिजे. या माहितीचे विश्लेषण करून सुसंगत तर्क मांडणी करत ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे अशी सूचना शहा यांनी केली.
आगामी निवडणुकांमध्ये सोशल मीडियाच गेम चेंजर ठरणार असून त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सायबर योद्ध्यांनी कंबर कसली पाहिजे. गत लोकसभा निवडणुकांमध्ये टोकदार भूमिका घेतल्यानेच उत्तर प्रदेशसह देशभरात घवघवीत यश मिळाले. आता महाराष्ट्रातील सायबर योद्ध्यांनी अशीच चुणूक दाखवत शेतकरी आत्महत्यांवर बोलणाऱ्या शरद पवारांना सोशल मीडियातून चोख प्रत्युत्तर द्यावे असा आदेश भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी दिला.
७० वर्षांतील कचरा चार वर्षांत संपणार का, असा सवाल करत त्यांनी राहुल गांधींचाही सोशल मीडियावर समाचार घेण्यास सांगितले.
भाजपच्या प्रदेश सोशल मीडियाच्या टीमने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शहा यांनी सोशल मीडियाची जबाबदारी सांभाळणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शेतकरी, दलित, आदिवासी यांची साथ आणि सोशल मीडियाच्या जोरावर भाजपने सत्ता हस्तगत केली आहे. आता आगामी विजयात सोशल मीडिया हा अग्रस्थानी असावा, अशी अपेक्षा त्यांनी आपल्या सायबर सेनेकडे व्यक्त केली. आयटी सेलकडे विविध माहितीचा खजिना असला पाहिजे. या माहितीचे विश्लेषण करून सुसंगत तर्क मांडणी करत ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे अशी सूचना शहा यांनी केली.