म. टा. प्रतिनिधी, जुन्नर
अवघ्या तीन आठवड्यांवर आलेल्या लग्नाची स्वप्ने रंगविणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. स्वतःच्याच लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी जात असताना टेम्पोची धडक बसून नवरदेवासह चुलत भावाचाही अपघातात मृत्यू झाला. पुणे- नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे एका वळणावर शुक्रवारी हा अपघात झाला.
बाबूराव जयसिंग अडसरे (वय २४) आणि महेंद्र भिमाजी अडसरे (वय २५, रा. नारायणगाव) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबूरावचे लग्न तीन आठवड्यांवर आले होते. लग्नाची खरेदी करण्यासाठी बाबूराव आणि चुलत भाऊ महेंद्र नारायणगावातून आळेफाट्याकडे निघाले होते. त्याचवेळी टेम्पो आळेफाट्याहून नारायणगावकडे येत होता.
नारायणगावनजीकच्या बिझी प्लाझासमोर टेम्पोची दुचाकीवरुन चाललेल्या अडसरे बंधूंना जोरात धडक बसली. अपघातानंतर टेम्पो उलटला आणि धडकून अडसरे बंधूंचा जागीच मृत्यू झाला. टेम्पोचालक गणेश धनगर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. हलगर्जीपणे वाहन चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी धनगर याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
बाबूरावचे १७ एप्रिल रोजी लग्न होते. त्यासाठी बस्ता बांधण्यासाठी आळेफाटा येथून ते मोटारीने जाणार होते. मात्र, त्यांना मृत्यूने गाठले. या घटनेने अडसरे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
अवघ्या तीन आठवड्यांवर आलेल्या लग्नाची स्वप्ने रंगविणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. स्वतःच्याच लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी जात असताना टेम्पोची धडक बसून नवरदेवासह चुलत भावाचाही अपघातात मृत्यू झाला. पुणे- नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे एका वळणावर शुक्रवारी हा अपघात झाला.
बाबूराव जयसिंग अडसरे (वय २४) आणि महेंद्र भिमाजी अडसरे (वय २५, रा. नारायणगाव) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबूरावचे लग्न तीन आठवड्यांवर आले होते. लग्नाची खरेदी करण्यासाठी बाबूराव आणि चुलत भाऊ महेंद्र नारायणगावातून आळेफाट्याकडे निघाले होते. त्याचवेळी टेम्पो आळेफाट्याहून नारायणगावकडे येत होता.
नारायणगावनजीकच्या बिझी प्लाझासमोर टेम्पोची दुचाकीवरुन चाललेल्या अडसरे बंधूंना जोरात धडक बसली. अपघातानंतर टेम्पो उलटला आणि धडकून अडसरे बंधूंचा जागीच मृत्यू झाला. टेम्पोचालक गणेश धनगर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. हलगर्जीपणे वाहन चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी धनगर याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
बाबूरावचे १७ एप्रिल रोजी लग्न होते. त्यासाठी बस्ता बांधण्यासाठी आळेफाटा येथून ते मोटारीने जाणार होते. मात्र, त्यांना मृत्यूने गाठले. या घटनेने अडसरे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.