आयुर्वेदाच्या औषधांद्वारे दुर्धर आजार बरे करणारे दादा खडीवाले आयुष्यभर आयुर्वेदाच्या प्रचार, प्रसारासाठी झटले. नव्हे त्याला राजमान्यता, लोकमान्यता मिळविण्यासाठी त्यांचा सरकार आणि समाजाशी झगडा सुरूच होता. त्यांच्या कार्याची दखल पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध संस्था-संघटनांनी सात्याने घेतली. त्याशिवाय केंद्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेतली. आपल्या कार्याची दखल घेण्याऐवजी आयुर्वेदाच्या औषध प्रणालीची राज्य आणि केंद्र सरकारने दखल घ्यावी, अशी अपेक्षा ते नेहमी व्यक्त करीत होते. ‘आयुर्वेद हे मूळ शास्त्र आहे. त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अन्य पॅथी ही पूरक शास्त्रे आहेत. हे शास्त्र असले तरी आयुर्वेदाच्या मूळ शास्त्राला विसरून कसे चालेल? आयुर्वेद विसरणे म्हणजे आईशी बेईमानी करण्यासारखे आहे,’ असे स्पष्ट मत ते नेहमीच व्यक्त करीत.
सर्वसामान्यांना आयुर्वेदाचे ज्ञान सहज उपलब्ध व्हावे, याकरिता खडीवाले वैद्य यांनी गुरुकुल आयुर्वेद परिचय वर्ग गेली ४० वर्षे अखंडपणे चालविले. आयुर्वेदावरील दीडशेहून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली. १९७४ मध्ये वैद्य कै. यशवंत हरी वैद्य यांच्या स्मरणार्थ ‘वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था’ या संस्थेची स्थापना त्यांनी केली. खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेंतर्गत ऋषितुल्य महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या नावाने ३० बेडचे पंचकर्म हॉस्पिटल सुरू केले. आयुर्वेदाच्या प्रचारासाठी आयुर्वेद प्रचारक हे मासिक व हिंदू जागरासाठी ‘हिंदू तन-मन’ या साप्ताहिकासाठी त्यांनी लिखाण केले. १९८२ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने जनकल्याण रक्तपेढीची स्थापना व नेत्रसेवा केंद्र सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. गेल्या ३० वर्षांपासून महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या नावाने आयुर्वेदातील विविध शाखांमधील वैद्यांना तेरा पुरस्कार देण्यास त्यांनी सुरुवात केली होती. नानाजी देशमुख यांच्या आग्रहावरून बीड जिल्ह्यात मोफत आयुर्वेदीय चिकित्सा शिबिरे त्यांनी आयोजित केली होती. गेल्या ४० वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी आयुर्वेदाचे उपचार देताना सव्वालाख पेशंटना मोफत उपचार दिले. वडील वैद्य यशवंत हरी वैद्य खडीवाले यांच्या नावाने शताब्दी महोत्सवानिमित्त शंभर शिबिरांचे आयोजन केले.
नेत्रदानाच्या प्रचारासाठी पदयात्रा आयोजित केली होती. त्यांनी १९९१ मध्ये आकुर्डी प्राधिकरणात निराधार व अनाथ बालकांसाठी आधार केंद्राची स्थापना केली. सुमारे १५ वर्षांपूर्वी वंदनीय ताई आपटे यांच्या नावाने महिला विकास प्रतिष्ठानची स्थापना केली. सन १९९३ मध्ये ठाणे जिल्ह्यातील देवबांध येथे श्रीराम मंदिराची उभारणी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयुर्वेदाच्या प्रचारासाठी वनस्पती उद्यानाची उभारणी करण्यामध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या या प्रयत्नामुळे आयुर्वेदाच्या वनस्पतीचे जतन आणि संवर्धन हा विषय चर्चेला आला. जगभरातील आयुर्वेदाच्या प्रचारासाठी तसेच संशोधकांसाठी एकच व्यासपीठ मिळावे याकरिता विश्व वैद्य संमेलन भरविले. आयुर्वेदाच्या प्रचार, प्रसारासाठी ‘आयुर्वेद प्रचारक’ मासिक व हिंदू जागरासाठी ‘हिंदू तन मन’ साप्ताहिकासाठी लिखाण त्यांनी केले.
‘असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ आयुर्वेद मेडिकल कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र’ यांच्या वतीने केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते ‘आयुर्वेदभूषण’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. आतापर्यंच्या आयुर्वेदाच्या क्षेत्रातील अभ्यास, संशोधन, उपचार, तसेच प्रचार व प्रसाराच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने पहिला राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार देऊन गेल्या वर्षीच त्यांचा सन्मान केला. आयुर्वेदाच्या वनस्पतीचे जतन करण्यासंदर्भात ते आग्रही होते. म्हणून त्यांनी वृक्षसंवर्धनावर अधिक भर दिला. त्याकरिता राष्ट्रीय वनसंपदा संवर्धन व संशोधन केंद्राची स्थापना केली; तसेच औषधांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी औषधी वनस्पती अभ्यास गटाचीदेखील त्यांनी स्थापना केले. ते सातत्याने आपल्या संशोधन, उपचाराच्या कामात सतत मग्न राहिले.
सर्वसामान्यांना आयुर्वेदाचे ज्ञान सहज उपलब्ध व्हावे, याकरिता खडीवाले वैद्य यांनी गुरुकुल आयुर्वेद परिचय वर्ग गेली ४० वर्षे अखंडपणे चालविले. आयुर्वेदावरील दीडशेहून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली. १९७४ मध्ये वैद्य कै. यशवंत हरी वैद्य यांच्या स्मरणार्थ ‘वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था’ या संस्थेची स्थापना त्यांनी केली. खडीवाले वैद्यक संशोधन संस्थेंतर्गत ऋषितुल्य महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या नावाने ३० बेडचे पंचकर्म हॉस्पिटल सुरू केले. आयुर्वेदाच्या प्रचारासाठी आयुर्वेद प्रचारक हे मासिक व हिंदू जागरासाठी ‘हिंदू तन-मन’ या साप्ताहिकासाठी त्यांनी लिखाण केले. १९८२ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने जनकल्याण रक्तपेढीची स्थापना व नेत्रसेवा केंद्र सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. गेल्या ३० वर्षांपासून महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या नावाने आयुर्वेदातील विविध शाखांमधील वैद्यांना तेरा पुरस्कार देण्यास त्यांनी सुरुवात केली होती. नानाजी देशमुख यांच्या आग्रहावरून बीड जिल्ह्यात मोफत आयुर्वेदीय चिकित्सा शिबिरे त्यांनी आयोजित केली होती. गेल्या ४० वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांनी आयुर्वेदाचे उपचार देताना सव्वालाख पेशंटना मोफत उपचार दिले. वडील वैद्य यशवंत हरी वैद्य खडीवाले यांच्या नावाने शताब्दी महोत्सवानिमित्त शंभर शिबिरांचे आयोजन केले.
नेत्रदानाच्या प्रचारासाठी पदयात्रा आयोजित केली होती. त्यांनी १९९१ मध्ये आकुर्डी प्राधिकरणात निराधार व अनाथ बालकांसाठी आधार केंद्राची स्थापना केली. सुमारे १५ वर्षांपूर्वी वंदनीय ताई आपटे यांच्या नावाने महिला विकास प्रतिष्ठानची स्थापना केली. सन १९९३ मध्ये ठाणे जिल्ह्यातील देवबांध येथे श्रीराम मंदिराची उभारणी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयुर्वेदाच्या प्रचारासाठी वनस्पती उद्यानाची उभारणी करण्यामध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या या प्रयत्नामुळे आयुर्वेदाच्या वनस्पतीचे जतन आणि संवर्धन हा विषय चर्चेला आला. जगभरातील आयुर्वेदाच्या प्रचारासाठी तसेच संशोधकांसाठी एकच व्यासपीठ मिळावे याकरिता विश्व वैद्य संमेलन भरविले. आयुर्वेदाच्या प्रचार, प्रसारासाठी ‘आयुर्वेद प्रचारक’ मासिक व हिंदू जागरासाठी ‘हिंदू तन मन’ साप्ताहिकासाठी लिखाण त्यांनी केले.
‘असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ आयुर्वेद मेडिकल कॉलेजेस ऑफ महाराष्ट्र’ यांच्या वतीने केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते ‘आयुर्वेदभूषण’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. आतापर्यंच्या आयुर्वेदाच्या क्षेत्रातील अभ्यास, संशोधन, उपचार, तसेच प्रचार व प्रसाराच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने पहिला राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार देऊन गेल्या वर्षीच त्यांचा सन्मान केला. आयुर्वेदाच्या वनस्पतीचे जतन करण्यासंदर्भात ते आग्रही होते. म्हणून त्यांनी वृक्षसंवर्धनावर अधिक भर दिला. त्याकरिता राष्ट्रीय वनसंपदा संवर्धन व संशोधन केंद्राची स्थापना केली; तसेच औषधांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी औषधी वनस्पती अभ्यास गटाचीदेखील त्यांनी स्थापना केले. ते सातत्याने आपल्या संशोधन, उपचाराच्या कामात सतत मग्न राहिले.