म. टा. प्रतिनिधी, पुणे
इंटरनेट ब्रॉडबँड सेवा उपलब्ध करून देणाऱ्या रिलायन्स ब्रॉडबँडच्या सेवेमध्ये अनेक अडचणी येत असून, त्या संदर्भात तक्रार करणाऱ्या ग्राहकांना कॉल सेंटरद्वारे प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कंपनीकडून देण्यात येणारी इंटरनेट सेवा संथगतीने सुरू असून, त्याबद्दल तक्रार कुणाकडे करायची, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन या कंपनीतर्फे इंटरनेटची सेवा पुरवण्यात येते. शहरातील अनेक ग्राहकांकडे ही सेवा आहे. काही ग्राहकांनी त्याच्या वर्षभराचे आगाऊ पैसे भरले आहेत तरी देखील इंटरनेटची सेवा अत्यंत संथगतीने सुरू आहे. पुणे शहर आणि उपनगरांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवते आहे. या संदर्भात ग्राहकांनी अनेकदा कॉल सेंटरला फोन करून तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना समोरून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
रिलायन्सच्या ब्रॉडबँड संदर्भात ऑनलाइन तक्रारी करण्यासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु वेबसाइटवरच्या तक्रारींनाही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. याशिवाय कंपनीचे कल्याणीनगर येथे महाराष्ट्राचे विभागीय कार्यालय आहे. त्या कार्यालयामध्ये संपर्क केला असता दोन्ही दूरध्वनी क्रमांक चुकीचे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे, रिलायन्स कम्युनिकेशनचे अस्तित्व पुण्यात केवळ ग्राहकांकडून बिल वसूल करण्यापुरते राहिले आहे का, असा प्रश्न ग्राहकांकडून विचारला जात आहे.
‘माझ्या मुलीचे काही प्रोजेक्टस सुरू असून, घरातूनच त्यावर काम करावे लागते. त्यासाठी आम्ही दरमहा वेळेवर रिलायन्सचे बिल भरतो. गेल्या दोन महिन्यांपासून रिलायन्सची इंटरनेटची सेवा अत्यंत सुमार दर्जाची झाली आहे. जो प्लॅन आम्ही घेतला आहे. त्याप्रमाणे इंटरनेट मिळत नसून, अनेकदा बंदही पडते. याची तक्रार करण्यासाठी कॉल सेंटरला पन्नासहून अधिक फोन केले. त्यावर कोणताच प्रतिसाद दिला जात नाही,’ अशी माहिती एका ग्राहकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
इंटरनेट ब्रॉडबँड सेवा उपलब्ध करून देणाऱ्या रिलायन्स ब्रॉडबँडच्या सेवेमध्ये अनेक अडचणी येत असून, त्या संदर्भात तक्रार करणाऱ्या ग्राहकांना कॉल सेंटरद्वारे प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कंपनीकडून देण्यात येणारी इंटरनेट सेवा संथगतीने सुरू असून, त्याबद्दल तक्रार कुणाकडे करायची, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन या कंपनीतर्फे इंटरनेटची सेवा पुरवण्यात येते. शहरातील अनेक ग्राहकांकडे ही सेवा आहे. काही ग्राहकांनी त्याच्या वर्षभराचे आगाऊ पैसे भरले आहेत तरी देखील इंटरनेटची सेवा अत्यंत संथगतीने सुरू आहे. पुणे शहर आणि उपनगरांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवते आहे. या संदर्भात ग्राहकांनी अनेकदा कॉल सेंटरला फोन करून तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना समोरून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
रिलायन्सच्या ब्रॉडबँड संदर्भात ऑनलाइन तक्रारी करण्यासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु वेबसाइटवरच्या तक्रारींनाही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. याशिवाय कंपनीचे कल्याणीनगर येथे महाराष्ट्राचे विभागीय कार्यालय आहे. त्या कार्यालयामध्ये संपर्क केला असता दोन्ही दूरध्वनी क्रमांक चुकीचे असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे, रिलायन्स कम्युनिकेशनचे अस्तित्व पुण्यात केवळ ग्राहकांकडून बिल वसूल करण्यापुरते राहिले आहे का, असा प्रश्न ग्राहकांकडून विचारला जात आहे.
‘माझ्या मुलीचे काही प्रोजेक्टस सुरू असून, घरातूनच त्यावर काम करावे लागते. त्यासाठी आम्ही दरमहा वेळेवर रिलायन्सचे बिल भरतो. गेल्या दोन महिन्यांपासून रिलायन्सची इंटरनेटची सेवा अत्यंत सुमार दर्जाची झाली आहे. जो प्लॅन आम्ही घेतला आहे. त्याप्रमाणे इंटरनेट मिळत नसून, अनेकदा बंदही पडते. याची तक्रार करण्यासाठी कॉल सेंटरला पन्नासहून अधिक फोन केले. त्यावर कोणताच प्रतिसाद दिला जात नाही,’ अशी माहिती एका ग्राहकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.