म. टा. प्रतिनिधी, पुणे
इंटरनेटची सेवा मोफत देणाऱ्या कंपनीला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलतर्फे इंटरनेटसंदर्भातील विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचा वापर करून अधिकाधिक नागरिकांनी बीएसएनएलचे इंटरनेट वापरावे, यासाठी आता कंपनीने इंटरनेट सेवा देणाऱ्या खासगी एजन्सी आणि केबलचालकांशी करार करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना खासगी एजन्सीमार्फतही बीएसएनएलची ब्रॉडबँड सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे.
मोफत इंटरनेटची सेवा देणाऱ्या कंपनीमुळे बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये कमालीची घट झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर कंपनीने आता खासगी एजन्सी आणि केबलचालकांशी करार करण्याचे ठरवले आहे. त्याअंतर्गत कमिशनच्या आधारे हे करार करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत पुण्यातील चार मोठ्या केबलचालकांशी करार करण्यात आले असून, त्याद्वारे बीएसएनएलची इंटरनेट सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. ऑप्टिकल फायबर केबलद्वारे तसेच ‘फायबर टू द होम’ या संकल्पनेद्वारे थेट घरांमध्ये इंटरनेटची सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. शिवाय काही केबल चालकांकडे आधीपासूनच ऑप्टिकल फायबरची सेवा उपलब्ध असल्याने त्यांच्या यंत्रणेचाही बीएसएनएलद्वारे वापर केला जाणार आहे. सध्या संपूर्ण शहरातील इंटरनेटसेवा ऑप्टिकल फायबर केबलवर आधारलेली आहे. तिच्यावरचा भार कमी करण्यासाठी येत्या वर्षभरात देनशे मिनीलींक (हवेतील वायर) शहरात बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे, मुख्य वायरवरील ताण कमी होणार असून इंटरनेटची गती वाढण्यास मदत होणार आहे, अशी माहिती बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी दिली.
लँडलाइन कनेक्शनद्वारे शहरात इंटरनेट सेवा पुरवणारी जमिनीअंतर्गत असलेली तांब्याची वायर जुनी झाली आहे. अनेकदा शहरात होणाऱ्या खोदकामांमुळे त्या वायरीला धक्का बसतो आणि बीएसएनएलची यंत्रणा ठप्प होते. त्यावर उपाय म्हणून ऑप्टिकल फायबरचे जाळे वाढवण्यावर कंपनीकडून भर देण्यात आला आहे.
आठ तालुक्यात इंटरनेट सेवा
पुणे ः केंद्र सरकारच्या आदेशानुसार ग्रामीण भागामध्ये इंटरनेटची सुविधा पोहोचवण्यासाठी बीएसएनएलने पुढाकार घेतला असून चार महिन्यांच्या आत पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये इंटरनेटची सेवा सुरू करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत, ग्रामीण भागातील, शाळा, रुग्णालये, आणि सामान्य नागरिकांनाही या सेवेचा उपभोग घेता येणार आहे.
‘बीएसएनएल’ने गेल्या दोन वर्षांपूर्वी ग्रामीण भागात इंटरनेट व लँडलाइन कनेक्शन पोहोचवण्याचे काम सुरू केले होते. ते काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ग्रामीण भागातील ग्रामपंचायती इंटरनेटच्या माध्यमातून जोडल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील बारामती, दौंड, आंबेगाव, खेड, शिरूर या पाच तालुक्यांमध्ये यंत्रणा बसवण्याचे काम काम अंतिम टप्प्यात आहे. मार्च २०१८ पर्यंत भोर, वेल्हे आणि मुळशी तालुक्यातीलही काम पूर्णत्वास येणार असून आठही तालुक्यातील सुमारे ८५० हून अधिक ग्रामपंचायतींना इंटरनेट आणि लँडलाइन कनेक्शन पुरवण्यात येणार आहे. या सुविधेद्वारे गावातील ग्रामस्थांनाही त्यांच्या घरी इंटरनेटचे कनेक्शन मिळू शकणार आहे. या सुविधेमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातही इंटरनेटती सुविधा उपलब्ध होणार असल्याने शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी, कार्यालयीन कामकाजासाठी इंटरनेटचा उपयोग होणार असून सर्व प्रकारचे ऑनलाइन व्यवहार गावपातळीवर करता येतील.
इंटरनेटची सेवा मोफत देणाऱ्या कंपनीला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलतर्फे इंटरनेटसंदर्भातील विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचा वापर करून अधिकाधिक नागरिकांनी बीएसएनएलचे इंटरनेट वापरावे, यासाठी आता कंपनीने इंटरनेट सेवा देणाऱ्या खासगी एजन्सी आणि केबलचालकांशी करार करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना खासगी एजन्सीमार्फतही बीएसएनएलची ब्रॉडबँड सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे.
मोफत इंटरनेटची सेवा देणाऱ्या कंपनीमुळे बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये कमालीची घट झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर कंपनीने आता खासगी एजन्सी आणि केबलचालकांशी करार करण्याचे ठरवले आहे. त्याअंतर्गत कमिशनच्या आधारे हे करार करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत पुण्यातील चार मोठ्या केबलचालकांशी करार करण्यात आले असून, त्याद्वारे बीएसएनएलची इंटरनेट सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. ऑप्टिकल फायबर केबलद्वारे तसेच ‘फायबर टू द होम’ या संकल्पनेद्वारे थेट घरांमध्ये इंटरनेटची सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. शिवाय काही केबल चालकांकडे आधीपासूनच ऑप्टिकल फायबरची सेवा उपलब्ध असल्याने त्यांच्या यंत्रणेचाही बीएसएनएलद्वारे वापर केला जाणार आहे. सध्या संपूर्ण शहरातील इंटरनेटसेवा ऑप्टिकल फायबर केबलवर आधारलेली आहे. तिच्यावरचा भार कमी करण्यासाठी येत्या वर्षभरात देनशे मिनीलींक (हवेतील वायर) शहरात बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे, मुख्य वायरवरील ताण कमी होणार असून इंटरनेटची गती वाढण्यास मदत होणार आहे, अशी माहिती बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी दिली.
लँडलाइन कनेक्शनद्वारे शहरात इंटरनेट सेवा पुरवणारी जमिनीअंतर्गत असलेली तांब्याची वायर जुनी झाली आहे. अनेकदा शहरात होणाऱ्या खोदकामांमुळे त्या वायरीला धक्का बसतो आणि बीएसएनएलची यंत्रणा ठप्प होते. त्यावर उपाय म्हणून ऑप्टिकल फायबरचे जाळे वाढवण्यावर कंपनीकडून भर देण्यात आला आहे.
आठ तालुक्यात इंटरनेट सेवा
पुणे ः केंद्र सरकारच्या आदेशानुसार ग्रामीण भागामध्ये इंटरनेटची सुविधा पोहोचवण्यासाठी बीएसएनएलने पुढाकार घेतला असून चार महिन्यांच्या आत पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये इंटरनेटची सेवा सुरू करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत, ग्रामीण भागातील, शाळा, रुग्णालये, आणि सामान्य नागरिकांनाही या सेवेचा उपभोग घेता येणार आहे.
‘बीएसएनएल’ने गेल्या दोन वर्षांपूर्वी ग्रामीण भागात इंटरनेट व लँडलाइन कनेक्शन पोहोचवण्याचे काम सुरू केले होते. ते काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ग्रामीण भागातील ग्रामपंचायती इंटरनेटच्या माध्यमातून जोडल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील बारामती, दौंड, आंबेगाव, खेड, शिरूर या पाच तालुक्यांमध्ये यंत्रणा बसवण्याचे काम काम अंतिम टप्प्यात आहे. मार्च २०१८ पर्यंत भोर, वेल्हे आणि मुळशी तालुक्यातीलही काम पूर्णत्वास येणार असून आठही तालुक्यातील सुमारे ८५० हून अधिक ग्रामपंचायतींना इंटरनेट आणि लँडलाइन कनेक्शन पुरवण्यात येणार आहे. या सुविधेद्वारे गावातील ग्रामस्थांनाही त्यांच्या घरी इंटरनेटचे कनेक्शन मिळू शकणार आहे. या सुविधेमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातही इंटरनेटती सुविधा उपलब्ध होणार असल्याने शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी, कार्यालयीन कामकाजासाठी इंटरनेटचा उपयोग होणार असून सर्व प्रकारचे ऑनलाइन व्यवहार गावपातळीवर करता येतील.