मध्यास्थांना थारा नाही; वेटिंगही कमी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ दिवसांत प्रमाणपत्र दिले जाते. ही प्रक्रिया देखील सुलभ आणि पारदर्शक आहे. त्यामुळे शैक्षणिक कारणास्तव जात पडताळणी करणाऱ्यांनी अन्य कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे. शैक्षणिक करणाव्यतिरिक्त अन्य कारणास्तव प्रमाणपत्र काढणाऱ्यांना देखील सोयीचे वातावरण आहे, असेही समितीने म्हटले आहे.
‘काही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांना प्रवेशासाठी दिलेले जात पडताळणी प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले आहे. यामध्ये काही टोळ्या सक्रिय असून, पात्र विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसला आहे. आता त्यांच्यावर प्रवेश रद्द होऊन, गुन्हा दाखल होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे चुकीच्या मार्गाने प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रयत्नात स्वतःचे नुकसान करून घेऊ नका,’ असे समितीचे सदस्य व सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त वासुदेव पाटील यांनी सांगितले.
जात पडताळणी प्रमाणपत्रासाठीची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. अर्ज सादर केल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव जात पडताळणीच्या समिती कार्यालय जमा करावा लागतो. या वेळी अर्ज जमा करण्यासाठी स्वतः अर्जदार किवा शैक्षणिक प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचे पालक संबंधित अर्ज जमा करू शकतात. ‘जातपडताळणीचा अर्ज जमा करणाऱ्या व्यक्तींचा जात पडताळणी कार्यालय येथे फोटो काढला जातो. अर्जावर नमूद केलेल्या मोबाइल नंबरवर पुढील प्रत्येक कार्यवाहीची माहिती मेसेजद्वारे दिली जाते. पुरेशी कागदपत्रे दिलेल्या विद्यार्थ्यांना १५ दिवसांत किंवा, कागदपत्रांतील त्रुटी दूर केल्यापासून १५ दिवसांत प्रमाणपत्र दिले जाते. या सर्व प्रक्रियेत कोठेही गैरप्रकार होत नाही किंवा गैरप्रकार करण्यास वाव नाही,’ असा दावा पाटील यांनी केला आहे.
........
कोट
विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अस्तित्वात असतानाच्या तुलनेत, आता जिल्हा समितीकडे एकूणच पडताळणीसाठी आलेल्या प्रलंबित अर्जांची संख्या तुलनेने खूप कमी आहे. प्रलंबित अर्जांपैकी बहुतांशी अर्जांसोबत सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत. अशा अर्जांची संख्या सुमारे ६५० आहे. त्यामुळे अर्ज प्रलंबित राहण्याचे प्रमाण पुण्यात नगण्य आहे.
वासुदेव पाटील, उपायुक्त, सामाजिक न्याय विभाग
म. टा. प्रतिनिधी, पुणे
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ दिवसांत प्रमाणपत्र दिले जाते. ही प्रक्रिया देखील सुलभ आणि पारदर्शक आहे. त्यामुळे शैक्षणिक कारणास्तव जात पडताळणी करणाऱ्यांनी अन्य कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केले आहे. शैक्षणिक करणाव्यतिरिक्त अन्य कारणास्तव प्रमाणपत्र काढणाऱ्यांना देखील सोयीचे वातावरण आहे, असेही समितीने म्हटले आहे.
‘काही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांना प्रवेशासाठी दिलेले जात पडताळणी प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले आहे. यामध्ये काही टोळ्या सक्रिय असून, पात्र विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसला आहे. आता त्यांच्यावर प्रवेश रद्द होऊन, गुन्हा दाखल होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे चुकीच्या मार्गाने प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रयत्नात स्वतःचे नुकसान करून घेऊ नका,’ असे समितीचे सदस्य व सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त वासुदेव पाटील यांनी सांगितले.
जात पडताळणी प्रमाणपत्रासाठीची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. अर्ज सादर केल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव जात पडताळणीच्या समिती कार्यालय जमा करावा लागतो. या वेळी अर्ज जमा करण्यासाठी स्वतः अर्जदार किवा शैक्षणिक प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचे पालक संबंधित अर्ज जमा करू शकतात. ‘जातपडताळणीचा अर्ज जमा करणाऱ्या व्यक्तींचा जात पडताळणी कार्यालय येथे फोटो काढला जातो. अर्जावर नमूद केलेल्या मोबाइल नंबरवर पुढील प्रत्येक कार्यवाहीची माहिती मेसेजद्वारे दिली जाते. पुरेशी कागदपत्रे दिलेल्या विद्यार्थ्यांना १५ दिवसांत किंवा, कागदपत्रांतील त्रुटी दूर केल्यापासून १५ दिवसांत प्रमाणपत्र दिले जाते. या सर्व प्रक्रियेत कोठेही गैरप्रकार होत नाही किंवा गैरप्रकार करण्यास वाव नाही,’ असा दावा पाटील यांनी केला आहे.
........
कोट
विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अस्तित्वात असतानाच्या तुलनेत, आता जिल्हा समितीकडे एकूणच पडताळणीसाठी आलेल्या प्रलंबित अर्जांची संख्या तुलनेने खूप कमी आहे. प्रलंबित अर्जांपैकी बहुतांशी अर्जांसोबत सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत. अशा अर्जांची संख्या सुमारे ६५० आहे. त्यामुळे अर्ज प्रलंबित राहण्याचे प्रमाण पुण्यात नगण्य आहे.
वासुदेव पाटील, उपायुक्त, सामाजिक न्याय विभाग