म. टा. प्रतिनिधी, पुणे
'करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी तीन जंबो रुग्णालये सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, ही रुग्णालये सुरू होण्यापूर्वी १५ ऑगस्टपर्यंत रुग्णांवर उपचार करण्यासाठी काय व्यवस्था केली? त्यासाठी तत्काळ ऑक्सिजनसज्ज खाटा, आयसीयू आणि व्हेंटिलटरची संख्या वाढविली पाहिजे,' अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली.
कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी सुविधा केंद्रांचे विक्रेंदीकरण करण्याचा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजिलेल्या बैठकीत दिला. 'पुणे महापालिकेने गेल्या चार महिन्यांत करोनासाठी सुमारे ३०० कोटी रुपये खर्च केले असून, राज्य सरकारने त्या बदल्यात अत्यंत नगण्य रक्कम महापालिकेला दिली आहे. करोनामुळे महापालिकेचे उत्पन्न कमी झाले असून, जंबो रुग्णालयासाठी महापालिकेला ७५ कोटी रुपयांचा हिस्सा द्यावा लागणार आहे. महापालिका हा निधी देण्यास तयार आहे. राज्य सरकारने महापालिकेचा काही हिस्सा उचलावा, एवढीच मागणी आहे,' असे पाटील म्हणाले.
'कोणत्याही पक्षाला प्रस्ताव नाही'
राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत, या पाटील यांच्या विधानाने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. पाटील यांनी याबाबत खुलासा करून माध्यमांनी ते विधान चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप केला. शिवसेनाच काय, इतर कुठल्याही पक्षाला आमचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. 'महाराष्ट्रात उद्या आमचे सरकार आले, तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व विधानसभा, लोकसभा निवडणुका आम्ही स्वबळावरच लढणार आहोत; कारण भाजपच्या व्होट बँकेवर आणि पंतप्रधान मोदींच्या नावावर विजयी व्हायचे आणि नंतर तिसरेच करायचे, हे चालवून घेणार नाही. त्यापेक्षा प्रत्येकाने आपापले लढावे,' असे पाटील म्हणाले.
पाटील म्हणाले...
- सौम्य लक्षणांसाठी दहा ऑक्सिजनसज्ज खाटांची व्यवस्था व्हावी.
- प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय वाढला पाहिजे.
- पीपीई, मास्क, औषधे या गोष्टी सरकारने केंद्रीय पद्धतीने रुग्णालयांना द्याव्यात.
- रुग्णालयाने केवळ उपचारांसाठीचा खर्च घ्यावा.
- शरीरात करोनाच्या अँटीबॉडीज् तयार झाल्या की नाहीत, याच्या चाचण्या वाढविल्या पाहिजेत.
'करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी तीन जंबो रुग्णालये सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, ही रुग्णालये सुरू होण्यापूर्वी १५ ऑगस्टपर्यंत रुग्णांवर उपचार करण्यासाठी काय व्यवस्था केली? त्यासाठी तत्काळ ऑक्सिजनसज्ज खाटा, आयसीयू आणि व्हेंटिलटरची संख्या वाढविली पाहिजे,' अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली.
कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी सुविधा केंद्रांचे विक्रेंदीकरण करण्याचा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजिलेल्या बैठकीत दिला. 'पुणे महापालिकेने गेल्या चार महिन्यांत करोनासाठी सुमारे ३०० कोटी रुपये खर्च केले असून, राज्य सरकारने त्या बदल्यात अत्यंत नगण्य रक्कम महापालिकेला दिली आहे. करोनामुळे महापालिकेचे उत्पन्न कमी झाले असून, जंबो रुग्णालयासाठी महापालिकेला ७५ कोटी रुपयांचा हिस्सा द्यावा लागणार आहे. महापालिका हा निधी देण्यास तयार आहे. राज्य सरकारने महापालिकेचा काही हिस्सा उचलावा, एवढीच मागणी आहे,' असे पाटील म्हणाले.
'कोणत्याही पक्षाला प्रस्ताव नाही'
राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत, या पाटील यांच्या विधानाने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. पाटील यांनी याबाबत खुलासा करून माध्यमांनी ते विधान चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप केला. शिवसेनाच काय, इतर कुठल्याही पक्षाला आमचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. 'महाराष्ट्रात उद्या आमचे सरकार आले, तर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व विधानसभा, लोकसभा निवडणुका आम्ही स्वबळावरच लढणार आहोत; कारण भाजपच्या व्होट बँकेवर आणि पंतप्रधान मोदींच्या नावावर विजयी व्हायचे आणि नंतर तिसरेच करायचे, हे चालवून घेणार नाही. त्यापेक्षा प्रत्येकाने आपापले लढावे,' असे पाटील म्हणाले.
पाटील म्हणाले...
- सौम्य लक्षणांसाठी दहा ऑक्सिजनसज्ज खाटांची व्यवस्था व्हावी.
- प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय वाढला पाहिजे.
- पीपीई, मास्क, औषधे या गोष्टी सरकारने केंद्रीय पद्धतीने रुग्णालयांना द्याव्यात.
- रुग्णालयाने केवळ उपचारांसाठीचा खर्च घ्यावा.
- शरीरात करोनाच्या अँटीबॉडीज् तयार झाल्या की नाहीत, याच्या चाचण्या वाढविल्या पाहिजेत.