म. टा. प्रतिनिधी, पुणे
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा विश्रांतवाडी (फुलेनगर) येथील विसावा हा परिवहन कार्यालयालगत (आरटीओ) लगत करण्यात आला आहे. पालखी 'बीआरटी' मार्गातून आल्यानंतर विसाव्याच्या ठिकाणी दत्तमंदिरात जाण्यासाठी बराच वेळ जातो. तसेच, पालखीच्या सारथ्यासाठी असलेल्या बैलांना पालखीसह वळसा घालण्यास अडचणी येत असल्याने विसाव्यात बदल करण्याची मागणी करण्यात आली होती. पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांच्या सूचनेनुसार हा बदल करण्यात आला असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली. फुलेवाडी येथील दत्तमंदिरात पालखीचा परंपरेप्रमाणे विसावा असतो. मात्र, या ठिकाणी 'बीआरटी' मार्ग बांधण्यात आल्याने पालखी ही 'बीआरटी'तून आल्यानंतर दत्तमंदिरात जाण्यासाठी पालखीला वळसा घालावा लागत होता.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा विश्रांतवाडी (फुलेनगर) येथील विसावा हा परिवहन कार्यालयालगत (आरटीओ) लगत करण्यात आला आहे. पालखी 'बीआरटी' मार्गातून आल्यानंतर विसाव्याच्या ठिकाणी दत्तमंदिरात जाण्यासाठी बराच वेळ जातो. तसेच, पालखीच्या सारथ्यासाठी असलेल्या बैलांना पालखीसह वळसा घालण्यास अडचणी येत असल्याने विसाव्यात बदल करण्याची मागणी करण्यात आली होती. पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांच्या सूचनेनुसार हा बदल करण्यात आला असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली. फुलेवाडी येथील दत्तमंदिरात पालखीचा परंपरेप्रमाणे विसावा असतो. मात्र, या ठिकाणी 'बीआरटी' मार्ग बांधण्यात आल्याने पालखी ही 'बीआरटी'तून आल्यानंतर दत्तमंदिरात जाण्यासाठी पालखीला वळसा घालावा लागत होता.