पुणे : धर्मादाय आयुक्तालयाच्या पुणे विभागीय कार्यालयातील २०१०पर्यंतची अनावश्यक कागदपत्रे (रेकॉर्ड) नष्ट करण्याची मोहीम राबविली जाणार आहे. सात जूनपर्यंत मोहिमेनिमित्त न्यायिक कामकाज बंद राहणार आहे. राज्यातील धर्मादाय आयुक्तालयाचे मुख्य आयुक्त एस. बी. सावळे यांनी या संदर्भात आदेश दिले. राज्यात ९ मे पासून मोहीम राबविण्यास सुरुवात झाली होती. 'धर्मादाय आयुक्तालयात कायमस्वरूपी आणि तात्पुरते असे दोन प्रकारचे रेकॉर्ड ठेवण्यात येते. त्यामध्ये रोजनामा पुरावे, उपयुक्त ठरणारे पुरावे त्याशिवाय काही झेरॉक्स कागदपत्रे, इतर विनंती अर्जासारखी किरकोळ कागदपत्रे असे रेकॉर्डचे प्रकार आहेत. त्याशिवाय रोजनामा आणि लेखी दस्तऐवजाचे रेकॉर्ड जतन केले जाते. त्यापैकी झेरॉक्सच्या प्रती, किरकोळ विनंती अर्ज किंवा इतर अनावश्यक कागदपत्रांचे रेकॉर्ड या मोहिमेत नष्ट केले जाणार आहे,’ अशी माहिती धर्मादाय आयुक्तालयातील सूत्रांनी ‘मटा’ला दिली. एखाद्या खटल्यातील पुरावे दहा वर्षांपर्यंत जतन केले जातात. त्यानंतर ते नष्ट करण्यात येतात. कागदपत्रे साठवून ठेवल्याने आगीचा धोका असतो. त्यामुळे महत्त्वाची कागदपत्रेही नष्ट होतात. अनावश्यक कागदपत्रे नष्ट केल्याने इतर कागदपत्रे ठेवण्यासाठी पर्यायी जागा तयार होते. त्यामुळे ही मोहीम राबविण्यात आली आहे.
‘धर्मादाय’ कामकाज सात जूनपर्यंत बंद
धर्मादाय आयुक्तालयाच्या पुणे विभागीय कार्यालयातील २०१०पर्यंतची अनावश्यक कागदपत्रे (रेकॉर्ड) नष्ट करण्याची मोहीम राबविली जाणार आहे. सात जूनपर्यंत मोहिमेनिमित्त न्यायिक कामकाज बंद राहणार आहे.
Maharashtra Times 26 May 2016, 3:00 am