अ‍ॅपशहर

खडसे अग्निपरीक्षेत पास होतील!: मुख्यमंत्री

'राज्य सरकार प्रामाणिक व पारदर्शकपणे काम करत आहे. आमच्याविरोधात काही सापडत नसल्यानंच विरोधक बिनबुडाचे आरोप करत आहेत. मंत्र्यांना लक्ष्य करत आहेत,' असं सांगतानाच, 'एकनाथ खडसे यांच्यावरील आरोप तथ्यहीन आहेत. त्या आरोपांची सध्या चौकशी सुरू असून या अग्निपरीक्षेत ते नक्कीच पास होतील,' असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

Maharashtra Times 18 Jun 2016, 3:06 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cm backs eknath khadse
खडसे अग्निपरीक्षेत पास होतील!: मुख्यमंत्री


'राज्य सरकार प्रामाणिक व पारदर्शकपणे काम करत आहे. आमच्याविरोधात काही सापडत नसल्यानंच विरोधक बिनबुडाचे आरोप करत आहेत. मंत्र्यांना लक्ष्य करत आहेत,' असं सांगतानाच, 'एकनाथ खडसे यांच्यावरील आरोप तथ्यहीन आहेत. त्या आरोपांची सध्या चौकशी सुरू असून या अग्निपरीक्षेत ते नक्कीच पास होतील,' असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

महाराष्ट्र भाजपच्या दोन दिवसीय कार्यकारिणी बैठकीला आज पुण्यात सुरुवात झाली. भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासह दाऊद कनेक्शन व दाऊद घोटाळ्यांच्या आरोपांनंतर मंत्रिपद गेलेले भाजप नेते एकनाथ खडसे हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच, विरोधकांकडून मंत्र्यांवर होणारे आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले. विरोधक सरकारविरोधात गोबेल्स नीतीचा वापर करत आहेत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी एकनाथ खडसे यांचीही पाठराखण केली. 'खडसे यांना दाऊदचा कुठलाही कॉल आलेला नाही. 'एटीएस'च्या तपासातून हे उघड झालंय. गजानन पाटील लाच प्रकरणाशी त्यांचा संबंध नसल्याचंही 'एसीबी'च्या चौकशीतून स्पष्ट झालंय. पुणे एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहारप्रकरणी त्यांनी राजीनामा दिला आहे. ते चौकशीला सामोरे जात असून त्यातून ते लवकरच मुक्त होतील,' असं सांगतानाच, 'ज्या दिवशी आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध होईल, त्या दिवशी पद सोडून घरी जाऊ,' असं त्यांनी स्पष्ट केलं.

कार्यकर्त्यांना आवाहन

'भ्रष्टाचार करणाऱ्यांनी आम्हाला शिष्टाचार शिकवू नये. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी लाटलेले भूखंड परत करावेत, मग सरकारवर आरोप करावेत,' असं फडणवीस यांनी सुनावलं. 'काँग्रेस, राष्ट्रवादीचा भष्ट्राचार खणून काढा, त्यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार करा,' असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज