पुणे : शाळेत केलेल्या गमतीजमती... अभ्यास केला नाही; म्हणून मिळालेली शिक्षा... अशा सगळ्या आठवणींना रविवारी उजाळा मिळाला. भारत हायस्कूलचे (आताची शेठ हिरालाल प्रशाला) १९६८ सालचे दहावीचे विद्यार्थी तब्बल ५० वर्षांनंतर एकत्र जमले. शिक्षकांनी ५० वर्षांपूर्वीच्या या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आठवणी उलगडून सांगितल्या. या वेळी या विद्यार्थ्यांचे शिक्षक रमेश वैद्य, डॉ. वा. मा. आवटी, वैशाली वैद्य, अ. श्री. पुराणिक, पुष्पा करंदीकर, सुधाकर भुरे, मालती दाते, निर्मला बापट उपस्थित होते. मेळाव्यात प्रकाश थोरात संपादित 'सुवर्णस्मृती' या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील आठवणींवर आधारित लेख लिहिले आहेत. शाळेचे माजी विद्यार्थी असलेले उद्योजक प्रकाश थोरात आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधीक्षक सी. डी. देशमुख यांनी पुढाकार घेऊन वर्गातील विद्यार्थ्यांना घरोघरी जाऊन शोधले आणि सगळ्यांना एकत्र आणले. या वेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील आठवणींना उजाळा दिला.
पन्नास वर्षांनी एकत्र
शाळेत केलेल्या गमतीजमती अभ्यास केला नाही; म्हणून मिळालेली शिक्षा अशा सगळ्या आठवणींना रविवारी उजाळा मिळाला...
Maharashtra Times 16 Apr 2018, 5:00 am