म. टा. प्रतिनिधी, पुणे
समान पाणी पुरवठा योजनेच्या फेरनिविदा भरण्यास अवघ्या दोन दिवसांचा अवधी बाकी असताना ठेकेदार कंपन्यांमध्ये फारसा उत्साह नसल्याचे दिसून आले आहे. या निविदा भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी काही ठेकेदार कंपन्यांनी केली असल्याने महापालिका प्रशासनापुढे अडचण निर्माण झाली आहे.
समान पाणी पुरवठा योजनेच्या वादग्रस्त फेरनिविदांमुळे अनेक बड्या कंपन्यांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. त्यातच पाण्याचे मीटर बसविण्याच्या कामात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांना वर्षअखेर, तसेच नाताळमुळे सुट्ट्या असल्याने या कंपन्यांनी निविदा भरण्यास पंधरा दिवसांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
समान पाणी पुरवठा योजनेच्या पहिल्या निविदांमध्ये संगनमताचा आरोप झाल्याने त्या रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या निर्णयानंतर देशात वस्तु सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी झाली आणि या योजनेच्या ‘डीपीआर’ नव्याने करण्यात आला. त्यानंतर झालेल्या एस्टिमेट कमिटीमध्ये या कामाच्या निविदा पहिल्या निविदांपेक्षा ९०० कोटी रुपयांनी कमी झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे फेरनिविदा भरताना सर्वच कंपन्या साशंक झाल्या आहेत. ठेकेदार कंपन्यांकडून प्रतिसाद कमी मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच पारदर्शकतेच्या मुद्द्यावर महापालिका प्रशासनाने ‘जाँइंट व्हेंचर’ला परवानगी देण्याचा निर्णय घेत निविदा भरण्यास मुदतवाढ दिली. त्यानंतरही ठेकेदार कंपन्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
पाण्याच्या लाइन टाकणे, तसेच मीटर बसविण्याचे काम करणाऱ्या पाच ठेकेदार कंपन्यांनी महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून निविदा भरण्याची मुदत पंधरा दिवसांनी वाढविण्याची मागणी केली आहे. त्यावर महापालिका प्रशासन काय निर्णय घेणार याकडे ठेकेदार कंपन्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ठेकेदार कंपन्यांकडून निविदा भरण्यास निश्चित करण्यात आलेल्या पाच जानेवारीला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही, तर निविदांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.
समान पाणी पुरवठा योजनेच्या फेरनिविदा भरण्यास अवघ्या दोन दिवसांचा अवधी बाकी असताना ठेकेदार कंपन्यांमध्ये फारसा उत्साह नसल्याचे दिसून आले आहे. या निविदा भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी काही ठेकेदार कंपन्यांनी केली असल्याने महापालिका प्रशासनापुढे अडचण निर्माण झाली आहे.
समान पाणी पुरवठा योजनेच्या वादग्रस्त फेरनिविदांमुळे अनेक बड्या कंपन्यांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. त्यातच पाण्याचे मीटर बसविण्याच्या कामात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार आहेत. बहुराष्ट्रीय कंपन्यांना वर्षअखेर, तसेच नाताळमुळे सुट्ट्या असल्याने या कंपन्यांनी निविदा भरण्यास पंधरा दिवसांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी केली असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
समान पाणी पुरवठा योजनेच्या पहिल्या निविदांमध्ये संगनमताचा आरोप झाल्याने त्या रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या निर्णयानंतर देशात वस्तु सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी झाली आणि या योजनेच्या ‘डीपीआर’ नव्याने करण्यात आला. त्यानंतर झालेल्या एस्टिमेट कमिटीमध्ये या कामाच्या निविदा पहिल्या निविदांपेक्षा ९०० कोटी रुपयांनी कमी झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. त्यामुळे फेरनिविदा भरताना सर्वच कंपन्या साशंक झाल्या आहेत. ठेकेदार कंपन्यांकडून प्रतिसाद कमी मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच पारदर्शकतेच्या मुद्द्यावर महापालिका प्रशासनाने ‘जाँइंट व्हेंचर’ला परवानगी देण्याचा निर्णय घेत निविदा भरण्यास मुदतवाढ दिली. त्यानंतरही ठेकेदार कंपन्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
पाण्याच्या लाइन टाकणे, तसेच मीटर बसविण्याचे काम करणाऱ्या पाच ठेकेदार कंपन्यांनी महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून निविदा भरण्याची मुदत पंधरा दिवसांनी वाढविण्याची मागणी केली आहे. त्यावर महापालिका प्रशासन काय निर्णय घेणार याकडे ठेकेदार कंपन्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ठेकेदार कंपन्यांकडून निविदा भरण्यास निश्चित करण्यात आलेल्या पाच जानेवारीला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही, तर निविदांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.