म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहराच्या विविध भागांतील पथदिव्यांचा उजेड कमी झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. त्याचबरोबर सायंकाळी सुरू होणारे पथदिवे अनेक भागांत पहाटे पुरेसे उजाडण्याआधीच बंद केले जात आहेत. या अंधारातून जाताना अनेक ठिकाणी खोदकाम, खड्डे आणि राडारोडा यामुळे अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे. परिणामी, अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी पालिका स्वीकारणार का, असा सवाल नागरिक करीत आहेत.
महापालिका हद्दीतील रस्त्यांवर पुरेसे पथदिवे लावून प्रकाशव्यवस्था करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिकेतर्फे काही भागांत हे काम स्वयंचलित यंत्रणेच्या माध्यमातून केले जाते, तर काही ठिकाणी अजूनही कर्मचारी हे काम करतात. उन्हाळा आणि हिवाळ्यात प्रकाशमानानुसार या वेळेत थोडा फार बदल केला जातो. अलिकडे मात्र, पालिकेच्या पथदिव्यांचा उजेडच कमी झाल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्याचबरोबर सिंहगड रस्ता, वारजे-कर्वेनगर, बिबवेवाडीसारख्या भागांत पहाटे पाच साडेपाचच्या आधीच दिवे बंद होत असल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
सध्या शहरात समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. त्यासाठी नव्या वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केले जात आहे. काही ठिकाणी सांडपाणी वाहिन्या बदलण्यासाठीचे काम सुरू आहे. त्याचबरोबर मध्यवर्ती पेठांसह विविध उपनगरांमध्ये रस्त्यांची कामे व इतर विकासकामे सुरू आहेत. काही ठिकाणी या कामांचा राडारोडा पडलेला आहे. पथदिव्यांच्या अपुऱ्या प्रकाशात किंवा पहाटेच्या वेळी पथदिवे बंद झाल्यानंतरच्या अंधारात हे खड्डे, राडारोडा चुकवताना पादचारी तसेच वाहनचालकांचेही अपघात होत आहेत. त्यामुळे पालिकेने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
कोट
महापालिका नागरिकांकडून मिळकतकर वसूल करते. त्याबदल्यात नागरिकांना पुरेशा सुविधा देणे पालिकेचे कर्तव्य आहे. पैशाची बचत हा हेतू ठेवून पुरेसे उजाडण्यापूर्वीच पहाटेच पथदिवे बंद करीत आहे का? तसे असेल तर हा नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ आहे. तो पालिकेने त्वरित थांबवावा.
-एक नागरिक, बिबवेवाडी
पुण्यात अगदी पहाटे साडेतीन-चारपासून नागरिक व्यायाम म्हणून फिरण्यासाठी बाहेर पडतात. रात्रपाळीवरून घरी येणारे आणि लवकर कामावर जाणारे पहाटेच बाहेर पडतात. या काळात पथदिवे बंद असल्याने खड्डे दिसत नाहीत, अनेकदा भटकी कुत्रीही अंगावर येतात. त्यामुळे पहाटेच्या वेळी अपघाताची संख्या वाढते आहे. सकाळी सात वाजेपर्यंत तरी रस्त्यावरील दिवे सुरू असावेत.
मंदार गायकवाड, कर्वेनगर
पालिकेच्या पथदिव्यांचा प्रकाश कमी झाल्याच्या तक्रारी आलेल्या नाहीत. त्याचबरोबर पहाटे लवकर पथदिवे बंद ठेवण्याच्या कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. कोणत्या भागांत असे प्रकार घडत असल्यास त्यांनी पालिकेकडे तक्रार करावी. त्याबाबत माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल.
श्रीनिवास कंदुल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग, महापालिका
---
मटा भूमिका
गेल्या काही वर्षांत ऊर्जा बचतीसाठी सर्वत्र एलईडीच्या दिव्यांचा वापर केला जात असल्याने महापालिकेने पथदिव्यांसाठी त्याचा वापर सुरू केला. सुरुवातीला लहान, गल्ली-बोळातील रस्त्यांवरच एलईडी दिवे लावण्यात आले; मात्र, त्यानंतर अनेक प्रमुख रस्त्यांवरील जुने दिव्यांच्या जागेवर अधिक क्षमतेचे एलईडी दिवे लावण्यात आले. मात्र, पूर्वीच्या प्रखर दिव्यांच्या तुलनेत एलईडी दिव्यांचा उजेड कमी पडत असल्याचे समोर येत आहे. शहरात सध्या सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असून, दिवे बंद असल्याने किंवा पुरेसा प्रकाश येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खोदकाम करताना संबंधित रस्त्यांवरील पथदिवे बंद झाले असल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करणे अथवा प्रमुख रस्त्यांवर अंधार होत असल्यास तेथील पथदिव्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
शहराच्या विविध भागांतील पथदिव्यांचा उजेड कमी झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. त्याचबरोबर सायंकाळी सुरू होणारे पथदिवे अनेक भागांत पहाटे पुरेसे उजाडण्याआधीच बंद केले जात आहेत. या अंधारातून जाताना अनेक ठिकाणी खोदकाम, खड्डे आणि राडारोडा यामुळे अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे. परिणामी, अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी पालिका स्वीकारणार का, असा सवाल नागरिक करीत आहेत.
महापालिका हद्दीतील रस्त्यांवर पुरेसे पथदिवे लावून प्रकाशव्यवस्था करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिकेतर्फे काही भागांत हे काम स्वयंचलित यंत्रणेच्या माध्यमातून केले जाते, तर काही ठिकाणी अजूनही कर्मचारी हे काम करतात. उन्हाळा आणि हिवाळ्यात प्रकाशमानानुसार या वेळेत थोडा फार बदल केला जातो. अलिकडे मात्र, पालिकेच्या पथदिव्यांचा उजेडच कमी झाल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्याचबरोबर सिंहगड रस्ता, वारजे-कर्वेनगर, बिबवेवाडीसारख्या भागांत पहाटे पाच साडेपाचच्या आधीच दिवे बंद होत असल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
सध्या शहरात समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. त्यासाठी नव्या वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केले जात आहे. काही ठिकाणी सांडपाणी वाहिन्या बदलण्यासाठीचे काम सुरू आहे. त्याचबरोबर मध्यवर्ती पेठांसह विविध उपनगरांमध्ये रस्त्यांची कामे व इतर विकासकामे सुरू आहेत. काही ठिकाणी या कामांचा राडारोडा पडलेला आहे. पथदिव्यांच्या अपुऱ्या प्रकाशात किंवा पहाटेच्या वेळी पथदिवे बंद झाल्यानंतरच्या अंधारात हे खड्डे, राडारोडा चुकवताना पादचारी तसेच वाहनचालकांचेही अपघात होत आहेत. त्यामुळे पालिकेने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
कोट
महापालिका नागरिकांकडून मिळकतकर वसूल करते. त्याबदल्यात नागरिकांना पुरेशा सुविधा देणे पालिकेचे कर्तव्य आहे. पैशाची बचत हा हेतू ठेवून पुरेसे उजाडण्यापूर्वीच पहाटेच पथदिवे बंद करीत आहे का? तसे असेल तर हा नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ आहे. तो पालिकेने त्वरित थांबवावा.
-एक नागरिक, बिबवेवाडी
पुण्यात अगदी पहाटे साडेतीन-चारपासून नागरिक व्यायाम म्हणून फिरण्यासाठी बाहेर पडतात. रात्रपाळीवरून घरी येणारे आणि लवकर कामावर जाणारे पहाटेच बाहेर पडतात. या काळात पथदिवे बंद असल्याने खड्डे दिसत नाहीत, अनेकदा भटकी कुत्रीही अंगावर येतात. त्यामुळे पहाटेच्या वेळी अपघाताची संख्या वाढते आहे. सकाळी सात वाजेपर्यंत तरी रस्त्यावरील दिवे सुरू असावेत.
मंदार गायकवाड, कर्वेनगर
पालिकेच्या पथदिव्यांचा प्रकाश कमी झाल्याच्या तक्रारी आलेल्या नाहीत. त्याचबरोबर पहाटे लवकर पथदिवे बंद ठेवण्याच्या कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. कोणत्या भागांत असे प्रकार घडत असल्यास त्यांनी पालिकेकडे तक्रार करावी. त्याबाबत माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल.
श्रीनिवास कंदुल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग, महापालिका
---
मटा भूमिका
गेल्या काही वर्षांत ऊर्जा बचतीसाठी सर्वत्र एलईडीच्या दिव्यांचा वापर केला जात असल्याने महापालिकेने पथदिव्यांसाठी त्याचा वापर सुरू केला. सुरुवातीला लहान, गल्ली-बोळातील रस्त्यांवरच एलईडी दिवे लावण्यात आले; मात्र, त्यानंतर अनेक प्रमुख रस्त्यांवरील जुने दिव्यांच्या जागेवर अधिक क्षमतेचे एलईडी दिवे लावण्यात आले. मात्र, पूर्वीच्या प्रखर दिव्यांच्या तुलनेत एलईडी दिव्यांचा उजेड कमी पडत असल्याचे समोर येत आहे. शहरात सध्या सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असून, दिवे बंद असल्याने किंवा पुरेसा प्रकाश येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खोदकाम करताना संबंधित रस्त्यांवरील पथदिवे बंद झाले असल्यास त्याची तातडीने दुरुस्ती करणे अथवा प्रमुख रस्त्यांवर अंधार होत असल्यास तेथील पथदिव्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.