अ‍ॅपशहर

'धर्मनिरपेक्ष सरकारसाठी काँग्रेसने प्रयत्न करावेत'

'देशात जाती, धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने राज्यघटनेचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे

महाराष्ट्र टाइम्स 27 Dec 2020, 3:55 pm
पुणे : 'देशात जाती, धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने राज्यघटनेचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी काँग्रेसने प्रत्येक गाव, खेड्यात जाऊन, जनतेशी नाळ जोडून पक्ष बळकट करावा आणि धर्मनिरपेक्ष सरकार सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करावेत,' असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम धर्मनिरपेक्ष सरकारसाठी काँग्रेसने प्रयत्न करावेत


काँग्रेसच्या १३५व्या वर्धापनदिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे छायाचित्र प्रदर्शन आणि ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून काँग्रेसचा १३५ वर्षांचा प्रवास दर्शविण्यात आला. या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना देशमुख बोलत होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी, अॅड. अभय छाजेड, बाळासाहेब शिवरकर, महिला अध्यक्षा सोनाली मारणे, बाळासाहेब दाभेकर, अजित दरेकर, अविनाश बागवे, लता राजगुरू, राजेंद्र शिरसाट, द. स. पोळेकर, रजनी त्रिभुवन, डॉ. सतीश देसाई, वीरेंद्र किराड आदी उपस्थित होते. या वेळी शहराध्यक्ष बागवे आणि उल्हास पवार यांचीही भाषणे झाली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज