मानधन न घेण्याची सुरुवात साहित्य महामंडळापासून करण्याची मागणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
साहित्य संमेलनामध्ये सहभागी होणाऱ्या लेखक व कवींनी मानधनाचा त्याग करावा, असे आवाहन आगामी संमेलनाच्या आयोजकांनी केल्याने वादाची ठिणगी पडली आहे. प्रवास खर्च व मानधन याशिवाय साहित्यिक सहभागी होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मानधन नाकारण्याची सुरुवात साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःपासून करावी. महामंडळाच्या बैठकीसाठी व संमेलनाला जाण्यासाठी कुठलेही मानधन व भत्ता घेऊ नये, असा सल्ला साहित्य वर्तुळातून दिला जात आहे.
बडोदा येथे ९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. संमेलनाचा कार्यक्रम जाहीर करताना आयोजकांनी लेखक व कवींनी मानधनाचा त्याग करावा, असे आवाहन केले आहे. संमेलनामध्ये निमंत्रित मान्यवर साहित्यिक आणि समीक्षकांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था आयोजक संस्थेकडून केली जाणार आहे. या मान्यवरांनी मानधनाचा त्याग; तसेच प्रवासखर्च स्वतः करावा, असे आवाहन आयोजक संस्था असलेल्या मराठी वाङ्मय परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोपकर यांनी केले आहे. आयोजकांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी हे देखील सातत्याने हीच भूमिका मांडत आहेत. आपल्या भाषेच्या उत्सवाला येण्यासाठी मानधनाची गरज काय, या जोशींच्या भूमिकेला साहित्य वर्तुळातून विरोध झाला आहे. साहित्य संमेलनात सहभागी होणारे लेखक व कवी राज्याच्या विविध भागातून येतात. प्रत्येकाचीच आर्थिक परिस्थिती चांगली नसते. काही जणांचे उपजीविकेचे साधन आपली कला सादरीकरण हेच असल्याने त्यावर पाणी सोडून पुन्हा प्रवास खर्च कसा करायचा, असा प्रश्न निर्माण केला जातो. आयोजकांच्या आवाहनामुळे पुन्हा हाच प्रश्न निर्माण झाला असल्याने वादाला आयते निमंत्रण मिळाले आहे.
संमेलनात सहभागी होणाऱ्या लेखक व कवींना आयोजकांकडून मानधन आणि प्रवास खर्च दिला जातो. त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था केली जाते. मानधन आणि प्रवास खर्च देण्यावरून आयोजकांनी हात आखडता घेतल्याने संमेलनात सहभागी होण्याची मनीषा बाळगलेले लेखक व कवी धास्तावले आहेत.
…
संमेलनात सहभागी होणाऱ्या मान्यवरांनी मानधनाचा त्याग करावा, असे आव्हान करण्यात आले आहे. याची सुरुवात महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःपासून करावी. महामंडळाच्या बैठकीसाठी व संमेलनाला जाण्यासाठी कुठलेही मानधन व भत्ता घेऊ नये असे मला वाटते.
- सुनील महाजन, माजी कोषाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
म. टा. प्रतिनिधी, पुणे
साहित्य संमेलनामध्ये सहभागी होणाऱ्या लेखक व कवींनी मानधनाचा त्याग करावा, असे आवाहन आगामी संमेलनाच्या आयोजकांनी केल्याने वादाची ठिणगी पडली आहे. प्रवास खर्च व मानधन याशिवाय साहित्यिक सहभागी होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मानधन नाकारण्याची सुरुवात साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःपासून करावी. महामंडळाच्या बैठकीसाठी व संमेलनाला जाण्यासाठी कुठलेही मानधन व भत्ता घेऊ नये, असा सल्ला साहित्य वर्तुळातून दिला जात आहे.
बडोदा येथे ९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. संमेलनाचा कार्यक्रम जाहीर करताना आयोजकांनी लेखक व कवींनी मानधनाचा त्याग करावा, असे आवाहन केले आहे. संमेलनामध्ये निमंत्रित मान्यवर साहित्यिक आणि समीक्षकांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था आयोजक संस्थेकडून केली जाणार आहे. या मान्यवरांनी मानधनाचा त्याग; तसेच प्रवासखर्च स्वतः करावा, असे आवाहन आयोजक संस्था असलेल्या मराठी वाङ्मय परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोपकर यांनी केले आहे. आयोजकांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी हे देखील सातत्याने हीच भूमिका मांडत आहेत. आपल्या भाषेच्या उत्सवाला येण्यासाठी मानधनाची गरज काय, या जोशींच्या भूमिकेला साहित्य वर्तुळातून विरोध झाला आहे. साहित्य संमेलनात सहभागी होणारे लेखक व कवी राज्याच्या विविध भागातून येतात. प्रत्येकाचीच आर्थिक परिस्थिती चांगली नसते. काही जणांचे उपजीविकेचे साधन आपली कला सादरीकरण हेच असल्याने त्यावर पाणी सोडून पुन्हा प्रवास खर्च कसा करायचा, असा प्रश्न निर्माण केला जातो. आयोजकांच्या आवाहनामुळे पुन्हा हाच प्रश्न निर्माण झाला असल्याने वादाला आयते निमंत्रण मिळाले आहे.
संमेलनात सहभागी होणाऱ्या लेखक व कवींना आयोजकांकडून मानधन आणि प्रवास खर्च दिला जातो. त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था केली जाते. मानधन आणि प्रवास खर्च देण्यावरून आयोजकांनी हात आखडता घेतल्याने संमेलनात सहभागी होण्याची मनीषा बाळगलेले लेखक व कवी धास्तावले आहेत.
…
संमेलनात सहभागी होणाऱ्या मान्यवरांनी मानधनाचा त्याग करावा, असे आव्हान करण्यात आले आहे. याची सुरुवात महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःपासून करावी. महामंडळाच्या बैठकीसाठी व संमेलनाला जाण्यासाठी कुठलेही मानधन व भत्ता घेऊ नये असे मला वाटते.
- सुनील महाजन, माजी कोषाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ