म. टा. प्रतिनिधी, पुणे: चीनमधून महाराष्ट्रात आलेल्या ३८ पैकी १५ जणांना सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे आढळून आल्याने त्यांना स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले होते. त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यापैकी पुण्यातील दोन जणांचा समावेश आहे.
दरम्यान, आणखी एका संशयिताला नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल तपासणी सुरु असून ३१ तारखेपर्यंत ५ हजार १२८ इतके प्रवासी तपासण्यात आले. त्यापैकी ४ प्रवासी महाराष्ट्रातील आहेत. तर क्षेत्रीय सर्वेक्षणात आढळलेले आणखी ३४ प्रवासी असे एकूण ३८ प्रवासी बाधित भागातून आलेले आढळले आहेत. ३८ जणांपैकी आजवर एकूण १५ प्रवाशांना ताप, सर्दी, खोकला यासारखी सौम्य लक्षणे आढळल्याने त्यांना स्वतंत्र कक्षात ठेवले होते. त्यापैकी १५ प्रवाशांची दुसऱ्यांदा केलेली चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना केंद्र सरकारच्या आदेशानुसार घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.
दरम्यान, आणखी एका संशयिताला नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांची थर्मल तपासणी सुरु असून ३१ तारखेपर्यंत ५ हजार १२८ इतके प्रवासी तपासण्यात आले. त्यापैकी ४ प्रवासी महाराष्ट्रातील आहेत. तर क्षेत्रीय सर्वेक्षणात आढळलेले आणखी ३४ प्रवासी असे एकूण ३८ प्रवासी बाधित भागातून आलेले आढळले आहेत. ३८ जणांपैकी आजवर एकूण १५ प्रवाशांना ताप, सर्दी, खोकला यासारखी सौम्य लक्षणे आढळल्याने त्यांना स्वतंत्र कक्षात ठेवले होते. त्यापैकी १५ प्रवाशांची दुसऱ्यांदा केलेली चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना केंद्र सरकारच्या आदेशानुसार घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.