पुणे: मुंबईपाठोपाठ सर्वाधिक करोनाग्रस्त असलेल्या पुण्यात आज करोनामुळं पहिला मृत्यू झाला. ५२ वर्षांच्या या रुग्णावर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Corona Live: औरंगाबादेत काही लोकांनी रेशन दुकान फोडले
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हा रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासूनच व्हेंटिलेटरवर होता. त्याला मधुमेह, रक्तदाब व हायपरटेन्शनचा त्रास होता. सुरुवातीपासून त्याची प्रकृती खालावलेली होती. त्याचे अनेक अवयव निकामी झाले होते. अखेर आज त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळं राज्यात करोना मृत्यूंची संख्या ९ झाली आहे.
राज्यात मुंबईनंतर पुणे जिल्ह्यात करोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४३ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यात पुण्यातील ३१ तर, पिंपरी-चिंचवडमधील १२ रुग्णांचा समावेश आहे.
करोनाचा तिसरा टप्पा अत्यंत घातक मानला जात आहे. या टप्प्यात करोनाचे रुग्ण गुणाकार पद्धतीनं वाढण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जातं. मात्र, राज्यानं या टप्प्यात प्रवेश करू नये, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी नागरिकांनी पोलीस व सर्व प्रशासकीय यंत्रणांना सहकार्य करावं, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. शरद पवार यांनीही आज पुन्हा एकदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेला आवाहन केलं आहे. आम्हीही घरात आहोत. तुम्हीही घरातच थांबा, असं त्यांनी म्हटलं आहे.
वाचा: शरद पवारांनी करून दिली पुढील संकटाची जाणीव
वाचा: ही वेळ राष्ट्र आणि महाराष्ट्र वाचवण्याची: शिवसेना
Corona Live: औरंगाबादेत काही लोकांनी रेशन दुकान फोडले
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हा रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासूनच व्हेंटिलेटरवर होता. त्याला मधुमेह, रक्तदाब व हायपरटेन्शनचा त्रास होता. सुरुवातीपासून त्याची प्रकृती खालावलेली होती. त्याचे अनेक अवयव निकामी झाले होते. अखेर आज त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळं राज्यात करोना मृत्यूंची संख्या ९ झाली आहे.
राज्यात मुंबईनंतर पुणे जिल्ह्यात करोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४३ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यात पुण्यातील ३१ तर, पिंपरी-चिंचवडमधील १२ रुग्णांचा समावेश आहे.
अचानक १२ वाढले! राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा २१५ वर
करोनाचा तिसरा टप्पा अत्यंत घातक मानला जात आहे. या टप्प्यात करोनाचे रुग्ण गुणाकार पद्धतीनं वाढण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जातं. मात्र, राज्यानं या टप्प्यात प्रवेश करू नये, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी नागरिकांनी पोलीस व सर्व प्रशासकीय यंत्रणांना सहकार्य करावं, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. शरद पवार यांनीही आज पुन्हा एकदा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेला आवाहन केलं आहे. आम्हीही घरात आहोत. तुम्हीही घरातच थांबा, असं त्यांनी म्हटलं आहे.
वाचा: शरद पवारांनी करून दिली पुढील संकटाची जाणीव
वाचा: ही वेळ राष्ट्र आणि महाराष्ट्र वाचवण्याची: शिवसेना