अ‍ॅपशहर

Dasara Melava : शरद पवार, तुम्ही शिंदे-ठाकरेंमध्ये समेट घडवून आणणार का?, अजितदादा स्पष्टच बोलले...

Ajit Pawar News : मुंबईत आज उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दसरा मेळावे होत आहेत. या दसरा मेळाव्यातून दोन्ही बाजूने शक्तिप्रदर्शन केले जात आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर मोठी फूट पडली आणि शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर शिंदे आणि ठाकरेंमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात गेला आहे. खरी शिवसेना कोणाची? यावर निवडणूक आयोग निर्णय देणार आहे. यामुळे दसरा मेळाव्यांकडे जनतेसह विरोधी पक्षातील नेत्यांचेही लक्ष आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Oct 2022, 5:05 pm
पिंपरी, पुणे : उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) गटाचे वाद एवढ्या पराकोटीला गेले आहेत की, कुणी सामंजस्याची भूमिका घ्यायची हा खरा प्रश्न आहे. दोन्ही गटांनी एकमेकांची ताकद दाखवून पक्ष जरूर वाढवावा. मात्र लोकशाहीच्या परंपरा त्यांनी जपायला हव्यात. लोकशाहीला कुठे बाधा येणार नाही, त्याला डाग लागणार नाही आणि दसरा मेळाव्यात कोणतीही कटुता निर्माण होणार नाही, याची काळजी दोघांनी घेणे गरजेचे आहे, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar News ) यांनी दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ajit pawar
शरद पवार शिंदे-ठाकरेंमध्ये समेट घडवून आणणार का? अजितदादा स्पष्टच बोलले...


पिंपरी येथे अजित पवार माध्यमांशी बोलत होते. ठाकरे आणि शिंदे गटात शब्दाने शब्द वाढत आहेत, एकाने आरे म्हटलं की दुसऱ्याने कारे म्हणायचं. यातून वाद खालपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळं त्यांना एकमेकांचे शत्रू वाटू लागतात. आपापल्या भूमिका सांगण्याचं कार्यक्रम झाला की राजकीय जोडे बाजूला ठेऊन, सलोख्याच्या भावनेने पाहणे गरजेचे असल्याचे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून कुमक; सर्व जिल्ह्यांतून ५० हजार कार्यकर्ते

शरद पवार साहेब ( Sharad Pawar ) किंवा तुम्ही ठाकरे आणि शिंदेमध्ये समेट घडवण्यासाठी प्रयत्न करणार का? असा प्रश्न अजित दादांना विचारण्यात आला. मी तर मागे भर सभागृहातच (विधानसभेत ) बोलताना यासंदर्भात एकनाथ शिंदेंना आवाहन केलं होतं. संपूर्ण महाराष्ट्राने ते पाहिलं आहे. शेवटी प्रत्येकाच्या काय भूमिका आहेत, काय उद्दीष्ट आहे, काय त्यांनी ठरवलं आहे, हेही महत्त्वाचं असतं. पण कुठलीही गोष्ट फारकाळ टोकाची राहत नाही. जसे दिवस पुढे जातील, तशी त्यांच्यातील कटुता कमी होईल. जेव्हा जनतेसमोर हे दोघं जातील, म्हणजे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचा पोटनिवडणुकीच्या निकालावर सर्वांचं लक्ष राहिल. आणि नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाकडेही लक्ष असेल, असं अजित पवार म्हणाले.

शिंदेंकडून दसरा मेळाव्यासाठी १८०० एसटी बस बूक, उद्धव ठाकरेंच्या बहिणीचे दोन सवाल

महत्वाचे लेख