म. टा. प्रतिनिधी, पुणे ‘समाजातील मुलींची संख्या घटण्यास महिलाही पुरुषांएवढ्याच जबाबदार आहेत. पोटची मुलगी आणि मुलगा यांना वाढविताना होणारे भेद, मुलीचा जन्म नाकारण्यात महिलांचीही चूक आहे. मुलगी हे सौभाग्य आहे, तिचे सबलीकरण झाले पाहिजे,’ असे मत पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मंगळवारी व्यक्त केले. एसएनडीटी विद्यापीठाच्या शतकपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, माजी महापौर कमल व्यवहारे, डॉ. जी. वाय. शितोळे, डॉ. रेवा कुलकर्णी यांच्यासह विद्यापीठाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. शुल्का यांनी मनोगतामध्ये महिलांच्या समाजातील बदलत गेलेल्या भूमिकांचा आढावा घेतला. ‘पुरुषांच्याबरोबरीने अनेक महिला मुलींना जन्म देण्यास विरोध करतात. मुलींचे संगोपन करतानाही भेद होतो. जर पालकांनी आपला जन्म नाकारला असता तर काय झाले असते, याचा विचार केला पाहिजे. पालकांची आणि शिक्षकांची शिकवण आज विसरलो आहोत. मुली या ईश्वराचे वरदान असल्यामुळे तिला नाकारू नका. मुलींचे सबलीकरण झाल्यास समाजाचा योग्य दिशेने विकास होईल,’ असे त्यांनी सांगितले. कुलकर्णी यांनीही विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचे दाखले दिले. ‘महिलांनी स्वतःला कमी लेखण्याची मानसिकता बदलली पाहिजे. आपण कोणाही पेक्षा कमी नसून पुरुषांच्याही पुढे जाऊन काम करण्याचे कौशल्य आपल्याकडे उपजत आहे. त्याचा उपयोग करून महिलांनी समाजाच्या विकासासाठी पुढे आले पाहिजे,’ असे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. माजी प्राचार्या अश्विनी धोंगडे यांनी विद्यापीठाचा शंभर वर्षांचा इतिहास मनोगतातून उलगडला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या माजी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. विद्यापीठाचा शतकपूर्तीनिमित्त काढलेला गौरव अंक आणि व्हिजन स्टेटमेंट या पुस्तिकेचेही या वेळी प्रकाशन झाले.
मुलीचा जन्म नाकारण्यात महिलाही जबाबदार : रश्मी शुक्ला
‘समाजातील मुलींची संख्या घटण्यास महिलाही पुरुषांएवढ्याच जबाबदार आहेत. पोटची मुलगी आणि मुलगा यांना वाढविताना होणारे भेद, मुलीचा जन्म नाकारण्यात महिलांचीही चूक आहे. मुलगी हे सौभाग्य आहे, तिचे सबलीकरण झाले पाहिजे,’ असे मत पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मंगळवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jul 2016, 3:21 am
म. टा. प्रतिनिधी, पुणे ‘समाजातील मुलींची संख्या घटण्यास महिलाही पुरुषांएवढ्याच जबाबदार आहेत. पोटची मुलगी आणि मुलगा यांना वाढविताना होणारे भेद, मुलीचा जन्म नाकारण्यात महिलांचीही चूक आहे. मुलगी हे सौभाग्य आहे, तिचे सबलीकरण झाले पाहिजे,’ असे मत पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मंगळवारी व्यक्त केले. एसएनडीटी विद्यापीठाच्या शतकपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, माजी महापौर कमल व्यवहारे, डॉ. जी. वाय. शितोळे, डॉ. रेवा कुलकर्णी यांच्यासह विद्यापीठाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. शुल्का यांनी मनोगतामध्ये महिलांच्या समाजातील बदलत गेलेल्या भूमिकांचा आढावा घेतला. ‘पुरुषांच्याबरोबरीने अनेक महिला मुलींना जन्म देण्यास विरोध करतात. मुलींचे संगोपन करतानाही भेद होतो. जर पालकांनी आपला जन्म नाकारला असता तर काय झाले असते, याचा विचार केला पाहिजे. पालकांची आणि शिक्षकांची शिकवण आज विसरलो आहोत. मुली या ईश्वराचे वरदान असल्यामुळे तिला नाकारू नका. मुलींचे सबलीकरण झाल्यास समाजाचा योग्य दिशेने विकास होईल,’ असे त्यांनी सांगितले. कुलकर्णी यांनीही विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचे दाखले दिले. ‘महिलांनी स्वतःला कमी लेखण्याची मानसिकता बदलली पाहिजे. आपण कोणाही पेक्षा कमी नसून पुरुषांच्याही पुढे जाऊन काम करण्याचे कौशल्य आपल्याकडे उपजत आहे. त्याचा उपयोग करून महिलांनी समाजाच्या विकासासाठी पुढे आले पाहिजे,’ असे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. माजी प्राचार्या अश्विनी धोंगडे यांनी विद्यापीठाचा शंभर वर्षांचा इतिहास मनोगतातून उलगडला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या माजी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. विद्यापीठाचा शतकपूर्तीनिमित्त काढलेला गौरव अंक आणि व्हिजन स्टेटमेंट या पुस्तिकेचेही या वेळी प्रकाशन झाले.