अ‍ॅपशहर

मतांचा परतावा विकासात दिसेल

‘राहुल गांधी, शरद पवार, अजित पवार यांच्या पक्षाची अवस्था दिवाळखोरीत निघालेल्या बँकेसारखी आहे. त्यांना मते देऊन मत वाया घालवू नका. मोदींच्या नेतृत्वाखाली तुमच्या मतांचा परतावा विकासाच्या माध्यमातून नक्कीच मिळेल,’ या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेऊन भारतीय जनता पक्षाला सेवेची संधी देण्याचे दौंडवासीयांना आवाहन केले.

Maharashtra Times 15 Feb 2017, 4:16 am
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दौंडकरांना आश्वासन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम devendra phadanvis attacked on pawar rahul gandhi
मतांचा परतावा विकासात दिसेल


म. टा. वृत्तसेवा, दौंड

‘राहुल गांधी, शरद पवार, अजित पवार यांच्या पक्षाची अवस्था दिवाळखोरीत निघालेल्या बँकेसारखी आहे. त्यांना मते देऊन मत वाया घालवू नका. मोदींच्या नेतृत्वाखाली तुमच्या मतांचा परतावा विकासाच्या माध्यमातून नक्कीच मिळेल,’ या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेऊन भारतीय जनता पक्षाला सेवेची संधी देण्याचे दौंडवासीयांना आवाहन केले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी मंगळवारी मुख्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर आले होते. दौंड, शिरूर, बारामती, हवेली, तालुक्यातील भाजप, रासप आणि आरपीआयच्या उमेदवारांच्या प्रचाराचा आरंभ फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या वेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पशु आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, शिरूर हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे, दौंडचे आमदार अॅड. राहुल कुल, मालेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, दौंडच्या नगराध्यक्षा शीतल कटारिया, पृथ्वीराज जाचक, दादा पाटील फराटे, वासुदेव काळे यांच्यासह भाजप, रासप आणि आरपीआयचे पदाधिकारी आणि उमेदवार उपस्थित होते.
‘आघाडी सरकारने राज्याची तिजोरी रिकामी केली. धरणांची कामे टक्केवारीसाठी मारुतीच्या शेपटासारखी सुरूच ठेवली. त्यामुळे धड सिंचनही झाले नाही आणि राज्य कर्जबाजारी झाले. तिजोरी रिकामी असतानाह भाजप सरकारने शेतकरी हिताच्या योजना राबवताना हात आखडता घेतला नाही. जे विरोधकांना पंधरा वर्षांत जमले नाही, ते आम्ही दोन वर्षात करून दाखवले. भीमा पाटस सहकरी साखर कारखाना कुठल्याही परिस्थितीत आर्थिक संकटातून बाहेर काढला जाईल, यासाठी राज्य सरकार हवी ती मदत करेलच. त्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनाही विनंती करू आणि यशवंत सहकारी साखर कारखान्याबाबत मार्ग काढू,’ असेही फडणवीस यांनी नमूद केले.
जानकर म्हणाले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसकडे नोटाबंदीशिवाय दुसरा मुद्दाच नाही. एकीकडे हे नोटाबंदीला जोरदार विरोध करतात आणि दुसरीकडे मोदींना जेवायला घरी घेऊन जायचे अशी यांची दुहेरी नीती आहे.’

अजित पवार म्हणजे पाण्यावाचून तडफडणारा मासा आहे. सत्तेअभावी त्यांची अवस्था सत्तेसाठी पाण्यावाचून तडफडणाऱ्या माशासारखी झाली आहे. त्यांचे स्थान आता केवळ बारामतीपुरते राहिले आहे. राष्ट्रवादीचे सगळे नेते घोटाळेखोर असून, त्यांचे पुढील संमेलन तुरुंगातच घ्यावे लागेल.
गिरीश बापट, पालकमंत्री

राष्ट्रवादीला ‘दे धक्का’
शिरूर पंचायत समिती उपसभापतीपदाचा राजीनामा देऊन मंगल लंघे आणि त्यांच्या कार्यकर्त्यानी मंगळवारी वरवंड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज