म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘ज्या राज्याची अधिकृत भाषा मराठी आहे, त्याच आपल्या महाराष्ट्रात ‘मी मराठीचा शिक्षक का झालो’ असा प्रश्न जर शिक्षकांना पडत असेल तर, त्याहून दुर्दैवी गोष्ट काय असेल?... मराठी शाळांमध्ये पालक आपल्या मुलांना टाकतच नसतील तर, शाळा वाढणार कशा?...’ असे काही मूलभूत प्रश्न उपस्थित करत राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आपली खंत व्यक्त केली.
‘पुणे पुस्तक जत्रे’च्या (पुणे बुक फेअर) उद्घाटनप्रसंगी रावते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितिन करमळकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, अनिल गोरे, संयोजक पी.एन.आर. राजन आदी या वेळी उपस्थित होते. यावेळी रावते यांनी पुणे महापालिकेतील मराठी भाषा संवर्धन समितीची पाठ थोपटली. अशी समिती मुंबई महापालिकेत देखील सुरू व्हावी, असा प्रयत्न आपण करू; असे त्यांनी सांगितले. मराठीसोबतच देशासाठीच्या अधिकृत भाषेच्या मुद्द्यालाही त्यांनी हात घातला. ते म्हणाले, ‘एकीकडे जगभरातील प्रत्येक देशास स्वतःची अधिकृत राष्ट्रभाषा असताना भारतात मात्र स्वतःची अधिकृत राष्ट्रभाषा नसावी, हे मोठे दुर्दैवी आहे. हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा नाही, ती संपर्कभाषा आहे; हे आपण लक्षात घ्यायला हवे.’
एसटी कर्मचाऱ्यांनी ‘मृगजळा’च्या मागे धावू नये...
देशात कुठेही सातवा वेतन आयोग अद्याप लागू झालेला नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी या ‘मृगजळा’च्या मागे लागू नये. त्यांना कायद्यानुसार या आयोगाप्रमाणे वेतन मिळू शकणार नाही. शिवाय, सातवा वेतन आयोग हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रश्न आहे. मात्र, कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्यासाठी आम्ही सकारात्मक पाऊल नक्कीच उचलू, असे रावते म्हणाले. ‘एस.टी. कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार का ?’ या प्रश्नावर त्यांनी ‘बघू’ म्हणत वेळ मारून नेली!
किती अपघात वाढलेत?
एसटीच्या वाढत चाललेल्या अपघातांबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, ‘किती अपघात वाढलेत ?... मी तर गेल्या दोन महिन्यात एकाही मृताला दहा लाख रुपये दिलेले नाहीत... म्हणजे अपघातात प्राणहानी झालेलीच नाही,’ असे उत्तर देत रावते यांनी अपघातांविषयी त्यांना असणारे ‘गांभीर्य’ दाखवून दिले.
‘ज्या राज्याची अधिकृत भाषा मराठी आहे, त्याच आपल्या महाराष्ट्रात ‘मी मराठीचा शिक्षक का झालो’ असा प्रश्न जर शिक्षकांना पडत असेल तर, त्याहून दुर्दैवी गोष्ट काय असेल?... मराठी शाळांमध्ये पालक आपल्या मुलांना टाकतच नसतील तर, शाळा वाढणार कशा?...’ असे काही मूलभूत प्रश्न उपस्थित करत राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आपली खंत व्यक्त केली.
‘पुणे पुस्तक जत्रे’च्या (पुणे बुक फेअर) उद्घाटनप्रसंगी रावते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितिन करमळकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, अनिल गोरे, संयोजक पी.एन.आर. राजन आदी या वेळी उपस्थित होते. यावेळी रावते यांनी पुणे महापालिकेतील मराठी भाषा संवर्धन समितीची पाठ थोपटली. अशी समिती मुंबई महापालिकेत देखील सुरू व्हावी, असा प्रयत्न आपण करू; असे त्यांनी सांगितले. मराठीसोबतच देशासाठीच्या अधिकृत भाषेच्या मुद्द्यालाही त्यांनी हात घातला. ते म्हणाले, ‘एकीकडे जगभरातील प्रत्येक देशास स्वतःची अधिकृत राष्ट्रभाषा असताना भारतात मात्र स्वतःची अधिकृत राष्ट्रभाषा नसावी, हे मोठे दुर्दैवी आहे. हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा नाही, ती संपर्कभाषा आहे; हे आपण लक्षात घ्यायला हवे.’
एसटी कर्मचाऱ्यांनी ‘मृगजळा’च्या मागे धावू नये...
देशात कुठेही सातवा वेतन आयोग अद्याप लागू झालेला नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी या ‘मृगजळा’च्या मागे लागू नये. त्यांना कायद्यानुसार या आयोगाप्रमाणे वेतन मिळू शकणार नाही. शिवाय, सातवा वेतन आयोग हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रश्न आहे. मात्र, कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्यासाठी आम्ही सकारात्मक पाऊल नक्कीच उचलू, असे रावते म्हणाले. ‘एस.टी. कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार का ?’ या प्रश्नावर त्यांनी ‘बघू’ म्हणत वेळ मारून नेली!
किती अपघात वाढलेत?
एसटीच्या वाढत चाललेल्या अपघातांबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, ‘किती अपघात वाढलेत ?... मी तर गेल्या दोन महिन्यात एकाही मृताला दहा लाख रुपये दिलेले नाहीत... म्हणजे अपघातात प्राणहानी झालेलीच नाही,’ असे उत्तर देत रावते यांनी अपघातांविषयी त्यांना असणारे ‘गांभीर्य’ दाखवून दिले.