म. टा. प्रतिनिधी, पुणे काम संपवून मध्यरात्री दमूनभागून घरी जाताना काही कारणांस्तव वाटेत थांबलेल्या कर्मचाऱ्यांना किंवा गाडीवरून जाणाऱ्यांना अडवून लुटण्याच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अशाच प्रकारच्या दोन घटना पुणे-बेंगळुरू महामार्गालगतच्या परिसरात घडल्याने रात्री प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता पुन्हा ऐरणीवर आली आहे. शहराचा सातत्याने होणारा विस्तार, आयटी कंपन्यांची वाढलेली संख्या आणि बदलती जीवनशैली यामुळे शहरातील रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत बऱ्यापैकी वर्दळ असते. मात्र, कामाच्या निमित्ताने किंवा विरंगुळा म्हणून होणारी ही रात्रीची भटकंती अनेकदा धोकादायक ठरत असल्याचे दिसून आले आहे.
मध्यरात्री रस्त्यावरथांबू नका... बी अलर्ट !
म टा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jul 2019, 4:00 am