म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
'राजकीय फायद्यासाठी व मते मिळविण्यासाठी थोर विचारवंत, साधू-संत व महापुरुषांच्या नावाचा वापर करू नये. समाजात तेढ निर्माण होऊन जातीचे राजकारण केले जात आहे. नागरिकांनी यासाठी विरोध दर्शवून असे आढळून आल्यास अशा व्यक्तींचा विरोध करायला हवा,' असे प्रतिपादन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पिंपरी-चिंचवड शहराचे शहराध्यक्ष दिलीप कुलकर्णी यांनी केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवडच्या वतीने तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी दिलीप कुलकर्णी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या थेरगाव येथील पुतळ्यास या वेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महेश बारसावडे, संजीवनी पांडे, सुहास पोफळे, नंदू भोगले आदी उपस्थित होते.
सलोखा परिषद
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पिंपरी-चिंचवड तर्फे सामाजिक सलोखा परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी अखिल भारतीय ब्रह्मण महासंघ पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल व श्रीफळ देऊन आठवले यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे उपाध्यक्ष राजन बुडुख आदींसह आरपीआयचे आणि ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. समाजामध्ये जाती-जातींमध्ये होत असलेली तेढ कमी करण्याच्या उद्देशाने पिंपरी येथे सामाजिक सलोखा परिषद घेण्यात आली.
'अध्यात्मामुळे स्वास्थ्य'
'आज आपण दहशतवाद, धमक्या, अनैतिक नीतीमूल्ये यामुळे दिवसेंदिवस सामाजिक स्थिती उद्ध्वस्त होत चालली आहे. प्रत्येक जण भीती व दहशतवादाने ग्रासला आहे. अशा वेळी अध्यात्म हेच माणसाला मानसिक स्वास्थ्य मिळवून देते,' असे मत माता अमृतानंदमयी यांनी निगडी येथे व्यक्त केले. संत माता अमृतानंदमयी देवी तथा अम्मा यांची भारतयात्रा सुरू आहे. या यात्रेचा एक भाग म्हणून निगडी येथे प्रवचन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर, माजी अतिरिक्त आयुक्त रोहिदास कोंडे, आकुर्डी डी. वाय. पाटील कॉलेजचे भरत चव्हाण पाटील, वाशीम येथील आमदार विजय जाधव, उद्योजक कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते.
शहर भाजपचा जल्लोष
भारतीय जनता पक्षाची २१ राज्यात सत्ता स्थापन झाली. यानिमित्त शहर भाजपच्या वतीने निगडी टिळक चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार अमर साबळे यांच्या नेतृत्वाखाली हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी अमर साबळे यांच्यासह प्रदेश चिटणीस उमा खापरे, उपमहापौर शैलजा मोरे, प्रदेश सदस्य अमित गोरखे, सरचिटणीस अमोल थोरात, शहर उपाध्यक्ष राजू दुर्गे, नगरसेविका अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, तुषार हिंगे, केशव घोळवे, कमल घोलप, अश्विनी बोबडे आदींसह पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
'राजकीय फायद्यासाठी व मते मिळविण्यासाठी थोर विचारवंत, साधू-संत व महापुरुषांच्या नावाचा वापर करू नये. समाजात तेढ निर्माण होऊन जातीचे राजकारण केले जात आहे. नागरिकांनी यासाठी विरोध दर्शवून असे आढळून आल्यास अशा व्यक्तींचा विरोध करायला हवा,' असे प्रतिपादन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पिंपरी-चिंचवड शहराचे शहराध्यक्ष दिलीप कुलकर्णी यांनी केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवडच्या वतीने तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी दिलीप कुलकर्णी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या थेरगाव येथील पुतळ्यास या वेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महेश बारसावडे, संजीवनी पांडे, सुहास पोफळे, नंदू भोगले आदी उपस्थित होते.
सलोखा परिषद
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पिंपरी-चिंचवड तर्फे सामाजिक सलोखा परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी अखिल भारतीय ब्रह्मण महासंघ पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल व श्रीफळ देऊन आठवले यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे उपाध्यक्ष राजन बुडुख आदींसह आरपीआयचे आणि ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. समाजामध्ये जाती-जातींमध्ये होत असलेली तेढ कमी करण्याच्या उद्देशाने पिंपरी येथे सामाजिक सलोखा परिषद घेण्यात आली.
'अध्यात्मामुळे स्वास्थ्य'
'आज आपण दहशतवाद, धमक्या, अनैतिक नीतीमूल्ये यामुळे दिवसेंदिवस सामाजिक स्थिती उद्ध्वस्त होत चालली आहे. प्रत्येक जण भीती व दहशतवादाने ग्रासला आहे. अशा वेळी अध्यात्म हेच माणसाला मानसिक स्वास्थ्य मिळवून देते,' असे मत माता अमृतानंदमयी यांनी निगडी येथे व्यक्त केले. संत माता अमृतानंदमयी देवी तथा अम्मा यांची भारतयात्रा सुरू आहे. या यात्रेचा एक भाग म्हणून निगडी येथे प्रवचन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर, माजी अतिरिक्त आयुक्त रोहिदास कोंडे, आकुर्डी डी. वाय. पाटील कॉलेजचे भरत चव्हाण पाटील, वाशीम येथील आमदार विजय जाधव, उद्योजक कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित होते.
शहर भाजपचा जल्लोष
भारतीय जनता पक्षाची २१ राज्यात सत्ता स्थापन झाली. यानिमित्त शहर भाजपच्या वतीने निगडी टिळक चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार अमर साबळे यांच्या नेतृत्वाखाली हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी अमर साबळे यांच्यासह प्रदेश चिटणीस उमा खापरे, उपमहापौर शैलजा मोरे, प्रदेश सदस्य अमित गोरखे, सरचिटणीस अमोल थोरात, शहर उपाध्यक्ष राजू दुर्गे, नगरसेविका अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, तुषार हिंगे, केशव घोळवे, कमल घोलप, अश्विनी बोबडे आदींसह पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.