महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्यांऐवजी गल्ली बोळांत सक्ती जोरात सुरू
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 'हेल्मेट सक्ती'ची काटेकोर अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांनी सर्वाधिक अपघातांची शक्यता असलेल्या महामार्गांकडे मात्र पूर्णत: डोळेझाक केली आहे. पुणे शहराच्या हद्दीतून आणि हद्दीलगत राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग जातात; पण या ठिकाणी गेल्या आठवडाभरात पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. शहरात वाहनांचा सरासरी वेग प्रति तास जेमतेम १८ ते २० किलोमीटर असताना, तेथे कारवाईचा दंडुका उचलला जात आहे. परंतु, महामार्गांवर खरी गरज असताना, तेथे साफ दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे, पोलिसांना खरेच वाहनचालकांचे अपघात रोखायचे आहेत, की दंड वसुलीतून महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहर पोलिसांनी एक जानेवारीपासून विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. गेल्या सात दिवसांत शहरातील छोट्या-छोट्या रस्त्यांवर वाहन चालविणाऱ्या तब्बल ५० हजार जणांना दंड करण्यात आला आहे. गल्लीबोळात कारवाई नको, अशी भूमिका पालकमंत्री गिरीश बापट यांनीही दोन दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती. तरीही, पोलिसांनी गल्लीबोळ आणि शहरातील मुख्य रस्त्यांवर सर्वाधिक कारवाई करून ५० हजारांहून अधिक नागरिकांना अडीच कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. शहरात वाहनांचा वेग ताशी २० किमीपेक्षा जास्त नसताना, पोलिसांकडून चौकाचौकांमध्ये वाहनचालकांना अडवून दंड केला जात आहे. मात्र, दुसरीकडे शहरातून जाणाऱ्या आणि शहरालगतच्या राष्ट्रीय-राज्य महामार्गांवर सरासरी वेग यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असताना, गेल्या आठ दिवसांत या ठिकाणी कारवाई करायला पोलिसांना वेळ मिळालेला नाही.
हेल्मेट सक्तीला विरोध करणाऱ्या अनेकांनीही राष्ट्रीय-राज्य महामार्गांवर हेल्मेट आवश्यक असून, तेथे पोलिसांनी त्याची सक्ती जरूर करावी, अशी भूमिका मांडली आहे. तरीही, पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करून केवळ शहरातच कारवाई सुरू केली आहे. शहराच्या हद्दीबाहेर सर्व महामार्गांवर अनेक मोठी आणि अवजड वाहने मोठ्या संख्येने आणि वेगाने जात असतानाही या ठिकाणी हेल्मेट न घालणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात नाही.
पिंपरीत कारवाई नाहीच
पुणे शहरात पोलिसांनी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू केली आहे; पण पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मात्र हेल्मेट सक्ती नाही. तसेच, ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतही दुचाकीवरून फिरणाऱ्यांना हेल्मेट सक्ती केली जात नाही. त्यामुळे, केवळ पुणेकर नागरिकांचीच सुरक्षा महत्त्वाची मानली जात असून, पिंपरी आणि ग्रामीण भागांतील वाहनचालकांना पुण्यात कामानिमित्त यायचे झाल्यास त्यांनाही हेल्मेटचा वापर करावा लागणार आहे. कायदा सर्वांना समान असताना, पोलिसांच्या या दुटप्पी भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी हेल्मेट सक्ती हवीच, असा आग्रह धरला असताना, इतर ठिकाणच्या पोलिसांनी मात्र हेल्मेटशिवाय इतर गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेकडे अधिक लक्ष दिले आहे.
म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 'हेल्मेट सक्ती'ची काटेकोर अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांनी सर्वाधिक अपघातांची शक्यता असलेल्या महामार्गांकडे मात्र पूर्णत: डोळेझाक केली आहे. पुणे शहराच्या हद्दीतून आणि हद्दीलगत राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग जातात; पण या ठिकाणी गेल्या आठवडाभरात पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. शहरात वाहनांचा सरासरी वेग प्रति तास जेमतेम १८ ते २० किलोमीटर असताना, तेथे कारवाईचा दंडुका उचलला जात आहे. परंतु, महामार्गांवर खरी गरज असताना, तेथे साफ दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे, पोलिसांना खरेच वाहनचालकांचे अपघात रोखायचे आहेत, की दंड वसुलीतून महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहर पोलिसांनी एक जानेवारीपासून विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. गेल्या सात दिवसांत शहरातील छोट्या-छोट्या रस्त्यांवर वाहन चालविणाऱ्या तब्बल ५० हजार जणांना दंड करण्यात आला आहे. गल्लीबोळात कारवाई नको, अशी भूमिका पालकमंत्री गिरीश बापट यांनीही दोन दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती. तरीही, पोलिसांनी गल्लीबोळ आणि शहरातील मुख्य रस्त्यांवर सर्वाधिक कारवाई करून ५० हजारांहून अधिक नागरिकांना अडीच कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. शहरात वाहनांचा वेग ताशी २० किमीपेक्षा जास्त नसताना, पोलिसांकडून चौकाचौकांमध्ये वाहनचालकांना अडवून दंड केला जात आहे. मात्र, दुसरीकडे शहरातून जाणाऱ्या आणि शहरालगतच्या राष्ट्रीय-राज्य महामार्गांवर सरासरी वेग यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असताना, गेल्या आठ दिवसांत या ठिकाणी कारवाई करायला पोलिसांना वेळ मिळालेला नाही.
हेल्मेट सक्तीला विरोध करणाऱ्या अनेकांनीही राष्ट्रीय-राज्य महामार्गांवर हेल्मेट आवश्यक असून, तेथे पोलिसांनी त्याची सक्ती जरूर करावी, अशी भूमिका मांडली आहे. तरीही, पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करून केवळ शहरातच कारवाई सुरू केली आहे. शहराच्या हद्दीबाहेर सर्व महामार्गांवर अनेक मोठी आणि अवजड वाहने मोठ्या संख्येने आणि वेगाने जात असतानाही या ठिकाणी हेल्मेट न घालणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात नाही.
पिंपरीत कारवाई नाहीच
पुणे शहरात पोलिसांनी हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू केली आहे; पण पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मात्र हेल्मेट सक्ती नाही. तसेच, ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतही दुचाकीवरून फिरणाऱ्यांना हेल्मेट सक्ती केली जात नाही. त्यामुळे, केवळ पुणेकर नागरिकांचीच सुरक्षा महत्त्वाची मानली जात असून, पिंपरी आणि ग्रामीण भागांतील वाहनचालकांना पुण्यात कामानिमित्त यायचे झाल्यास त्यांनाही हेल्मेटचा वापर करावा लागणार आहे. कायदा सर्वांना समान असताना, पोलिसांच्या या दुटप्पी भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी हेल्मेट सक्ती हवीच, असा आग्रह धरला असताना, इतर ठिकाणच्या पोलिसांनी मात्र हेल्मेटशिवाय इतर गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्थेकडे अधिक लक्ष दिले आहे.