महापालक सन्मान प्रसंगी महापौरांची घोषणा; डॉ. राजा आणि रेणू दांडेकरांना पुरस्कार प्रदान
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘पुणे महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी चांगल्या शिक्षकांची आवश्यकता आहे. चांगल्या शिक्षकांनी या शाळांमध्ये यावे, यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने नेमण्यात येणाऱ्या शिक्षकांचा मासिक पगार ऑगस्ट महिन्यापासून सहा हजारांहून दहा हजारांपर्यत वाढविण्यात येणार आहे. त्यानंतर तो बारा हजार रुपयांपर्यत करण्यात येईल,’ अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी रविवारी दिली.
आंतरराष्ट्रीय पालक दिनाचे औचित्य साधून डीपर, सर फाउंडेशन व ‘तुम्ही-आम्ही पालक’ मासिकाच्या वर्धापदिनानिमित्त डीपर व सर फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘महापालक सन्मान २०१७’ चिखलगाव येथे शिक्षणक्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या डॉ. राजाभाऊ व रेणूताई दांडेकर या दाम्पत्याला प्रदान करण्यात आला. या वेळी टिळक बोलत होत्या. ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, सर फाउंडेशनचे संस्थापक हरीश बुटले, रोहिणी बुटले आदी उपस्थित होते. याप्रसंगी दोन्ही हात नसलेल्या लक्ष्मी शिंदे या विद्यार्थिनीचाही सत्कार करण्यात आला. बुटले कुटुंबीयांच्या वतीने तिचा शैक्षणिक खर्च उचलण्यात आला असून, ५० हजारांचा धनादेश या वेळी तिच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
‘शिक्षकांचा उचित सन्मान करून विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. महापालिकेच्या शाळेमध्ये असे शिक्षक नेमण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे, कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या शिक्षकांचा पगार लवकरच वाढवण्यात येईल’, असे महापौर टिळक यांनी जाहीर केले. दांडेकर दाम्पत्याचे कौतुक करताना त्या म्हणाल्या, ‘कौशल्यपूर्ण, प्रकल्पाधारित शिक्षणातून चिखलगावामध्ये डॉ. राजाभाऊ आणि रेणू दांडेकर यांनी उत्तम विद्यार्थी घडविले. चांगल्या समाजासाठी विद्यार्थी घडविण्याचे काम हे दाम्पत्य करीत आहे. शिक्षणासंबंधी लोकमान्य टिळकांनी मांडलेले विचार आचरणात आणून ते कृतीत उतरविण्याचे कार्य दांडेकर दाम्पत्याने केले आहे.’
डॉ. राजाभाऊ दांडेकर म्हणाले, ‘हा सन्मान माझ्या गावातील प्रत्येक व्यक्तीचा व संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा आहे. जीवनात यशस्वी होण्यापेक्षा जीवन सार्थकी लावण्यावर आपला भर हवा. त्यामुळे आजच्या या सन्मानाने शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहण्याची जबाबदारी आली आहे. समाजातील अनेक किमयागार माणसांकडून प्रेरणा घेत हे काम उभारले आहे.’ रेणू दांडेकर म्हणाल्या, ‘सामाजिक जाणिवेतून एक वेगळी शैक्षणिक रचना उभी करण्याचा प्रयत्न चिखलगावात केला आहे. कल्पक, निर्मितीक्षम विचारांच्या युवकांची आज देशाला गरज असून, त्या दृष्टीने तेथे काम चालते आहे.’ निरगुडकर यांनी मार्गदर्शन केले. बुटले यांनी प्रास्ताविक केले. मुक्ता गरसोळे यांनी सूत्रसंचालन केले.
म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘पुणे महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी चांगल्या शिक्षकांची आवश्यकता आहे. चांगल्या शिक्षकांनी या शाळांमध्ये यावे, यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने नेमण्यात येणाऱ्या शिक्षकांचा मासिक पगार ऑगस्ट महिन्यापासून सहा हजारांहून दहा हजारांपर्यत वाढविण्यात येणार आहे. त्यानंतर तो बारा हजार रुपयांपर्यत करण्यात येईल,’ अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी रविवारी दिली.
आंतरराष्ट्रीय पालक दिनाचे औचित्य साधून डीपर, सर फाउंडेशन व ‘तुम्ही-आम्ही पालक’ मासिकाच्या वर्धापदिनानिमित्त डीपर व सर फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘महापालक सन्मान २०१७’ चिखलगाव येथे शिक्षणक्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या डॉ. राजाभाऊ व रेणूताई दांडेकर या दाम्पत्याला प्रदान करण्यात आला. या वेळी टिळक बोलत होत्या. ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, सर फाउंडेशनचे संस्थापक हरीश बुटले, रोहिणी बुटले आदी उपस्थित होते. याप्रसंगी दोन्ही हात नसलेल्या लक्ष्मी शिंदे या विद्यार्थिनीचाही सत्कार करण्यात आला. बुटले कुटुंबीयांच्या वतीने तिचा शैक्षणिक खर्च उचलण्यात आला असून, ५० हजारांचा धनादेश या वेळी तिच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
‘शिक्षकांचा उचित सन्मान करून विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. महापालिकेच्या शाळेमध्ये असे शिक्षक नेमण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे, कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या शिक्षकांचा पगार लवकरच वाढवण्यात येईल’, असे महापौर टिळक यांनी जाहीर केले. दांडेकर दाम्पत्याचे कौतुक करताना त्या म्हणाल्या, ‘कौशल्यपूर्ण, प्रकल्पाधारित शिक्षणातून चिखलगावामध्ये डॉ. राजाभाऊ आणि रेणू दांडेकर यांनी उत्तम विद्यार्थी घडविले. चांगल्या समाजासाठी विद्यार्थी घडविण्याचे काम हे दाम्पत्य करीत आहे. शिक्षणासंबंधी लोकमान्य टिळकांनी मांडलेले विचार आचरणात आणून ते कृतीत उतरविण्याचे कार्य दांडेकर दाम्पत्याने केले आहे.’
डॉ. राजाभाऊ दांडेकर म्हणाले, ‘हा सन्मान माझ्या गावातील प्रत्येक व्यक्तीचा व संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा आहे. जीवनात यशस्वी होण्यापेक्षा जीवन सार्थकी लावण्यावर आपला भर हवा. त्यामुळे आजच्या या सन्मानाने शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहण्याची जबाबदारी आली आहे. समाजातील अनेक किमयागार माणसांकडून प्रेरणा घेत हे काम उभारले आहे.’ रेणू दांडेकर म्हणाल्या, ‘सामाजिक जाणिवेतून एक वेगळी शैक्षणिक रचना उभी करण्याचा प्रयत्न चिखलगावात केला आहे. कल्पक, निर्मितीक्षम विचारांच्या युवकांची आज देशाला गरज असून, त्या दृष्टीने तेथे काम चालते आहे.’ निरगुडकर यांनी मार्गदर्शन केले. बुटले यांनी प्रास्ताविक केले. मुक्ता गरसोळे यांनी सूत्रसंचालन केले.