Mustafa.Attar @timesgroup.com Tweet : @mustafaattarMT
पुणे :
वरकरणी राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र दिसत असले, तरी राज्यातील रक्त संकलनात गेल्या चार वर्षांत वाढ झाल्याचे समोर आले आहे. चार वर्षांपूर्वी राज्यात संकलित झालेल्या रक्ताचे प्रमाण १५ लाख ६० हजार युनिटवरून गेल्या वर्षी १६ लाख ५६ हजार ४२० युनिटपर्यंत पोहोचले. चार वर्षांच्या कालावधीत अतिरिक्त एक लाख युनिट रक्त संकलित झाल्याने लाखोंचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. जागतिक रक्तदान दिवस जगभर १४ जूनला पाळण्यात येतो. या पार्श्वभूमीवर राज्य रक्त संक्रमण परिषदेने (एसबीटीसी) राज्यातील रक्त संकलनाची वस्तुस्थिती कथन केली. 'राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या अहवालानुसार लोकसंख्येच्या १ टक्का रक्तदान होणे अपेक्षित आहे. राज्याची लोकसंख्या १२ कोटी आहे; या पार्श्वभूमीवर सुमारे ११.५० लाख ते १२ लाख युनिट वार्षिक रक्तसंकलन होणे अपेक्षित आहे. मात्र, वाढते अपघात, संसर्ग, डिलिव्हरी, वाढत्या शस्त्रक्रिया, थॅलेसेमिया आदींमुळे रक्ताची मागणी वाढत आहे. वाढत्या मागणीमुळे रक्त संकलनावर भर देण्यात आला आहे. २०१८ मध्ये राज्यातील ३३६ रक्तपेढ्यांमधून १६ लाख ५६ हजार ४२० युनिट रक्त संकलित झाले असून, संकलनात महाराष्ट्र अग्रेसर आहे,' अशी माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी 'मटा'ला दिली. राज्यात गेल्या वर्षी संकलित झालेल्या १६ लाख ५६ हजार ४२० युनिट रक्तापैकी १.२७ टक्के रक्त दूषित आढळले. मलेरिया, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, व्हीडीआरएल आदी आजारांमुळे दूषित रक्त आढळते. एकूण रक्ताच्या केवळ ०.१५ टक्का रक्त 'एचआयव्ही'बाधित असल्याचेही आढळले आहे. २०१४मध्ये राज्यात १५ लाख ६० हजार युनिट रक्त संकलन झाले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संकलनाचा आलेख वाढताच असल्याचे दिसून आले आहे. ऐच्छिक रक्तदान करणाऱ्यांनी दर तीन महिन्याला रक्तदान करण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे प्रत्येक रक्तपेढीत रक्ताचा पुरेसा साठा राहील आणि गरजूंना दिलासा मिळेल, असे आवाहनही डॉ. थोरात यांनी केले.
पुणे :
वरकरणी राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र दिसत असले, तरी राज्यातील रक्त संकलनात गेल्या चार वर्षांत वाढ झाल्याचे समोर आले आहे. चार वर्षांपूर्वी राज्यात संकलित झालेल्या रक्ताचे प्रमाण १५ लाख ६० हजार युनिटवरून गेल्या वर्षी १६ लाख ५६ हजार ४२० युनिटपर्यंत पोहोचले. चार वर्षांच्या कालावधीत अतिरिक्त एक लाख युनिट रक्त संकलित झाल्याने लाखोंचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. जागतिक रक्तदान दिवस जगभर १४ जूनला पाळण्यात येतो. या पार्श्वभूमीवर राज्य रक्त संक्रमण परिषदेने (एसबीटीसी) राज्यातील रक्त संकलनाची वस्तुस्थिती कथन केली. 'राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या अहवालानुसार लोकसंख्येच्या १ टक्का रक्तदान होणे अपेक्षित आहे. राज्याची लोकसंख्या १२ कोटी आहे; या पार्श्वभूमीवर सुमारे ११.५० लाख ते १२ लाख युनिट वार्षिक रक्तसंकलन होणे अपेक्षित आहे. मात्र, वाढते अपघात, संसर्ग, डिलिव्हरी, वाढत्या शस्त्रक्रिया, थॅलेसेमिया आदींमुळे रक्ताची मागणी वाढत आहे. वाढत्या मागणीमुळे रक्त संकलनावर भर देण्यात आला आहे. २०१८ मध्ये राज्यातील ३३६ रक्तपेढ्यांमधून १६ लाख ५६ हजार ४२० युनिट रक्त संकलित झाले असून, संकलनात महाराष्ट्र अग्रेसर आहे,' अशी माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी 'मटा'ला दिली. राज्यात गेल्या वर्षी संकलित झालेल्या १६ लाख ५६ हजार ४२० युनिट रक्तापैकी १.२७ टक्के रक्त दूषित आढळले. मलेरिया, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, व्हीडीआरएल आदी आजारांमुळे दूषित रक्त आढळते. एकूण रक्ताच्या केवळ ०.१५ टक्का रक्त 'एचआयव्ही'बाधित असल्याचेही आढळले आहे. २०१४मध्ये राज्यात १५ लाख ६० हजार युनिट रक्त संकलन झाले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संकलनाचा आलेख वाढताच असल्याचे दिसून आले आहे. ऐच्छिक रक्तदान करणाऱ्यांनी दर तीन महिन्याला रक्तदान करण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे प्रत्येक रक्तपेढीत रक्ताचा पुरेसा साठा राहील आणि गरजूंना दिलासा मिळेल, असे आवाहनही डॉ. थोरात यांनी केले.