लोणावळा:
मद्यधुंद पर्यटकांनी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला मारहाण केल्याची घटना गुरुवारी लोणावळ्यात घडली. या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुशी धरणावर पर्यटनासाठी आलेले पाच पर्यटक धरणाच्या पायऱ्यांवर बसून दारूच्या नशेत एकमेकांचे कपडे उतरवून धिंगाणा घालत होते. ते पाहून ड्युटीवर असलेल्या पोलिस नाईक सुभाष दत्तू शिंदे यांनी संबंधितांची समजूत घालून सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करण्यापासून रोखले. मात्र, संतापलेल्या तरुणांनी शिंदे यांना शिवीगाळ करून जबर मारहाण केली. त्यानंतत त्यांनी तेथून पळ काढला. पळून जात असताना स्थानिकांनी तरुणांचा पाठलाग करून त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.
राहुल लालासाहेब कदम (वय ३०), राहुल दिलीप गुणवरे (वय ३०), अतुल अंबादास गुणवरे (वय ३०), पवन शिवाजी गुणवरे (वय २८) आणि दत्तात्रय कुंडलिक गुणवरे (वय २८, सर्व रा. चिंचोली, गुणवरे वस्ती, दौंड) अशी या तरुणांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस नाईक सुभाष दत्तू शिंदे (वय २५, लोणावळा शहर पोलिस ठाणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित पाच तरुण भीमाशंकर येथे फिरायला गेले होते. तेथून ते पर्यटनासाठी लोणावळ्याला आले. लोणावळ्याला त्यांनी भुशी धरणावर जाण्याचा निर्णय घेतला. तेथे त्यांनी दारूच्या नशेत एकमेकांचे कपडे उतरवून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्या वेळी तेथे अन्य पर्यटकही होते. त्यामुळे शिंदे यांनी त्यांना सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करताना हटकले. 'साडेपाच वाजता धरणावर कुणीही फिरकत नाही. धरण बंद करण्यात येणार आहे. तुम्ही येथून घरी जा,' असेही शिंदे यांनी त्या तरुणांना सांगितले. त्यावर राग आल्याने मद्यधुंद तरुणांनी शिंदे यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर शिंदे यांनी पुन्हा त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता, तरुणांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाण केल्यानंतर तरुणांनी पळण्याचा प्रयत्न केला असता, स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्या विरोधात लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मद्यधुंद पर्यटकांनी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला मारहाण केल्याची घटना गुरुवारी लोणावळ्यात घडली. या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुशी धरणावर पर्यटनासाठी आलेले पाच पर्यटक धरणाच्या पायऱ्यांवर बसून दारूच्या नशेत एकमेकांचे कपडे उतरवून धिंगाणा घालत होते. ते पाहून ड्युटीवर असलेल्या पोलिस नाईक सुभाष दत्तू शिंदे यांनी संबंधितांची समजूत घालून सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करण्यापासून रोखले. मात्र, संतापलेल्या तरुणांनी शिंदे यांना शिवीगाळ करून जबर मारहाण केली. त्यानंतत त्यांनी तेथून पळ काढला. पळून जात असताना स्थानिकांनी तरुणांचा पाठलाग करून त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.
राहुल लालासाहेब कदम (वय ३०), राहुल दिलीप गुणवरे (वय ३०), अतुल अंबादास गुणवरे (वय ३०), पवन शिवाजी गुणवरे (वय २८) आणि दत्तात्रय कुंडलिक गुणवरे (वय २८, सर्व रा. चिंचोली, गुणवरे वस्ती, दौंड) अशी या तरुणांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस नाईक सुभाष दत्तू शिंदे (वय २५, लोणावळा शहर पोलिस ठाणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित पाच तरुण भीमाशंकर येथे फिरायला गेले होते. तेथून ते पर्यटनासाठी लोणावळ्याला आले. लोणावळ्याला त्यांनी भुशी धरणावर जाण्याचा निर्णय घेतला. तेथे त्यांनी दारूच्या नशेत एकमेकांचे कपडे उतरवून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्या वेळी तेथे अन्य पर्यटकही होते. त्यामुळे शिंदे यांनी त्यांना सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करताना हटकले. 'साडेपाच वाजता धरणावर कुणीही फिरकत नाही. धरण बंद करण्यात येणार आहे. तुम्ही येथून घरी जा,' असेही शिंदे यांनी त्या तरुणांना सांगितले. त्यावर राग आल्याने मद्यधुंद तरुणांनी शिंदे यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर शिंदे यांनी पुन्हा त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता, तरुणांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
मारहाण केल्यानंतर तरुणांनी पळण्याचा प्रयत्न केला असता, स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्या विरोधात लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.