म. टा. प्रतिनिधी, पुणे
नगरसेवक आबा बागूल यांच्यातर्फे आयोजित पुणे नवरात्र महोत्सवाच्या उद्घाटनाला गुरुवारी ज्येष्ठ नेते शरद पवार अनुपस्थित राहिल्याने पालकमंत्री गिरीश बापट यांनी बागूल यांची विकेट घेतली. ‘आबा राष्ट्रवादीचा नसला, तरी सारखा घडाळ्याकडे बघतो. मात्र, शरदरावांनी अखेर त्याला ‘पंजा’च दाखवला,’ अशा शब्दांत बापट यांनी पवार यांच्या अनुपस्थितीचे आणि ‘तू काँग्रेसमध्येच थांब,’ अशा दिलेल्या सुप्त संकेतातून फटकेबाजीने धमाल उडवून दिली.
गणेश कला क्रीडा रंगमंच येथे २३व्या नवरात्रौ महोत्सवाचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते झाल्यानंतर राजकीय फटकेबाजीला उधाण आले. बापट यांच्यासह ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी फटकेबाजीची संधी सोडली नाही. महापौर मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, शरद रणपिसे, माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर अंकुश काकडे, आयोजक आबा बागूल व जयश्री बागूल या वेळी उपस्थित होते.
बागूल यांनी भाषणात उल्हासदादांऐवजी जोशी यांचा उल्लेख गुरू म्हणून केला. तसेच, बापट यांचेही तोंडभरून कौतुक केले. त्यावर उल्हासदादा यांनी, ‘आबाने आज गुरू बदलून टाकला. इतकी वर्षे मी गुरू होतो. आता मला मार्गदर्शक करून टाकले,’ असा टोला लगावला. ‘बापट यांचे किती कौतुक कोणत्या कोणत्या पक्षातील लोक करतात, असा प्रश्न सौ. बापट यांना पडेल,’ अशी कोपरखळी त्यांनी मारली. उल्हासदादांच्या या विनोदी पेरणीने त्यांच्याच शब्दांत ‘क्या बात है,’ अशी दाद व्यासपीठावरून आणि प्रेक्षागृहात उमटली. ‘पालकमंत्री सर्वांचेच मार्गदर्शक असतात. त्यामुळे बापट आमचेही मार्गदर्शक आहेत. पाऊस खूप पडल्याने सरकारला आता काळजी नाही,’ असा टोला पाटील यांनी लगावला.
‘नारायण राणेंनी काँग्रेस सोडल्यामुळे रणपिसे खूश आहेत. राजकारणात खूप गुरू भेटतात; पण चांगला शिष्य भेटत नाही. चांगली माणसे विरोधी पक्षात असावीत म्हणून आबा काँग्रेसमध्येच बरा आहे. आबा अजून नगरसेवकच कसा, असा प्रश्न मला पडतो; पण काँग्रेसला आज असेही चांगले दिवस नाहीत,’ असे चिमटे बापट यांनी काढले. ‘निवडणुकीत नसली, तरी आबाला आमची कायम मदत असते. निवडून कसे यायचे, हे कानात सांगितले जाते,’ ही ‘आतली गोष्ट’ बापट यांनी सांगताच राजकीय मंडळींना हसू आवरले नाही. उपस्थितांनी विविध कलाकारांच्या सादरीकरणाबरोबर राजकीय मंडळींच्या फटकेबाजीतून आनंदसरी अनुभवल्या.
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार मोना मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, पुरुषोत्तम महाराज पाटील, कलावंत बरखा जळगावकर, अभिनेता सुबोध भावे यांना ‘श्री लक्ष्मीमाता कला संस्कृती जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अभिनेत्री किशोरी शहाणे, मानसी नाईक, श्वेता शिंदे, भार्गवी चिरमुले, अभिज्ञा भावे, दीप्ती देवी, गिरीजा प्रभू, तेजा देवकर, बॉबी वीज, नादरूप संस्था, विनोद धोपटे यांचा सत्कार करण्यात आला. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.
नगरसेवक आबा बागूल यांच्यातर्फे आयोजित पुणे नवरात्र महोत्सवाच्या उद्घाटनाला गुरुवारी ज्येष्ठ नेते शरद पवार अनुपस्थित राहिल्याने पालकमंत्री गिरीश बापट यांनी बागूल यांची विकेट घेतली. ‘आबा राष्ट्रवादीचा नसला, तरी सारखा घडाळ्याकडे बघतो. मात्र, शरदरावांनी अखेर त्याला ‘पंजा’च दाखवला,’ अशा शब्दांत बापट यांनी पवार यांच्या अनुपस्थितीचे आणि ‘तू काँग्रेसमध्येच थांब,’ अशा दिलेल्या सुप्त संकेतातून फटकेबाजीने धमाल उडवून दिली.
गणेश कला क्रीडा रंगमंच येथे २३व्या नवरात्रौ महोत्सवाचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते झाल्यानंतर राजकीय फटकेबाजीला उधाण आले. बापट यांच्यासह ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी फटकेबाजीची संधी सोडली नाही. महापौर मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, शरद रणपिसे, माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर अंकुश काकडे, आयोजक आबा बागूल व जयश्री बागूल या वेळी उपस्थित होते.
बागूल यांनी भाषणात उल्हासदादांऐवजी जोशी यांचा उल्लेख गुरू म्हणून केला. तसेच, बापट यांचेही तोंडभरून कौतुक केले. त्यावर उल्हासदादा यांनी, ‘आबाने आज गुरू बदलून टाकला. इतकी वर्षे मी गुरू होतो. आता मला मार्गदर्शक करून टाकले,’ असा टोला लगावला. ‘बापट यांचे किती कौतुक कोणत्या कोणत्या पक्षातील लोक करतात, असा प्रश्न सौ. बापट यांना पडेल,’ अशी कोपरखळी त्यांनी मारली. उल्हासदादांच्या या विनोदी पेरणीने त्यांच्याच शब्दांत ‘क्या बात है,’ अशी दाद व्यासपीठावरून आणि प्रेक्षागृहात उमटली. ‘पालकमंत्री सर्वांचेच मार्गदर्शक असतात. त्यामुळे बापट आमचेही मार्गदर्शक आहेत. पाऊस खूप पडल्याने सरकारला आता काळजी नाही,’ असा टोला पाटील यांनी लगावला.
‘नारायण राणेंनी काँग्रेस सोडल्यामुळे रणपिसे खूश आहेत. राजकारणात खूप गुरू भेटतात; पण चांगला शिष्य भेटत नाही. चांगली माणसे विरोधी पक्षात असावीत म्हणून आबा काँग्रेसमध्येच बरा आहे. आबा अजून नगरसेवकच कसा, असा प्रश्न मला पडतो; पण काँग्रेसला आज असेही चांगले दिवस नाहीत,’ असे चिमटे बापट यांनी काढले. ‘निवडणुकीत नसली, तरी आबाला आमची कायम मदत असते. निवडून कसे यायचे, हे कानात सांगितले जाते,’ ही ‘आतली गोष्ट’ बापट यांनी सांगताच राजकीय मंडळींना हसू आवरले नाही. उपस्थितांनी विविध कलाकारांच्या सादरीकरणाबरोबर राजकीय मंडळींच्या फटकेबाजीतून आनंदसरी अनुभवल्या.
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार मोना मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर, पुरुषोत्तम महाराज पाटील, कलावंत बरखा जळगावकर, अभिनेता सुबोध भावे यांना ‘श्री लक्ष्मीमाता कला संस्कृती जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अभिनेत्री किशोरी शहाणे, मानसी नाईक, श्वेता शिंदे, भार्गवी चिरमुले, अभिज्ञा भावे, दीप्ती देवी, गिरीजा प्रभू, तेजा देवकर, बॉबी वीज, नादरूप संस्था, विनोद धोपटे यांचा सत्कार करण्यात आला. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.