म. टा. प्रतिनिधी, पुणे
'करोनाकाळाला सामोरे जाताना सुरुवातीला काय पावले उचलावीत; तसेच आरोग्य, शिक्षण, अर्थव्यवस्था, रोजगार यांबाबतीत विविध गटांसाठी काय धोरण असले पाहिजे, याचा देशात सार्वत्रिक गोंधळ दिसून आला आहे. करोना आणि त्यामुळे निर्माण झालेली संकटाची परिस्थिती हाताळताना सरकारला पूर्ण अपयश आले आहे,' अशा शब्दांत नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ, भारतरत्न डॉ. अमर्त्य सेन यांनी शुक्रवारी ताशेरे ओढले.
राष्ट्र सेवा दलाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित 'फ्रायडे फ्लेम' या ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रपिता महात्मा गाधीजी यांचे नातू प्रा. राजमोहन गांधी अध्यक्षस्थानी होते. 'करोनाच्या पहिल्या लाटेत कामगार आणि कष्टकरी गटाचा विचार न करता लॉकडाउन करण्यात आला. सार्वजनिक आरोग्य, सामाजिक व राजकीय धोरण, शिक्षण, रोजगार याबद्दल मोठ्याप्रमाणात गोंधळ होता. या सर्व प्रश्नांवर आपण अद्यापही उत्तरे शोधलेली नाहीत,' अशी टीका सेन यांनी केली.
'स्वच्छ कारभार म्हणून केंद्र सरकार पाठ थोपटून घेते. वास्तविक सध्याच्या सरकारपेक्षा काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारच्या काळात अर्थव्यवस्था मजबूत होती. यूपीएच्या काळात आर्थिक विकासासोबत माहितीचा अधिकार आणि ग्रामीण रोजगार अशा महत्त्वाच्या प्रश्नांसाठी काम झाले. मोदी सरकारची कामगिरी अत्यंत वाईट असून, भारत बेरोजगार होऊ लागला आहे,' अशी टीकाही सेन यांनी केली.
'भारताचा वर्षानुवर्षे असलेला वैविध्यपूर्ण सहजीवनाचा चेहरा बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत,' अशी टिप्पणी सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी केली.
जगात राष्ट्रवादाची लाट आली आहे. अमेरिकेतील गोरे लोक स्वच्छ राष्ट्रवादी असतात, तर भारतात केवळ हिंदू राष्ट्रवादी आहेत. इतर लोकांना त्यांचा राष्ट्रवाद दाखवता येत नाही. लोकशाहीवादी लोकांना आपआपसातील तंटे बाजूला करून जगात आलेल्या या लोकशाहीविरोधी लाटेचा सामना करावा लागणार आहे.
- प्रा. राजमोहन गांधी
'करोनाकाळाला सामोरे जाताना सुरुवातीला काय पावले उचलावीत; तसेच आरोग्य, शिक्षण, अर्थव्यवस्था, रोजगार यांबाबतीत विविध गटांसाठी काय धोरण असले पाहिजे, याचा देशात सार्वत्रिक गोंधळ दिसून आला आहे. करोना आणि त्यामुळे निर्माण झालेली संकटाची परिस्थिती हाताळताना सरकारला पूर्ण अपयश आले आहे,' अशा शब्दांत नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ, भारतरत्न डॉ. अमर्त्य सेन यांनी शुक्रवारी ताशेरे ओढले.
राष्ट्र सेवा दलाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित 'फ्रायडे फ्लेम' या ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रपिता महात्मा गाधीजी यांचे नातू प्रा. राजमोहन गांधी अध्यक्षस्थानी होते. 'करोनाच्या पहिल्या लाटेत कामगार आणि कष्टकरी गटाचा विचार न करता लॉकडाउन करण्यात आला. सार्वजनिक आरोग्य, सामाजिक व राजकीय धोरण, शिक्षण, रोजगार याबद्दल मोठ्याप्रमाणात गोंधळ होता. या सर्व प्रश्नांवर आपण अद्यापही उत्तरे शोधलेली नाहीत,' अशी टीका सेन यांनी केली.
'स्वच्छ कारभार म्हणून केंद्र सरकार पाठ थोपटून घेते. वास्तविक सध्याच्या सरकारपेक्षा काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारच्या काळात अर्थव्यवस्था मजबूत होती. यूपीएच्या काळात आर्थिक विकासासोबत माहितीचा अधिकार आणि ग्रामीण रोजगार अशा महत्त्वाच्या प्रश्नांसाठी काम झाले. मोदी सरकारची कामगिरी अत्यंत वाईट असून, भारत बेरोजगार होऊ लागला आहे,' अशी टीकाही सेन यांनी केली.
'भारताचा वर्षानुवर्षे असलेला वैविध्यपूर्ण सहजीवनाचा चेहरा बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत,' अशी टिप्पणी सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी केली.
जगात राष्ट्रवादाची लाट आली आहे. अमेरिकेतील गोरे लोक स्वच्छ राष्ट्रवादी असतात, तर भारतात केवळ हिंदू राष्ट्रवादी आहेत. इतर लोकांना त्यांचा राष्ट्रवाद दाखवता येत नाही. लोकशाहीवादी लोकांना आपआपसातील तंटे बाजूला करून जगात आलेल्या या लोकशाहीविरोधी लाटेचा सामना करावा लागणार आहे.
- प्रा. राजमोहन गांधी