म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुस्तक आणि वाचक यांच्यातील सख्य वाढविण्यासाठी पुण्यातील आठ प्रकाशकांनी एकत्र येत अभिनव पाऊल उचलले आहे. वाचकांना पुस्तक रुपी खाद्य पुरविणे, लेखकांशी त्यांची भेट घडवून आणणे, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून पुस्तकांची ओळख करून देणे, अशा विविधांगी कार्यक्रमांची जत्री असलेल्या ‘वाचन जागर महोत्सवा’चे आयोजन त्यांनी केले आहे.
राजहंस, मॅजेस्टिक, मनोविकास, डायमंड, समकालीन, रोहन, साधना आणि ज्योत्स्ना आदी प्रकाशक संस्थांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. शहरात पाच ते १५ ऑगस्ट या कालावधीत आठ ठिकाणी हा महोत्सव होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘शब्दांगण’ येथे साहित्यिक राजन खान व ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक पराग करंदीकर यांच्या हस्ते पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. उर्वरित सातही ठिकाणी विविध मान्यवरांच्या उपस्थित उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती प्रकाशक संजय भास्कर जोशी, डॉ. सदानंद बोरसे आणि अरविंद पाटकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
या महोत्सवात लेखक-वाचक गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये लेखक स्वतः वाचकांना पुस्तकांची ओळख करून देणार आहेत. नवीन पुस्तक खरेदीवर ग्राहकांना २५ टक्के सूट दिली जाणार आहे. वाचकांना आकर्षिक करण्यासाठी भाग्यवान वाचक योजना राबविली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक ठिकाणी तीन विजेत्यांना पुस्तकरूपी भेट दिली जाणार आहे. पुस्तक अभिवाचन, कविता वाचन, सादरीकरण आदी कार्यक्रमांचेही आयोजन केले जाणार आहे, असे जोशी यांनी सांगितले.
पुस्तक आणि वाचक यांच्यातील सख्य वाढविण्यासाठी पुण्यातील आठ प्रकाशकांनी एकत्र येत अभिनव पाऊल उचलले आहे. वाचकांना पुस्तक रुपी खाद्य पुरविणे, लेखकांशी त्यांची भेट घडवून आणणे, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून पुस्तकांची ओळख करून देणे, अशा विविधांगी कार्यक्रमांची जत्री असलेल्या ‘वाचन जागर महोत्सवा’चे आयोजन त्यांनी केले आहे.
राजहंस, मॅजेस्टिक, मनोविकास, डायमंड, समकालीन, रोहन, साधना आणि ज्योत्स्ना आदी प्रकाशक संस्थांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. शहरात पाच ते १५ ऑगस्ट या कालावधीत आठ ठिकाणी हा महोत्सव होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘शब्दांगण’ येथे साहित्यिक राजन खान व ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक पराग करंदीकर यांच्या हस्ते पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. उर्वरित सातही ठिकाणी विविध मान्यवरांच्या उपस्थित उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती प्रकाशक संजय भास्कर जोशी, डॉ. सदानंद बोरसे आणि अरविंद पाटकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
या महोत्सवात लेखक-वाचक गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये लेखक स्वतः वाचकांना पुस्तकांची ओळख करून देणार आहेत. नवीन पुस्तक खरेदीवर ग्राहकांना २५ टक्के सूट दिली जाणार आहे. वाचकांना आकर्षिक करण्यासाठी भाग्यवान वाचक योजना राबविली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक ठिकाणी तीन विजेत्यांना पुस्तकरूपी भेट दिली जाणार आहे. पुस्तक अभिवाचन, कविता वाचन, सादरीकरण आदी कार्यक्रमांचेही आयोजन केले जाणार आहे, असे जोशी यांनी सांगितले.