सिंहगडरोड परिसरातील सखल भागात शिरले पाणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
मुठा नदीला पूर आल्यामुळे सिंहगड रोड परिसरातील सखल भागात बुधवारी पाणी शिरले. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने या भागातील आठ रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर या रोहित्रांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने एकतानगर, साईसिद्धार्थ, आनंदपार्क, विठ्ठलनगर, शारदासरोवर सोसायटी, राजपार्क सोसायटी, जलतंरग, जलविहार आदी परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे. तळमजल्यात असणाऱ्या वीजयंत्रणेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी दुपारी चारच्या सुमारास या परिसरातील आठ रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला. या रोहित्रांवरून सुमारे एक हजार ८०० वीजग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. पुराचे पाणी ओसरल्यानंतर बंद केलेला वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात येणार आहे, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, मुख्य अभियंता रामराव मुंडे, अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे, कार्यकारी अभियंता गणेश लटपटे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिलीप कोकणे यांनी परिसराला भेट देऊन वीजयंत्रणेची पाहणी केली.
अन्य भागातही वीजपुरवठा खंडित
पावसामुळे अन्य भागातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामध्ये मुंबई-बंगळुरू बाह्यामार्गावरील टोलनाका परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामध्ये सन गॅलक्सी, नारायण बाग आदी प्रमुख सोसायट्यांचा समावेश होता. या सोसायट्यांमध्ये दिवसभर वीजपुरवठा खंडित झाला होता. याशिवाय कात्रज-कोंढवा रस्ता परिसर, वानवडी, एनआयबीएम रोड, बिबवेवाडी आदी परिसरात तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
म. टा. प्रतिनिधी, पुणे
मुठा नदीला पूर आल्यामुळे सिंहगड रोड परिसरातील सखल भागात बुधवारी पाणी शिरले. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने या भागातील आठ रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर या रोहित्रांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने एकतानगर, साईसिद्धार्थ, आनंदपार्क, विठ्ठलनगर, शारदासरोवर सोसायटी, राजपार्क सोसायटी, जलतंरग, जलविहार आदी परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे. तळमजल्यात असणाऱ्या वीजयंत्रणेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी दुपारी चारच्या सुमारास या परिसरातील आठ रोहित्रांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला. या रोहित्रांवरून सुमारे एक हजार ८०० वीजग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. पुराचे पाणी ओसरल्यानंतर बंद केलेला वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात येणार आहे, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, मुख्य अभियंता रामराव मुंडे, अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे, कार्यकारी अभियंता गणेश लटपटे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिलीप कोकणे यांनी परिसराला भेट देऊन वीजयंत्रणेची पाहणी केली.
अन्य भागातही वीजपुरवठा खंडित
पावसामुळे अन्य भागातील वीजपुरवठा खंडित झाला. त्यामध्ये मुंबई-बंगळुरू बाह्यामार्गावरील टोलनाका परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामध्ये सन गॅलक्सी, नारायण बाग आदी प्रमुख सोसायट्यांचा समावेश होता. या सोसायट्यांमध्ये दिवसभर वीजपुरवठा खंडित झाला होता. याशिवाय कात्रज-कोंढवा रस्ता परिसर, वानवडी, एनआयबीएम रोड, बिबवेवाडी आदी परिसरात तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.