म. टा. प्रतिनिधी, पुणे
आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणेकरांनी त्यांना राखीचे प्रेमबंधन पाठविले आहे. कोरोनाचे संकट असले, तरी देशाच्या सीमेवर सज्ज असलेल्या जवानांना सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांतर्फे राखी पौर्णिमेनिमित्त अकरा हजारांहून अधिक राख्या पाठविण्यात आल्या आहेत.
कारगील दिनाचे औचित्य साधून कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात हा कार्यक्रम करण्यात आला. उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्या हस्ते राखीपूजन झाले. या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा झेंडे, दत्त मंदिर ट्रस्टचे उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, आनंद सराफ, अविनाश शहाणे, राजश्री शेठ, पराग ठाकूर आदी उपस्थित होते. लायन्स क्लब ऑफ पुणे विजयनगरने उपक्रमात सहभाग घेतला.
शेंडगे म्हणाल्या, 'देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक आपले सर्वस्व अर्पण करतात, त्यामुळे त्यांची आठवण प्रत्येकाने ठेवायला हवी. पुण्यातून येणाऱ्या राख्यांची सीमेवरील जवान दर वर्षी वाट पाहात असतात. सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांचा उपक्रम कौतूकास्पद आहे.'
मनीषा झेंडे आणि आनंद सराफ यांनी उपक्रमाची माहिती दिली. उपक्रमाचे यंदा २३ वे वर्ष आहे. समाजाच्या कृतज्ञतेचा प्रत्यय सैनिकांना करून देण्यासाठी १९९८पासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 'देशाच्या सीमाभागांत १५० पोस्टवर प्रत्येक रेजिमेंटमध्ये या राख्या पाठविल्यानंतर तेथे पूजन करून सैनिकांपर्यंत पोहोचविल्या जातात. अनेकदा सैनिकांकडून राख्यांना उत्तर म्हणून पत्र आणि भेटवस्तूही येतात,' असे सराफ यांनी सांगितले.
आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ज्ञता व्यक्त करण्यासाठी पुणेकरांनी त्यांना राखीचे प्रेमबंधन पाठविले आहे. कोरोनाचे संकट असले, तरी देशाच्या सीमेवर सज्ज असलेल्या जवानांना सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांतर्फे राखी पौर्णिमेनिमित्त अकरा हजारांहून अधिक राख्या पाठविण्यात आल्या आहेत.
कारगील दिनाचे औचित्य साधून कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात हा कार्यक्रम करण्यात आला. उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्या हस्ते राखीपूजन झाले. या वेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा झेंडे, दत्त मंदिर ट्रस्टचे उत्सवप्रमुख शिरीष मोहिते, आनंद सराफ, अविनाश शहाणे, राजश्री शेठ, पराग ठाकूर आदी उपस्थित होते. लायन्स क्लब ऑफ पुणे विजयनगरने उपक्रमात सहभाग घेतला.
शेंडगे म्हणाल्या, 'देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक आपले सर्वस्व अर्पण करतात, त्यामुळे त्यांची आठवण प्रत्येकाने ठेवायला हवी. पुण्यातून येणाऱ्या राख्यांची सीमेवरील जवान दर वर्षी वाट पाहात असतात. सैनिक मित्र परिवार आणि सहयोगी संस्थांचा उपक्रम कौतूकास्पद आहे.'
मनीषा झेंडे आणि आनंद सराफ यांनी उपक्रमाची माहिती दिली. उपक्रमाचे यंदा २३ वे वर्ष आहे. समाजाच्या कृतज्ञतेचा प्रत्यय सैनिकांना करून देण्यासाठी १९९८पासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 'देशाच्या सीमाभागांत १५० पोस्टवर प्रत्येक रेजिमेंटमध्ये या राख्या पाठविल्यानंतर तेथे पूजन करून सैनिकांपर्यंत पोहोचविल्या जातात. अनेकदा सैनिकांकडून राख्यांना उत्तर म्हणून पत्र आणि भेटवस्तूही येतात,' असे सराफ यांनी सांगितले.